AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुष्काळ झळा… नाशिकमध्ये 40 मोरांचा तडफडून मृत्यू

नाशिक : संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाने होरपळला आहे. या दुष्काळापासून पशू-पक्षीही वाचू शकलेले नाहीत. त्यातच आता नाशिकमध्ये 40 पेक्षा जास्त मोर या दुष्काळाचे बळी ठरले आहेत. अन्न आणि पाणी न मिळाल्याने या मोरांचा तडफडून मृत्यू झाला आहे. नाशिकच्या चांदवड येथील दहीवड-दीघवड गावात हा धक्कादायक प्रकार घडला. येथे 40 पेक्षा जास्त मोरांचा मृत्यू झाला. या मोरांना वेळेवर पुरेसं अन्न […]

दुष्काळ झळा… नाशिकमध्ये 40 मोरांचा तडफडून मृत्यू
| Updated on: Jul 05, 2019 | 3:47 PM
Share

नाशिक : संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाने होरपळला आहे. या दुष्काळापासून पशू-पक्षीही वाचू शकलेले नाहीत. त्यातच आता नाशिकमध्ये 40 पेक्षा जास्त मोर या दुष्काळाचे बळी ठरले आहेत. अन्न आणि पाणी न मिळाल्याने या मोरांचा तडफडून मृत्यू झाला आहे.

नाशिकच्या चांदवड येथील दहीवड-दीघवड गावात हा धक्कादायक प्रकार घडला. येथे 40 पेक्षा जास्त मोरांचा मृत्यू झाला. या मोरांना वेळेवर पुरेसं अन्न आणि पाणी न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या घटनेनंतर वनविभागाचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. वनविभागाने दुर्लक्ष केल्याने या मोरांचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. वनविभाग दुर्लक्ष करत असल्याने अखेर या मोरांचं संवर्धन करण्यासाठी ग्रामस्थांनी स्वत: पाण्याचे साठे तयार केले होते. मात्र, तरीही या मोरांना वाचवण्यात ग्रामस्थांना यश आलं नाही.

आधीच देशातील जैवविविधता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. वाढत्या आधुनिकीकरणामुळे पशू-पक्षांच्या कित्येक प्रजाती लोप पावल्या आहेत. देशात वाघांची संख्या जेमतेम उरली आहे. त्यामुळे वनविभागाने आता वन्य प्राणीजीवांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

VIDEO :

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.