तहानलेला ससा, रोज मानवी वस्तीत येतो, पाणी पितो, निघून जातो!

| Updated on: Jul 05, 2019 | 3:46 PM

सांगली : सांगली जिल्ह्यातील सहा तालुक्यात दुष्काळ आहे. त्यात उन्हाच्या झळा वाढत आहेत. पाण्याच्या शोधात रानातील ससे, मोर, चिमण्या, पोपट यासारखे पशूपक्षी व्याकूळ आहेत. निसर्गाशी नाळ जोडलेला शेतकरीच या पशू पक्षांची व्याकूळता जाणू शकतो. तासगाव तालुक्यातील  गौरगाव येथील आर पी खराडे यांनी रानातील पक्षांसाठी पाणवठा तयार केला आहे. भांड्यात पाणी भरुन ते घराबाहेर ठेवतात. मोर, […]

तहानलेला ससा, रोज मानवी वस्तीत येतो, पाणी पितो, निघून जातो!
Follow us on

सांगली : सांगली जिल्ह्यातील सहा तालुक्यात दुष्काळ आहे. त्यात उन्हाच्या झळा वाढत आहेत. पाण्याच्या शोधात रानातील ससे, मोर, चिमण्या, पोपट यासारखे पशूपक्षी व्याकूळ आहेत. निसर्गाशी नाळ जोडलेला शेतकरीच या पशू पक्षांची व्याकूळता जाणू शकतो. तासगाव तालुक्यातील  गौरगाव येथील आर पी खराडे यांनी रानातील पक्षांसाठी पाणवठा तयार केला आहे. भांड्यात पाणी भरुन ते घराबाहेर ठेवतात. मोर, चिमण्या कावळे यासारखे पक्षी पाण्यासाठी येऊ लागले आहेत. पक्षी येत असताना सशासारखा सस्तन प्राणीही पाण्याच्या शोधात रानातून मानवी वस्तीत येत आहे. सशाचं एक लहान पिल्लू पाण्याच्या शोधात चक्क मानवी वस्तीत असलेल्या खराडे यांच्या अंगणात नित्य नियमाने गेले चार दिवस येत आहे.

तासगाव तालुक्यातील गौरगाव हे दुष्काळी गाव, सांगली जिल्ह्यातील साडे तीन लाख लोकांना 173 टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. हे पाणी कमी पडत असल्याने लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.  पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ केवळ माणसांनाच नाही तर डोंगर दऱ्यातील प्राण्यांवरही आहे.

गौरगाव येथील आर पी खराडे या शेतकऱ्याने आपल्या अंगणात ठेवलेले पाणी पिण्यासाठी एक ससा नेमाने  येत आहे. गेल्या चार दिवसापासून हा ससा चांगलाच रुळला आहे. न घबरता तो पाणी पिण्यासाठी जंगलातून चक्क मानवी वस्तीत येऊ लागला आहे.

गौरगावाच्या कडेला डोंगर आहे आणि येथील जंगलात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे  पाण्याच्या शोधात राणातील  ससे, मोर, चिमण्या, पोपट यासारखे पशुपक्षी व्याकूळ झाले आहेत.

ससा, मोर यासारखे पशूपक्षी माणसापासून दूर पळतात,पण कडक उन्हाने पाण्याच्या शोधत त्यांना मनुष्यवस्तीत यावं लागत आहे. तहान भागवण्यासाठी जंगली प्राणी आता जीवाचीही पर्वा करेनासे झाले आहेत.


संबंधित बातम्या 

दुष्काळ झळा… नाशिकमध्ये 40 मोरांचा तडफडून मृत्यू