AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bihar Election: एनडीएच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, लोजप बाहेर, भाजप आणि जेडीयूला किती जागा?

बिहारमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये 3 टप्प्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे (Seat distribution of NDA BJP JDU in Bihar Assembly Election 2020).

Bihar Election: एनडीएच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, लोजप बाहेर, भाजप आणि जेडीयूला किती जागा?
| Updated on: Oct 04, 2020 | 7:14 PM
Share

पाटणा : बिहारमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये 3 टप्प्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे (Seat distribution of NDA BJP JDU in Bihar Assembly Election 2020). एकिकडे महायुतीने शुक्रवारी मित्र पक्षांसोबतच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब झाला आहे, तर दुसरीकडे एनडीएने देखील आपल्या जागावाटपाचा फॉर्म्युला घोषित केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजप बिहारमध्ये 50-50 फॉर्म्युल्याचा वापर करणार आहेत. यानुसार भाजपच्या जागांमध्ये वाढ होऊन भाजप निम्म्या विधानसभा जागांवर आपली ताकद आजमावणार आहे.

बिहारमध्ये विधानसभेच्या 243 जागा आहेत. जदयू आणि भाजप 119 -119 जागांवर आपले उमेदवार उतरवणार आहेत. इतर 5 जागा जीतनराम मांझी यांच्या ‘हम’ पक्षासाठी सोडण्यात आल्या आहेत. शनिवारी रात्री उशीरा झालेल्या भाजप आणि जदयूच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झालं आहे. लोजपला यातून बाहेर ठेवण्यात आलं आहे. एनडीएच्या जागावाटपात भाजपने सातत्याने आपल्या जागेंच्या मागणीसाठी आग्रही भूमिका घेतली. त्यामुळे भाजपला फायदा होऊन जनता दला इतक्याच जागा मिळाल्या आहेत.

दरम्यान, नितीश कुमार यांचा जनता दल पक्ष भाजपपेक्षा जवळपास 15 ते 20 जागा अधिक लढण्याची मागणी करत होता. मात्र, भाजप जागांच्या समान वाटपावर अडून राहिल्याने हा जागावाटपाचा निर्णय बराच लांबला. अखेर मॅरेथॉन मीटिंगनंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि भूपेंद्र यादव दिल्लीसाठी रवाना झाले.

जदयू आणि भाजप नेत्यांमध्ये 5 तास बैठक

भाजपच्यावतीने बिहार निवडणुकीतील जागा वाटपात देवेंद्र फडणवीस यांनी नेतृत्त्व केलं. जनता दलाकडून ललन सिंह, आरसीपी सिंह आणि विजेंद्र यादव यांनी नेतृत्त्व केलं. या चर्चेत लोजपला बाजूला ठेवण्यात आलं. लोजपचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांच्या वेगळ्या भूमिकेमुळे जनता दलाने लोजपच्या एनडीएतील समावेशाला मान्यता दिली नाही. दरम्यान, लोकसभा निवडणुकीतही भाजप आणि जनता दलात 50-50 चाच फॉर्म्युला वापरण्यात आला होता. बिहारमधील एकूण 40 लोकसभा जागांपैकी भाजप आणि जनता दलाने 17-17 जागा लढवल्या होत्या. तसेच 6 जागा लोजपसाठी सोडण्यात आल्या.

बिहारमध्ये 3 टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. पहिल्या फेरीतील मतदान 28 ऑक्टोबर, दूसरे 3 नोव्हेंबर आणि तिसरे 7 नोव्हेंबरला होणार आहे. निकाल 10 नोव्हेंबरला लागणारआहे.

संबंधित बातम्या :

बिहार निवडणुकीत 50 पेक्षा जास्त जागा लढवा, शिवसेना नेत्यांची संजय राऊतांकडे मागणी

तेज प्रताप यादवांना जेडीयूचा शह, दुरावलेली पत्नी ऐश्वर्याला विरोधात तिकीट देण्याचा मेगाप्लॅन

बिहार जिंकणारच, प्रभारीपदी नियुक्ती होताच देवेंद्र फडणवीसांचा एल्गार

Seat distribution of NDA BJP JDU in Bihar Assembly Election 2020

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.