शेतकरी-कामगार विरोधी कायद्यांना विरोध, 26 नोव्हेंबरला शेकापकडून भारत बंदची हाक

| Updated on: Oct 28, 2020 | 8:58 PM

शेतकरी-कामगार विरोधी कायद्यांना विरोध म्हणून शेकाप आमदार जयंत पाटील यांनी 26 नोव्हेंबरला भारत बंदची हाक दिली आहे.

शेतकरी-कामगार विरोधी कायद्यांना विरोध, 26 नोव्हेंबरला शेकापकडून भारत बंदची हाक
Follow us on

पुणे : शेतकरी-कामगार विरोधी कायद्यांना विरोध म्हणून शेकापच्या वतीने आमदार जयंत पाटील यांनी 26 नोव्हेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. यावेळी या कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकरी व कामगार संघटनांनी एकत्र यावे, असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं. (Shekap jayant patil Call India Strike)

अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीची पुण्यात आज बैठक पार पडली. केंद्र सरकारने हुकुमशाही पध्दतीने शेतकऱ्यावर लादलेल्या चार कायद्यांना स्पष्ट विरोध करणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. या वेळी माजी खासदार राजू शेट्टी, डॉ. अशोक ढवळे, बाबा आढाव, आदी नेते उपस्थित होते.

देशातील 250 पेक्षा जास्त शेतकरी संघटनांची एकजूट असलेल्या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या महाराष्ट्र राज्याच्या इकाईचे गठन करत आपल्या राज्यातही लढा देण्याचे निश्चित झालेचे जयंत पाटील यांनी सांगितले.

येत्या 26 नोव्हेंबरला भारत बंदची हाक दिल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ठिकठिकाणी बैठका होत आहेत. 18 नोव्हेंबरला अलिबाग येथे पुढील बैठक पार पडणार असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, 26 आणि 27 नोव्हेंबरला होणाऱ्या देशव्यापी कार्यक्रमाचे आजच्या बैठकीत नियोजन करण्यात आले. महाराष्ट्रात शेतकरी विरोधी कायद्याला विरोध करत आंदोलनाची दिशा ठरविण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिली.

(Shekap jayant patil Call India Strike)

संबंधित बातम्या

कृषी विधेयकाविरोधात ‘भारत बंद’, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कृषी विधेयकाच्या जीआरची होळी