AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिक प्रशासनाने करुन दाखवलं, मजुरांना घेऊन दोन ट्रेन रवाना, एका डब्ब्यात 54 प्रवासी

नाशिकरोड रेल्वे स्थानकावर आलेल्या विशेष 16 डब्ब्यांच्या गाडीने हे नागरिक फिजीकल डिस्टन्सिंग पाळत आपल्या राज्यात रवाना करण्यात आले (Special trains for labour from Nashik).

नाशिक प्रशासनाने करुन दाखवलं, मजुरांना घेऊन दोन ट्रेन रवाना,  एका डब्ब्यात 54 प्रवासी
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: May 02, 2020 | 4:05 PM
Share

नाशिक : मध्य प्रदेशनंतर आज (2 मे) उत्तर प्रदेशच्या 845 नागरिकांना विशेष रेल्वेने लखनौला पाठवण्यात आलं. नाशिकरोड रेल्वे स्थानकावर आलेल्या विशेष 16 डब्ब्यांच्या गाडीने हे नागरिक फिजीकल डिस्टन्सिंग पाळत आपल्या राज्यात रवाना करण्यात आले (Special trains for labour from Nashik). यावेळी नाशिककरांच्यावतीनं परराज्यातल्या या नागरिकांना टाळ्या वाजवून आणि ‘भारत माता की जय’चा जयघोष करत निरोप देण्यात आला.

कोरोनाच्या संकटात नाशिकमध्ये एक दिलासादायक चित्र पाहायला मिळालं. अनेक मजूर आपल्या मुलाबाळांसह सर्व संसार पाठीवर घेऊन पायीच मुंबईहून नाशिकमार्गे आपआपल्या राज्यात निघाले होते. यात मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, बिहार या राज्यातील नागरिकांचा समावेश होता. त्यांना पोलिसांनी रस्त्यातच अडवून शेल्टर कॅम्पमध्ये ठेवलं होतं. या शेल्टर कॅम्पमध्ये या मजुरांची रितसर आरोग्य तपासणी, त्यांच्या जेवण्याची व्यवस्था हे सगळं करण्यात आलं होतं. अखेर जिल्हा प्रशासनाने आणि राज्य सरकारने मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेश सरकारशी बोलून या शेल्टरमध्ये असलेल्या लोकांसाठी विशेष ट्रेनची व्यवस्था केली.

शुक्रवारी (1 मे) रात्री शेल्टर कॅम्पमध्ये असलेल्या तब्बल 345 लोकांना 6 डब्ब्यांच्या विशेष ट्रेनने मध्यप्रदेशला रवाना करण्यात आलं. आज (1 मे) सकाळच्या सुमारास 845 उत्तर प्रदेशच्या रहिवाशांसाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करण्यात आली. 16 डब्ब्यांच्या या ट्रेनमध्ये प्रत्येक डब्ब्यात 54 लोकं अशी आसन व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवत या ट्रेनला रवाना केलं.

दरम्यान नाशिककरांनी टाळ्यांच्या गजरात आणि ‘भारत माता की जय’चा जयघोष करत या मजुरांना निरोप दिला. राज्यात पहिल्यांदाच परराज्यातील लोकांना पाठवण्याची व्यवस्था नाशिक प्रशासनाच्यावतीनं करण्यात आली. त्यामुळे लवकरच नाशिकचा हा पॅटर्न राज्यातील इतर शहरांमध्ये राबवला जाण्याची शक्यता आहे. विविध ठिकाणी अडकलेल्या इतर राज्यांतील नागरिकांना त्यांच्या राज्यात पाठवण्याची व्यवस्था केल्यास कोरोनाचा धोका कमी होण्यास मदत होईल, असंही सांगितलं जात आहे.

संबंधित बातम्या :

नांदेडचा गुरुद्वारा परिसर कंटेन्मेंट झोन, 20 जणांना कोरोनाची लागण

पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1828 वर, कोणत्या प्रभागात किती रुग्ण?

चंद्रपुरात हजारो मजुरांची धडकी भरवणारी गर्दी, मजुरी नाही, रेशन संपल्याने प्रवास करु देण्याची मागणी

लॉकडाऊन वाढल्याने लग्न लांबली, विदर्भातील हजारपेक्षा अधिक लग्न लांबणीवर

Special trains for labour from Nashik

Follow Us
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.
आरोपींना संरक्षण देणाऱ्या अश्विनी चैनानीच्या जामीन अर्जाचं काय झालं?
आरोपींना संरक्षण देणाऱ्या अश्विनी चैनानीच्या जामीन अर्जाचं काय झालं?.
मोठी बातमी! 99.9% शुद्ध चांदीवर सरकारचा मोठा निर्णय
मोठी बातमी! 99.9% शुद्ध चांदीवर सरकारचा मोठा निर्णय.
महिलेला नको तसे व्हिडीओ पाठवले अन् कार्यालयातच.... NCP अजित पवार गटात
महिलेला नको तसे व्हिडीओ पाठवले अन् कार्यालयातच.... NCP अजित पवार गटात.
NEET पेपरफुटीचे धागेदोरे नांदेडपर्यंत! 5 लाखात विकत घेतला परीक्षेचा...
NEET पेपरफुटीचे धागेदोरे नांदेडपर्यंत! 5 लाखात विकत घेतला परीक्षेचा....
मोठी बातमी! पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, मात्र कारण काय?
मोठी बातमी! पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, मात्र कारण काय?.
कोकण किनारपट्टीवर वादळी पावसाचा इशारा, शेतकरी चिंतेत
कोकण किनारपट्टीवर वादळी पावसाचा इशारा, शेतकरी चिंतेत.