AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आर्थिक संकटातून बाहेर निघायचे आहे? मग आठवड्यातून फक्त दोनदा करा ‘हा’ उपाय

बऱ्याचदा भूतकाळातल्या काही चुकांमुळे वर्तमानात त्याचे परिणाम भोगावे लागतात. आपल्यावर येणारे आर्थिक संकट हेसुद्धा यातलाच एक भाग आहे. भूतकाळात जात चुका दुरुस्त करणे जरी शक्य नसले तरी वर्तमानात काही उपाय केल्यास या समस्येतून मार्ग निघू शकतो.

आर्थिक संकटातून बाहेर निघायचे आहे? मग आठवड्यातून फक्त दोनदा करा 'हा' उपाय
प्रातिनिधिक छायाचित्र
सिद्धेश सावंत
सिद्धेश सावंत | Updated on: Jun 01, 2022 | 7:55 PM
Share

बऱ्याचदा अनेक उपाय (remedy) करूनही आर्थिक संकटं (financial crices) कायम असतात. प्रत्येकाच्या आर्थिक समस्येला (financial crices) वेगवेगळी करणे असू शकतात, मात्र हिंदू धर्मात यावर यावर काही उपाय

( get rid out) सुचविले आहे. त्याबद्दल जाणून घेऊया. हिंदू धर्मानुसार आठवड्यातला प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो. त्याचप्रमाणे गुरुवार हा भगवान विष्णूला तसेच देवी लक्ष्मीला समर्पित आहे.  या दिवशी लक्ष्मीची पूजा आणि तिचे स्मरण केल्याने जातकावर लक्ष्मी प्रसन्न राहते. याशिवाय शुक्रवार हा महालक्ष्मीचाही दिवस आहे. मान्यतेनुसार आठवड्यातील या दोन दिवशी भगवान विष्णूसोबत महालक्ष्मीची पूजा केल्याने सुख-समृद्धी मिळते. यासोबतच कुटुंबात आनंदाचे वातावरण असते. आर्थिक संकटातून बाहेर निघण्यासाठी गुरुवार आणि शुक्रवारी कोणते उपाय केल्याने लाभ मिळेल, याबद्दल जाणून घेऊया.

जाणून घ्या उपाय

  1. गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करण्यासोबतच देवी लक्ष्मीचीही पूजा करा. कमळाचे फुल लक्ष्मीचे आवडते आहे त्यामुळे ते अर्पण करा. असे केल्याने सुख-समृद्धी प्राप्त होईल.
  2. शक्य असल्यास लक्ष्मीच्या किंवा कुठल्याही देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या. आर्थिक संकातून बाहेर निघायचा मार्ग निघण्यासाठी प्रार्थना करा.
  3. गुरुवारी आणि शुक्रवारी एकवेळचा उपवास करा.
  4. गुरुवारी आणि शुक्रवारी श्री सूक्त आणि विष्णू सहस्रनामाचे पठण करा. या उपायाने आर्थिक संकटांशिवाय आरोग्याशी संबंधित आणि नात्यांशी संबंधित समस्यांवरही लाभ मिळतो.
  5. धन हानीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजाच्या एका बाजूला थोडासा गुलाल टाका  व त्यावर तुपाचा चारमुखी दिवा लावा. दिवा लावताना मनात म्हणा की ‘हे लक्ष्मी माते धनहानीशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळण्यासाठी मार्ग दिसू दे’. दिवा विझल्यावर तो वाहत्या पाण्यात विसर्जित करावा.

(वर दिलेली माहिती ही धार्मिक दृष्टिकोनातून दिलेली आहे. अंधश्रद्धा पररविण्याचा कुठलाही उद्देश नाही)

Follow Us
मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट समोर! मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी
मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट समोर! मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी न्यायमूर्तींची अचानक बदली, नेमकं काय घडलं?
आमची सत्ता आली तर पक्ष कसे फुटतात ते अमित शाहांना दाखवू
Sanjay Raut | संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा! आमची सत्ता आली तर पक्ष कसे फुटतात ते अमित शाहांना दाखवू
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये! नाशिक-रायगड दौऱ्यानंतर आज मुंबईत मोठी बैठक
MNS Meeting | राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये! नाशिक-रायगड दौऱ्यानंतर आज मुंबईत मोठी बैठक; मनसेत मोठे फेरबदल होणार?
भर मंचावर भाजपच्या बड्या नेत्याची जीभ घसरली; थेट म्हणाले, शुद्ध....
भर मंचावर भाजपच्या बड्या नेत्याची जीभ घसरली; थेट म्हणाला, शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या...
नाटक केलं तर तमाशा दाखवेन! गणेश नाईकांचा नाव न घेता इशारा
Ganesh Naik | नाटक केलं तर तमाशा दाखवेन! गणेश नाईकांचा नाव न घेता इशारा; नेमका निशाणा कुणावर?
मुंबईकरांनो, पाणीकपात तूर्तास कायम! पाऊस ओसरल्याने प्रशासनाचा निर्णय
Mumbai Water Cut | मुंबईकरांनो, पाणीकपात तूर्तास कायम! धरणसाठा 88.70% वर; पाऊस ओसरल्याने प्रशासनाचा मोठा निर्णय
मोठी घडामोड! सुप्रिया सुळे 8 खासदारांसह पंतप्रधान मोदींना भेटणार
मोठी घडामोड! सुप्रिया सुळे 8 खासदारांसह पंतप्रधान मोदींना भेटणार; आज दिल्लीच्या बैठकीत काय निर्णय होणार?
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या...
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान धक्कादायक घटना, व्हिडीओच आला समोर
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर संताप
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्ते  मनोज जरांगेंवर भडकले; सडकून टीका!