साताऱ्यात बोअरवेल ट्रक पलटी होऊन भीषण अपघात, तिघांचा मृत्यू, 8 जखमी

बोअरवेल ट्रक पलटी होऊन साताऱ्यात भीषण अपघात झाला आहे (Borewell truck accident in Satara).

साताऱ्यात बोअरवेल ट्रक पलटी होऊन भीषण अपघात, तिघांचा मृत्यू, 8 जखमी
Follow us
| Updated on: Mar 06, 2020 | 10:22 AM

सातारा : बोअरवेल ट्रक पलटी होऊन साताऱ्यात भीषण अपघात झाला (Borewell truck accident in Satara). हा अपघात आज सकाळी 6.15 च्या सुमारास खंबाटकी बोगद्याजवळील एस वळणावर झाला. या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, खंडाळा पोलीस आणि महामार्ग पोलीस यांच्या मदतीने जखमींना तातडीने साताऱ्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

बोअरवेल ट्रक वाई येथून खंडाळा येथे जात होता. या ट्रकमध्ये 13 कामगार होते. ट्रक भरधाव वेगात धावत होता. दरम्यान, हा ट्रक खंबाटकी बोगद्याजवळील एस वळणार आला असता चालकाचा ताबा सुटला आणि रस्त्याशेजारील कठड्याला धडकला. यात ट्रक पलटी झाला (Borewell truck accident in Satara).

या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 8 जण जखमी झाले. जखमींपैकी 3 जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना साताऱ्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गाडीत लोखंडी पाईप असल्यामुळे कामगार जखमी झाले, असं पोलीस तपासात उघड झालं आहे. जखमींपैकी बहुतांश कामगार हे तमिळनाडूचे असल्याची माहिती समोर आली आहे.

आणखी वाचा – ठाकरे सरकारचा पहिला अर्थसंकल्प, अजित पवार बजेट मांडणार

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.