AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ग्रामीण भागातील विद्यापीठांत ऑनलाइन परीक्षा कठीण, कुलगुरु समितीच्या बैठकीत निरीक्षण

विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करुनच, या परीक्षा कशा घेता येतील, त्यावर विचार केला जाईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.

ग्रामीण भागातील विद्यापीठांत ऑनलाइन परीक्षा कठीण, कुलगुरु समितीच्या बैठकीत निरीक्षण
| Updated on: Aug 30, 2020 | 3:47 PM
Share

मुंबई : राज्यातील प्रत्येक विद्यापीठांमध्ये कशाप्रकारे परीक्षा घ्यायच्या, याविषयी अजूनही पेचप्रसंग कायम आहे. राज्यभरातील विद्यापीठांचा आणि त्यात आयोजित केला जाणाऱ्या परीक्षांचा कुलगुरु समितीच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. (Vice-Chancellor’s Committee meeting on Final Year University Exams)

कुलगुरुंनी दिलेला अहवाल उद्या सरकारकडे ठेवला जाणार आहे. ग्रामीण भागातील विद्यापीठांमध्ये ऑनलाइन परीक्षा घेणे कठीणच असल्याची व्यथा यावेळी कुलगुरुंनी मांडली. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समितीची स्थापन केली आहे.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करुनच, या परीक्षा कशा घेता येतील, त्यावर विचार केला जाईल. यावर लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

हेही वाचा : UGC | अंतिम वर्षाच्या परीक्षा होणारच, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, तारखा निश्चित करण्याचा अधिकार राज्यांना

कुलगुरुंच्या समितीच्या बैठकीत मुंबई, पुणे या दोन विद्यापीठांचा अपवाद वगळता इतर विद्यापीठांमध्ये ऑनलाइन परीक्षा घेणे कठीण असल्याचे समितीच्या अहवालातून समोर आले.

ऑफलाइन परीक्षा घेण्यासंदर्भात सरकारला धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल, त्यासाठी पुन्हा उद्या कुलगुरुंच्या समितीची बैठक आयोजित केली जाणार आहे. सरकारला अहवाल सादर केल्यानंतर त्यावर काय निर्णय घेतला जाईल हे महत्त्वाचे ठरणार आहे.

राज्यातील कोरोना संक्रमणाची परिस्थिती बघता सध्या अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रावर फिजिकली घेणं अवघड आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर येऊन परीक्षा द्यायला लागू नये, असाच आमचा प्रयत्न आहे, असं उदय सामंत यांनी कालच स्पष्ट केलं होतं.

“विद्यार्थी मानसिक दडपणाखाली आहेत. विद्यार्थ्यांना आरोग्याची अडचण होणार नाही, अशा सोप्या पद्धतीने परीक्षा घ्या, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. आम्ही विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ देणार आहोत. त्यामुळे संभ्रम नसावा. ऑनलाईन किंवा ओपन बुक टेस्ट घेऊ शकता, असं यूजीसीने सुचवलं आहे” अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.

(Vice-Chancellor’s Committee meeting on Final Year University Exams)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.