AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकमधील पावसामुळे औरंगाबादकरांना दिलासा, जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत वाढ

नांदूर मधमेश्वर धरणातून 24 हजार क्यूसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे गोदावरी नदीला अक्षरशः पूर आला आहे. पुराचं हे पाणी औरंगाबाद जिल्ह्यातील कायगाव टोका इथे दाखल झालं आहे. त्यामुळे जायकवाडी धरणाची पाणी पातळी एक टक्क्याने वाढली आहे.

नाशिकमधील पावसामुळे औरंगाबादकरांना दिलासा, जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत वाढ
| Updated on: Jul 29, 2019 | 5:40 PM
Share

नाशिक : नाशिक शहरासह परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नांदूर मधमेश्वर धरणातून सोडलेले पाणी जायकवाडी धरणात दाखल झालं आहे. नांदूर मधमेश्वर धरणातून 24 हजार क्यूसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे गोदावरी नदीला अक्षरशः पूर आला आहे. पुराचं हे पाणी औरंगाबाद जिल्ह्यातील कायगाव टोका इथे दाखल झालं आहे. त्यामुळे जायकवाडी धरणाची पाणी पातळी एक टक्क्याने वाढली आहे. त्यामुळे औरंगाबाद शहराच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटला आहे. त्यामुळे औरंगाबाद शहरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

नांदूर मधमेश्वर आणि गंगापूर धरणातून सध्या गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्यात येत आहे. एका महिन्यांपूर्वी कोरड्या ठाक पडलेल्या गोदावरी नदी पात्राला आणि मृत साठ्यात पोहोचलेल्या जायकवाडी धरणाला या पाण्यामुळे जीवदान मिळालं आहे. 24 हजार क्यूसेक्सने नदी पत्रात कोसळणारे हे पाणी औरंगाबाद कायगाव टोका परिसरात जायकवाडी धरणात मिसळत असतं, या पाण्यामुळे जायकवाडी धरणाच्या मृत पाणीसाठ्यात तब्बल तीन टक्क्यांची वाढ झाली आहे.

गंगापूर आणि नांदूर मधमेश्वर धरणातून सोडलेलं पाणी हे औरंगाबाद जिल्ह्यातल्या कायगाव टोका इथे जायकवाडी धरणात मिळालं. त्यामुळे कायगाव टोका परिसरात जायकवाडी नदी परिसरात अक्षरशः पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदीच्या परिसरात असलेलं जुनी मंदिरं आणि घाटांपर्यंत या पाण्याचा पातळी वाढली आहे.

मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह जायकवाडी धरणात मिसळत असल्यामुळे सध्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी वाढू लागली आहे. जायकवाडी धरणाची पाणी पातळी ही मृतसाठ्यात गेली होती, उणे 10.7 इतका धरणाचा पाणी साठा कमी झाला होता. पण, त्यात आणखी तीन टक्क्यांची भर पडली असून हा पाणीसाठा आता उणे 7.10 टक्क्यांवर पोहोचला आहे. जायकवाडी धरणावर औरंगाबाद आणि जालना या दोन महानगरांसह चारशे गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनीही सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

नाशिक परिसरात कोसळत असलेल्या धुव्वादार पावसामुळे गोदावरी नदीला पूर येऊन जायकवाडी धरणाची पाणी पातळी वाढली असली, तरी मराठवाड्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. पण, जायकवाडी धरणाची पाणीपातळी वाढल्याने धरणावर अवलंबून असलेल्या नागरिकांना मात्र दिलासा मिळाला आहे.

संबंधित बातम्या :

पुणेकरांसाठी खूशखबर, खडकवासाला धरण भरले

मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकात अतिवृष्टीचा इशारा

PHOTO : महालक्ष्मी एक्सप्रेस पूराच्या पाण्यात अडकली

केवळ स्पर्श आणि आवाजाची मदत, 450 फूट कातळधार धबधब्यावर अंध ट्रेकरचं यशस्वी रॅपलिंग

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.