AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इम्रान खान जीवाची भीक मागत फिरतोय : योगी आदित्यनाथ

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ (Uttar Pradesh CM yogi adityanath) यांची दिल्लीत प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. या प्रचारसभेत त्यांनी काँग्रेस आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस यांच्यावर सडकून टीका केली.

इम्रान खान जीवाची भीक मागत फिरतोय : योगी आदित्यनाथ
| Updated on: Feb 01, 2020 | 9:24 PM
Share

नवी दिल्ली : “पूर्वीचं काँग्रेस सरकार पाकिस्तानच्या अणुबॉम्बला घाबरायचं. पाकिस्तानने पुलवाम्यात दहशतवाही हल्ला घडवून आणला. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानात एअर स्ट्राईक केला. त्यामुळे पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान आपल्याला घाबरला आहे. तो आता जीवाची भीक मागत फिरतोय”, असा घणाघात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला (Uttar Pradesh CM yogi adityanath).

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ (Uttar Pradesh CM yogi adityanath) यांची दिल्लीत प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. या प्रचारसभेत त्यांनी काँग्रेस आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर सडकून टीका केली.

“दिल्लीच्या विकासासाठी जे पैसे मंजूर होतात त्यांचा वापर विकास कामांसाठी केला जात नाही तर जे भारताविरोधी नारे देतात त्यांच्यासाठी वापरले जातात”, असा आरोप योगी आदित्यनाथ यांनी केला.

“काश्मीरमध्ये कलम 370 रद्द झाल्यामुळे ‘मोदी आहे तर शक्य आहे’, असं सिद्ध झालं आहे. काँग्रेस आणि केजरीवाल दगडफेक करणाऱ्यांचे समर्थन करत होते. आम्ही या दगडफेक करणाऱ्यांना यमलोकात पाठवायला सुरुवात केली. आम्ही अशा लोकांना बिर्याणी नाही तर गोळी खाऊ घालतो”, अशी टीका आदित्यनाथ यांनी केली.

योगी आदित्यनाथ यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करणाऱ्यांवर निशाणा साधला. “जे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या धोरणेला विरोध करतात तेच आंदोलन करत आहेत. काँग्रेस अयोध्येतील राम मंदिराला विरोध करत होते. तशाच प्रकारचा विरोध इंग्रज आणि मुघल करत होते. मात्र, मोदी सरकार आल्यानंतर आता राम मंदिर बांधलं जात आहे”, असा दावा योगी आदित्यनाथ यांनी केला.

दिल्लीत सध्या विधानसभा निवडणुकीचं वातावरण आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाच्या नेत्यांकडून प्रचारसभा घेतल्या जात आहेत. प्रचारसभांमध्ये नेतेमंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. दिल्लीत सर्वाधिक जागांवर सत्ता यावी, यासाठी भाजपकडून प्रचंड प्रयत्न केले जात आहेत.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत महाराष्ट्रातील भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्यादेखील प्रचारसभा घेण्यात आल्या. आज (1 फेब्रुवारी) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा घेण्यात आली. दिल्लीत एकीकडे विधानसभा निवडणुकीचे वातावरण आहे तर दुसरीकडे नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात दिल्लीतील काही भागांमध्ये आंदोलने केली जात आहेत. आता या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दिल्लीकर येत्या 8 फेब्रुवारीला होणाऱ्या मतदानात कुणाला निवडूण देतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.