AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळी सुट्टी संस्मरणीय करण्यासाठी ईशान्ये कडील ‘ही’ ठिकाणे करा एक्सप्लोर

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये, प्रत्येकाला काही दिवस विश्रांती घ्यायची असते. जर तुम्हीही या उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर ईशान्य भारतातील काही ठिकाणे तुमच्यासाठी सर्वोत्तम आहेत.

उन्हाळी सुट्टी संस्मरणीय करण्यासाठी  ईशान्ये कडील 'ही' ठिकाणे करा एक्सप्लोर
| Edited By: | Updated on: Apr 19, 2025 | 3:42 PM
Share

उन्हाळा सुरू झाला की शाळेच्या सुट्ट्या त्याचबरोबर ऑफिसच्या सुट्ट्या यामुळे प्रत्येकजण उन्हाळ्याच्या सुट्टीतील आंनद द्विगुणीत करण्यासाठी बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. जवळजवळ प्रत्येकालाच असे वाटते की हा उन्हाळा काहीतरी खास आणि संस्मरणीय असावा. गर्दी, रहदारी आणि आवाजापासून दूर, एखाद्या शांत आणि सुंदर ठिकाणी वेळ घालवला पाहिजे. जर तुम्हीही अशा ठिकाणाच्या शोधात असाल, तर भारताचा ईशान्य भाग तुमच्यासाठी एक परिपूर्ण ठिकाण असू शकते.

ईशान्य भारताचा हा भाग असा आहे, ज्याला अनेकदा हिडन पॅराडाईस म्हटले जाते. याचा अर्थ एक लपलेले स्वर्ग. येथील हिरवळ, पर्वत, धबधबे, ढगांनी झाकलेले दऱ्या, स्थानिक संस्कृती आणि शांत वातावरण हृदयस्पर्शी आहे. जर तुम्हाला नवीन ठिकाण एक्सप्लोर करायचे असेल तर आम्ही तुमच्यासाठी काही सर्वोत्तम ठिकाणे घेऊन आलो आहोत. चला तर मग त्याबद्दल जाणून घेऊयात…

गंगटोक

गंगटोक हे असे ठिकाण आहे, जे तेथील शांत दऱ्या, तिबेटी संस्कृती आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते. येथे तुम्हाला त्सोंगमो तलाव, नाथुला खिंड, रूप्वेमधून हिरवेगार पर्वत दिसतात. जर तुम्ही इथे फिरायला गेलात तर तुम्हाला याकवर राइडिंग, स्थानिक बाजारातून खरेदी आणि मठांमध्ये ध्यान करून एक वेगळा अनुभव घेता येईल.

शिलाँग

ढगांनी वेढलेले शिलाँग हे धबधबे, दऱ्या आणि संगीत संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. उमियम लेक, एलिफंट फॉल्स, शिलाँग पीक हे येथे पाहण्यासारखे ठिकाण आहेत. जर तुम्ही इथे गेलात तर स्थानिक बँडचे लाईव्ह संगीत ऐका, स्थानिक जेवणाचा आस्वाद घ्या आणि शांततेचे क्षण या ठिकाणी घालवा.

तवांग

तवांग हे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे जे उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवण्यासाठी योग्य आहे. बर्फाळ डोंगर, मठ आणि निळे आकाश यांच्यामध्ये वसलेले हे छोटे शहर मनाला शांत करणारे ठिकाण आहे. येथे तुम्ही तवांग मठ म्हणजे भारतातील सर्वात मोठा बौद्ध मठ, बुम ला पास एक्सप्लोर करू शकता. तुम्ही येथे ध्यान आणि हायकिंग देखील करू शकता.

जोरहाट

जोरहाट येथील शांत वातावरण, तेथील निसर्ग आणि हिरवळ त्यासोबतच त्या ठिकाणचा इतिहास प्रवाशांसाठी खास बनतो. जर तुम्हाला इतिहासात रस असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी योग्य आहे. येथे जगातील सर्वात मोठे नदीचे माजुली बेट आहे. या ठिकाणी तुम्हाला एक सुंदर चहाचे मळे देखील पाहायला मिळतील. इथे आलात तर बोटिंगचा आनंद घ्या. स्थानिक हस्तकला पहा आणि चहाच्या बागांना भेट द्या.

ऐझॉल

ऐझॉल येथील डोंगराळ रस्त्यांमध्ये आणि शांत वातावरणात वेळ घालवणे एखाद्या थेरपीसारखे वाटते. येथे भेट देण्यासाठी डर्टलांग हिल्स, मिझोरम राज्य संग्रहालय, रीक गाव आहे. येथील स्थानिक पारंपारिक नृत्याचा आनंद घेऊन तेथील गावाचा साधेपण असलेल्या संस्कृतीचा अनुभव घ्या.

Follow Us
कुठलं काय, अरे... तो एक प्रश्न अन् एकनाथ शिंदे संतापले, पहा व्हिडीओ...
कुठलं काय, अरे... तो एक प्रश्न अन् एकनाथ शिंदे संतापले, पहा व्हिडीओ....
सोनं, कपडे घेतले अन् मंडपात उभं राहायला नकार, PSI कडून मोठी फसवणूक...
सोनं, कपडे घेतले अन् मंडपात उभं राहायला नकार, PSI कडून मोठी फसवणूक....
ठाणे विधान परिषदेबाबत मोठं घडणार? बहुजन विकास आघाडीचे नेते शिंदेंना...
ठाणे विधान परिषदेबाबत मोठं घडणार? बहुजन विकास आघाडीचे नेते शिंदेंना....
आमदारांचे स्टिकर लावून फिरणाऱ्याची पोलिसांनी काढली हवा! शिरूरमध्ये पोल
आमदारांचे स्टिकर लावून फिरणाऱ्याची पोलिसांनी काढली हवा! शिरूरमध्ये पोल.
कांदा मोर्चात सपकाळांची जीभ घसरली; मोदींवर टीका करताना वादग्रस्त....
कांदा मोर्चात सपकाळांची जीभ घसरली; मोदींवर टीका करताना वादग्रस्त.....
दिल्लीत अमित शाहांची भेट का घेतली, एकनाथ शिंदेंच्या उत्तराने चर्चेला..
दिल्लीत अमित शाहांची भेट का घेतली, एकनाथ शिंदेंच्या उत्तराने चर्चेला...
कांदाप्रश्न सोडव्यासाठी थेट दिल्लीला साकडं, सरकारचं शिष्टमंडळ राजधानीत
कांदाप्रश्न सोडव्यासाठी थेट दिल्लीला साकडं, सरकारचं शिष्टमंडळ राजधानीत.
आता काही खरं नाही! मोटेगावकरचा पाय आणखी खोलात, NEET स्पेशल बॅचबाबत...
आता काही खरं नाही! मोटेगावकरचा पाय आणखी खोलात, NEET स्पेशल बॅचबाबत....
महायुतीतील तिढा आज सुटणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक
महायुतीतील तिढा आज सुटणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक.
इंधन संकटामुळे ST महामंडळ अलर्ट मोडवर; प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय!
इंधन संकटामुळे ST महामंडळ अलर्ट मोडवर; प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय!.