AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मेंदूला तीक्ष्ण करण्यासाठी, ‘या’ 5 गोष्टी खाण्यास करा सुरुवात

मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी तसेच स्मरणशक्ती मजबूत व्हावी आणि मानसिक थकवा दूर करण्यासाठी आपण योग्य आहार घेत असतो. अशातच या बदलत्या काळात मेंदू निरोगी ठेवण्यासाठी काय खावे ते आपण जाणून घेऊयात.

मेंदूला तीक्ष्ण करण्यासाठी, 'या' 5 गोष्टी खाण्यास करा सुरुवात
| Edited By: | Updated on: Jul 17, 2025 | 2:10 PM
Share

रोजच्या या धकाधकीच्या जीवनात आपली जीवनशैली बदलत चालेली आहे. तसेच बदलत्या खाण्यापिण्याच्या सवयी आपल्या आरोग्याबरोबरच आपल्या मेंदूवरही परिणाम करत आहेत. कारण अनेकदा आपला आहार ठरवताना, आपण जे खात आहोत त्याचा आपल्या मेंदूवर काय परिणाम होईल याकडे आपण लक्ष देत नाही. आपला मेंदू निरोगी ठेवण्यासाठी, आपल्या आहारात असे पदार्थ समाविष्ट करणे महत्वाचे आहे, जे पौष्टिकतेने समृद्ध असतात आणि मेंदूचे कार्य वाढविण्यास मदत करतात.

काही पदार्थ मेंदूला तीक्ष्ण बनवण्यास, स्मरणशक्ती मजबूत करण्यास, मानसिक थकवा दूर करण्यास मदत करतात. म्हणून तुमच्या आहारात या पदार्थांचा समावेश करणे तुमच्या मेंदूच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. चला जाणून घेऊयात कोणत्या पदार्थांचे सेवन केले पाहिजे.

अक्रोड

अक्रोड हा मेंदूसाठी सर्वात फायदेशीर ड्रायफ्रूट मानला जातो. तो केवळ मेंदूसारखा दिसत नाही तर त्याच्या सेवनाने मेंदूला अनेक प्रकारे फायदा होतो. अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड, व्हिटॅमिन ई, अँटीऑक्सिडंट्स आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात , जे मेंदूच्या पेशींना निरोगी ठेवतात.

दररोज अक्रोड खाल्ल्याने स्मरणशक्ती सुधारण्यास, मानसिक थकवा दूर करण्यास आणि डिमेंशियासारख्या आजारांना प्रतिबंध करण्यास मदत होते. म्हणून दररोज 2-3 अक्रोड पाण्यात भिजवून खा.

हळद

हळदीमध्ये कर्क्यूमिन कंपाऊंड असते, जे पॉवरफुल अँटिऑक्सिडंट्स आणि दाहक-विरोधी गुणधर्मांनी समृद्ध असते. यामुळे मेंदूमध्ये येणारी सुज कमी करते आणि नवीन मेंदूच्या पेशी तयार करण्यास मदत करते. त्यामुळे हळदीचे सेवन केल्याने मेंदूची कार्य करण्याची क्षमता वाढते. नैराश्य आणि ताण कमी होतो. तसेच अल्झायमरचा धोका देखील कमी होतो. म्हणून रोज अर्धा चमचा हळद एका ग्लास दुधात मिक्स करून प्या.

डार्क चॉकलेट

डार्क चॉकलेटमध्ये कोको फ्लेव्होनॉइड्स, कॅफिन आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे मेंदूची काम करण्याची क्षमता वाढवतात. तसेच मूड देखील सुधारते आणि ताण कमी होते. डार्क चॉकलेट खाल्ल्याने लक्ष केंद्रित करण्यासोबतच एकाग्रता वाढते. मानसिक थकवा दूर होतो आणि स्मरणशक्ती तीक्ष्ण होते. म्हणून, तुम्ही दररोज 20-30 ग्रॅम डार्क चॉकलेट खाऊ शकता. लक्षात ठेवा की त्यात जास्त कोको आणि कमी साखर असावी.

ब्लूबेरी

ब्लूबेरीमध्ये अँथोसायनिन अँटीऑक्सिडंट्स असतात, जे मेंदूच्या पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात. याच्या सेवनाने स्मरणशक्ती सुधारण्यास आणि वयानुसार येणारी मानसिक कमजोरी टाळण्यास मदत होते. ब्लूबेरी खाल्ल्याने मेंदूची वृद्धत्व प्रक्रिया मंदावते. शिकण्याची क्षमता वाढते आणि न्यूरॉन्समधील संक्रमण सुधारते. म्हणून तुमच्या आहारात ब्लूबेरीचा नक्कीच समावेश करा.

हिरव्या पालेभाज्या

पालक, मेथी आणि ब्रोकोली यासारख्या हिरव्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन के, फोलेट, बीटा-कॅरोटीन आणि ल्युटीन असते, जे मेंदूसाठी खूप फायदेशीर असतात. या हिरव्या पालेभाज्यांमध्ये असलेले पोषक तत्व स्मरणशक्ती तीक्ष्ण करतात आणि मानसिक कमजोरी दूर करतात. पालेभाज्यांच्या सेवनाने डोक्यामधील सुज कमी होते. मानसिक सतर्कता वाढते आणि अल्झायमरचा धोका देखील कमी होतो. म्हणून, दररोज हिरव्या पालेभाज्याचे सॅलड, सूप किंवा भाजीच्या स्वरूपात खा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.