AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजीपाला शेतीमुळे शेतकऱ्याचे नशीब चमकले! नेमकं काय केलं? जाणून घ्या

भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि येथील प्रत्येक शेतकर्‍यांने शेतीत वेगवेगळे प्रयोग करून शेती व्यवसायाला एका उंचीवर ठेवले आहे.

भाजीपाला शेतीमुळे शेतकऱ्याचे नशीब चमकले! नेमकं काय केलं? जाणून घ्या
Vegetable FarmingImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Edited By: | Updated on: Mar 09, 2025 | 7:02 PM
Share

त्रिपुराचे शेतकरी अमर सरकार यांनी हंगामी भाजीपाल्याची लागवड सुरू करून मोठे यश मिळवले आहे. तो राज्यभरातील टॉप हॉटेल्सला ताज्या भाज्यांचा पुरवठा करतो आणि चांगले कमवतो. अमर सरकार हा शेतकरी गेल्या 12 वर्षांपासून शेती करत आहेत. त्याने सांगितले की फ्लॉवर आणि कोबी सारख्या ऑफ सीझन भाज्या त्रिपुरामध्ये खूप महाग आहेत.

केंद्र सरकारचे असे म्हणणे आहे की शेतकऱ्यांनी केवळ पारंपारिक शेतीवर अवलंबून न राहता शेतीचे नवे आयाम स्वीकारून त्यांचे उत्पन्न वाढवावे. यावर केंद्र आणि राज्य सरकारे आता भर देत आहेत. त्याचबरोबर शेतकरी देखील जागरूक होत आहेत आणि समजून घेत आहेत की केवळ पारंपारिक शेतीमुळे त्यांचे उत्पन्न वाढणार नाही.

अशा परिस्थितीत फळबाग आणि औषधी पिकांकडे शेतकर्‍यांची वाटचाल सुरू आहे. त्याचबरोबर त्यांना नव्या पद्धतींचा अवलंब करावा लागणार असल्याचेही समजत आहे. याच क्रमाने त्रिपुराचे शेतकरी अमर सरकार यांनी हंगामी भाजीपाल्याची लागवड सुरू करून मोठे यश मिळवले आहे. ते राज्यभरातील टॉप हॉटेल्सना भाज्यांचा पुरवठा करत आहे.

उच्च दर्जाच्या भाज्यांच्या वाढत्या मागणीकडे दिले लक्ष

अमर सरकार हे शेतकरी गेल्या 12 वर्षांपासून शेती करत आहेत. उच्च दर्जाच्या भाज्यांची वाढती मागणी त्यांनी लक्षात घेतली आणि या संधीचे भांडवल करून स्वत:ला नवीन उपक्रमासाठी सज्ज केले. फुलकोबी आणि कोबी यांसारख्या हिवाळ्यातील भाज्यांवर लक्ष केंद्रित करून अमर सरकार यांना बराच फायदा झाला आहे. विशेषत: जेव्हा या पिकांचे भाव वाढलेले असतात. अमरचे शेतीतील कौशल्य आणि धोरणात्मक दृष्टिकोन यामुळेच त्याला उच्च दर्जाची पिके घेण्यास मदत झाली. तसेच प्रिमियम भाज्यांचा सातत्यपूर्ण पुरवठा करण्यास तो सक्षम बनला.

त्रिपुरामध्ये ऑफ-सीझन भाज्या महागल्या

शेतकरी अमर सरकार म्हणाला की, फ्लॉवर आणि कोबीसारख्या ऑफ-सीझन भाज्या त्रिपुरामध्ये खूप महाग मिळतात. विशेषत: यंदा या भाज्यांचे दर बऱ्यापैकी चांगले होते. मालाला जास्त भाव मिळाल्याने भाजीपाला शेतीत आनंद मिळतो.

मोठमोठ्या हॉटेल्समध्ये पोहोचल्या ताज्या भाज्या

अमर म्हणाले की, चेरी टोमॅटो, लीफ लेट्युस, आइस लेट्युस, रेड लेट्युस, स्प्रिंग ओनियन आणि चायनीज कोबी ही उत्पादने त्रिपुरातील पंचतारांकित, 4 तारांकित आणि 3 तारांकित हॉटेल्समध्ये पोहोचत आहेत. हॉटेल चेन व्यतिरिक्त, तो बऱ्याच ठिकाणी ताज्या भाज्यांचा पुरवठा करतो, ज्यामुळे त्याची बाजारपेठ वाढते.

प्रत्येकाने शेतीत इंटरेस्ट घ्यायला हवा

अमर सरकार पुढे म्हणाला की, तो सुमारे 12 ते 13 वर्षांपासून हिवाळी भाजीपाल्याची लागवड करत आहेत. त्याचे राज्य सरकारनेही कौतुक केले. मी चेरी टोमॅटो, लीफ लेट्युस, आइस लेट्यूस, रेड लेट्युस, स्प्रिंग ओनियन्स आणि चायनीज कोबी यासह विविध प्रकारच्या भाज्या पिकवतो. या कामाच्या माध्यमातून मला मोठे यश मिळाले असून मला खूप आनंद सुद्धा होत आहे. मी प्रत्येकाला शेतीत इंटरेस्ट घेऊन त्यात उज्वल भविष्य निर्माण करण्यासाठी प्रोत्साहित करतो. कारण हा एक फायद्याचा आणि लाभदायक प्रयत्न असू शकतो. माझ्या मेहनतीचे फळ पाहून मला खूप आनंद होतो

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.