AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त ‘ही’ एक गोष्ट पाण्यात मिक्स करा, तुमचे केस होतील मुलायम आणि चमकदार

आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांचे केस गळण्याच्या समस्या उद्भवत आहे. तर या त्रासापासून मुक्तता मिळवण्यासाी तुम्ही असा घरगुती उपाय शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक सुरक्षित, स्वस्त आणि प्रभावी घरगुती उपाय घेऊन आलो आहोत. हा उपाय तुमचा वेळ देखील कमी घेऊन लवकर परिणाम दाखवेल. तर हा घरगुती उपाय काय आहे ते आपण आजच्या या लेखात जाणून घेऊयात...

फक्त 'ही' एक गोष्ट पाण्यात मिक्स करा, तुमचे केस होतील मुलायम आणि चमकदार
hair fallImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 01, 2025 | 4:27 PM
Share

वाढती उष्णता आणि धुळीमुळे केस गळणे, पातळ होणे आणि केसांमध्ये कोरडेपणा निर्माण होणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. आपल्यापैकी प्रत्येक महिला या समस्यांमुळे खूप त्रस्त आहेत. केस गळतीमुळे केस खूप पातळ होतात आणि त्यांची उब देखील कमी होते. अशा समस्यांमुळे तुमच्या लूकवरही परिणाम करतात. केस गळणे आणि केसांशी संबंधित इतर समस्यांपासून मुक्तता मिळवण्यासाठी अनेक महिला बाजारातून मिळणारे शाम्पू, तेल, सीरम आणि अगदी हेअर मास्क देखील वापरतात. परंतु यापैकी बहुतेक उत्पादनांमध्ये असे कॅमिकल असतात जी तुमचे केस दुरुस्त करण्याऐवजी त्यांना आणखी खराब करतात.

त्यामुळे नैसर्गिक गोष्टींनी केसांवर उपचार करणे चांगले. तथापि वेळेअभावी काही महिला घरगुती उपचारांचा वापर करू शकत नाहीत. पण घाबरून जाण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला एक जलद आणि सोपी ट्रिक्स सांगणार आहोत जी वापरण्यासाठी तुम्हाला फक्त काही मिनिटे लागतील. पण तुमचे केस जाड, मजबूत आणि चमकदार होतील. चला तर मग आजच्या या लेखात याबद्दल जाणून घेऊयात…

केसांसाठी गिलॉय

आयुर्वेदात अशा अनेक औषधी वनस्पतींचा उल्लेख आहे ज्या केसांसाठी अमृत मानल्या जातात. गिलॉय त्यापैकी एक आहे. हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अनेकदा ओळखले जाते, परंतु फार कमी लोकांना माहिती आहे की गिलॉय हे केसांसाठी एक चमत्कारिक औषध देखील आहे. जर तुम्ही गिलॉय पाण्यात उकळून केस धुतले तर ते तुमचे केस लांब आणि दाट तर करतेच, शिवाय केस गळणे आणि कोंडा यासारख्या समस्यांपासूनही मुक्तता मिळवते.

गिलॉय केसांसाठी कसे फायदेशीर आहे?

गिलॉयमध्ये अँटीऑक्सिडंट, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. हे सर्व गुणधर्म शरीराला आतून मजबूत बनवतातच, शिवाय स्कॅल्पचे आरोग्यही चांगले ठेवतात. केसांच्या मुळांना योग्य पोषण देण्यासाठी, स्कॅल्पमधील घाण साफ करण्यासाठी आणि मुळांपासून कोंडा यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी गिलॉय खूप प्रभावी आहे. हे रक्त शुद्ध करते, ज्यामुळे केसांना अंतर्गत पोषण मिळते आणि ते मुळांपासून मजबूत होतात.

गिलॉयने केस कसे धुवावेत

गिलॉयच्या काड्या नीट धुवा आणि त्यांचे लहान तुकडे करा. आता त्यांना 1 लिटर पाण्यात टाका आणि मंद आचेवर 10-15 मिनिटे उकळवा. पाणी अर्धे होऊन हलके हिरवे झाल्यावर गॅस बंद करा. हे पाणी थंड होऊ द्या आणि ते गाळून बाटलीत भरा. आता हे पाणी हळूहळू स्कॅल्पवर लावा आणि काही वेळ तसेच राहू द्या. नंतर साध्या पाण्याने केस धुवा. आठवड्यातून 2-3 वेळा असे केल्याने तुम्हाला फरक जाणवू लागेल.

गिलॉयने केस धुण्याचे फायदे

1. केसांची मुळे मजबूत होतात – गिलॉय रक्त स्वच्छ करते आणि स्कॅल्पमधील रक्त परिसंचरण सुधारते, ज्यामुळे केसांची मुळे खोलवर आणि मजबूत होतात आणि केस गळतीच्या समस्येपासून आराम मिळतो. हे कोंडा आणि संसर्ग कमी करण्यास देखील मदत करते.

2. केस लांब आणि जाड होतात – गिलॉयने नियमितपणे केस धुण्याने केसांची वाढ जलद होते. याच्या वापराने केस पूर्वीपेक्षा जाड, लांब, चमकदार आणि मजबूत दिसतात.

3. केसांचे अकाली पांढरे होणे थांबवते- गिलॉय केसांच्या मुळांना पोषण देते, ज्यामुळे अकाली पांढरे होण्याची शक्यता कमी होते. गिलॉयचा नियमित वापर केसांना नैसर्गिक चमक आणि मऊपणा आणतो, ज्यामुळे केस अधिक निरोगी आणि सुंदर दिसतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.