AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hair Care Tips | तुमच्या ‘या’ चुकांमुळेच केस होतात अकाली पांढरे! जाणून घ्या कोणत्या गोष्टी टाळाल

आपला चेहरा सुंदर दिसण्यात मेकअपचा मोठा वाटा आहेच, पण तितकाच महत्त्वाचा वाटा केसांचाही आहे. जर केस ठीक असतील आणि चांगली केशरचना केली असेल, तर संपूर्ण लुक बदलतो. परंतु, बऱ्याचदा केसांच्या काळजीच्या बाबतीत आपण निष्काळजी असतो, ज्यामुळे आपले केस कोरडे आणि निर्जीव होतात आणि अकाली पांढरे होऊ लागतात.

Hair Care Tips | तुमच्या ‘या’ चुकांमुळेच केस होतात अकाली पांढरे! जाणून घ्या कोणत्या गोष्टी टाळाल
पांढरे केस
| Edited By: | Updated on: Aug 06, 2021 | 2:38 PM
Share

मुंबई : आपला चेहरा सुंदर दिसण्यात मेकअपचा मोठा वाटा आहेच, पण तितकाच महत्त्वाचा वाटा केसांचाही आहे. जर केस ठीक असतील आणि चांगली केशरचना केली असेल, तर संपूर्ण लुक बदलतो. परंतु, बऱ्याचदा केसांच्या काळजीच्या बाबतीत आपण निष्काळजी असतो, ज्यामुळे आपले केस कोरडे आणि निर्जीव होतात आणि अकाली पांढरे होऊ लागतात.

एकदा पांढऱ्या केसांची प्रक्रिया सुरू झाली की, त्यावर नियंत्रण ठेवणे इतके सोपे नसते. चला तर, जाणून घेऊया अशा काही चुकांबद्दल ज्या अकाली पांढरे केस होण्याचे कारण बनतात. या चुका सुधारून, तुम्ही तुमचे केस पांढरे होणे थांबवू शकता आणि तुमचे केस निरोगी बनवू शकता.

नियमित तेल न लावणे

लहानपणापासूनच आपण सगळे आपल्या आईकडून रोज केसांमध्ये तेल लावण्याविषयी ऐकत आलो आहोत, पण तरीही आपण या बाबतीत निष्काळजी आहोत. कारण आपल्याला त्याचे महत्त्व समजत नाही. खरं तर, तेल केसांना पोषण देते आणि डोक्यातील रक्त परिसंचरण सुधारते. याशिवाय तेल मालिश त्वचेतील सेबम उत्पादन नियंत्रित करते, केसांना नैसर्गिक ओलावा मिळतो. यामुळे केस अकाली पांढरे कमी होणे कमी होते, तसेच केस कोरडे होणे आणि खाज येणे यासारख्या समस्याही दूर होतात.

रसायनांचा वापर

केस सुंदर आणि स्टायलिश दिसण्यासाठी आजकाल अनेक प्रकारचे प्रयोग केले जात आहेत. लोक रसायनांद्वारे कुरळे केस सरळ करतात आणि सरळ केस कुरळे करतात. याशिवाय केसांना रंग देण्याची एक फॅशन आहे. अशा स्थितीत लहान वयात केसांमध्ये तीव्र रसायनांचा वापर केल्याने केसांचे प्रचंड नुकसान होते. यामुळे केस गळू लागतात, निर्जीव होतात आणि पटकन पांढरे होऊ लागतात. म्हणून, केस शक्य तितके नैसर्गिक ठेवा आणि हीटिंग टूल्स वापरणे टाळा.

ताण तणाव

तणाव हे केस अकाली पांढरे होण्याचे मुख्य कारण मानले जाते. त्यामुळे जास्त ताण घेणे टाळावे. तणावामुळे आपल्याला आरोग्याशी संबंधित इतर समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते. तणाव टाळण्यासाठी ध्यानाची मदत घ्या.

चांगला आहार न घेणे

बाहेरचे जंक फूड आणि रिच फूड खाण्याची सवय तुम्हाला केवळ सर्व रोगांचे बळी बनवत नाही, तर केसांचे आरोग्यही बिघडवते आणि केस अकाली पांढरे होऊ लागतात. खरं तर, आपण जे खातो त्याद्वारे आपले शरीर आणि केस पोषित होत असतात. त्यामुळे डाळी, अंकुरलेली धान्य, फळे, हिरव्या भाज्या इत्यादींचा आपल्या आहारात समावेश करा.

(टीप : कोणताही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Hair Care Tips Your these mistakes cause premature graying of hair)

हेही वाचा :

Skin Care Tips : ‘हे’ 3 तेल मिक्स करून त्वचेला लावा आणि सुंदर त्वचा मिळवा!

Hair Loss : पावसाळ्यात केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी अंडी अत्यंत फायदेशीर!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.