AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ केल्याने खरंच ‘हे’ आजार होतात का? काय काळजी घ्यावी?

रात्री आंघोळ केल्याने दिवसभराचा थकवा दूर होऊन मन शांत होते व गाढ झोप लागते. त्वचा आणि केसांसाठीही ती फायदेशीर ठरते. तथापि, काही व्यक्तींना रात्री झोपण्यापू्र्वी अंघोळ केल्याने त्रास होतो. हे जार होण्याची शक्यता असते. त्यासाठी योग्य काळजी घेणे महत्त्वाचे असते.

रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ केल्याने खरंच 'हे' आजार होतात का? काय काळजी घ्यावी?
before going to bed What diseases can be caused by taking a bath at nightImage Credit source: tv9 marathi
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Nov 26, 2025 | 5:51 PM
Share

अंघोळ केल्याने शरीराचा जवळपास निम्मा थकवा निघून जातो. आणि शरीर शांत, तणावमुक्त होतं. त्यामुळे सकाळी आळस जाऊन ताजेतवाने वाटावे म्हणून अंघोळ करतो. काहीजण रात्री झोपण्याआधी अंघोळ करतात जेणेकरून शरीराचा थकवा दूर होतो. रात्री आंघोळ करण्याच्या बऱ्याच फायद्यांबद्दलही आपण ऐकलं असेल. दिवसभराच्या धावपळीनंतर, धूळ आणि ताणतणावानंतर, रात्री आंघोळ केल्याने शरीराला आराम मिळतोच, शिवाय मन आणि त्वचेसाठीही वरदान ठरू शकते. तसेच त्यामुळे गाढ झोप लागते. त्वचा देखील चांगले होते. आणि मनही शांत होते.

रात्री आंघोळ केल्याने कोणते आजार होऊ शकतात?

पण रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ करण्याचे जसे फायदे आहेत तसेच त्याचे तोटे देखील आहेत. रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ केल्याने काहींना त्रासही होऊ शकतो. रात्री अंघोळ केल्याने काहींना सर्दी, डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. तसेच इरिटेबल बोवेल सिंड्रोमची लक्षणे वाढू शकतात. त्यामुळे सर्दी होण्याची शक्यता असते.

रात्री आंघोळ करण्याचे फायदे

रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ करण्याचे अनेक फायदे देखील आहे. झोप चांगली येते. जर तुम्हाला रात्री झोप लागण्यास त्रास होत असेल, तर झोपण्यापूर्वी आंघोळ केल्याने शांत झोप येते. कोमट पाण्याने आंघोळ केल्याने शरीराचे तापमान थोडे वाढते तसेच मेंदूला आराम जाणवतो. डोक्यात चाललेले विचार कमी होतात. ज्यामुळे शरीर झोपेसाठी तयार होते. म्हणूनच अनेक तज्ज्ञ रात्री चांगल्या झोपेसाठी आंघोळ करण्याचा सल्ला देतात.

ताण आणि थकवा यापासून आराम

दिवसभराच्या व्यस्ततेनंतर, शरीर आणि मन दोन्ही थकून जातात. अशा परिस्थितीत, रात्री आंघोळ करणे हे डिटॉक्स थेरपीचे एक रूप आहे. पाण्यातील थंडपणा किंवा उबदारपणा स्नायूंना आराम मिळतो. रक्ताभिसरण सुधारतो आणि मानसिक ताण कमी होतो. बरेच लोक याला “डे-एंड क्लींज” असेही म्हणतात.

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर

रात्री आंघोळ करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्वचेची काळजी घेणे. दिवसभर प्रदूषण, धूळ आणि घामाने भिजलेली त्वचा झोपण्यापूर्वी स्वच्छ न केल्यास एलर्जी होऊ शकते. रात्री आंघोळ केल्याने नैसर्गिकरित्या शरीर स्वच्छ होते, दुर्गंध दूर होतो. तसेच केसांमधील घाण देखील काढून टाकते. म्हणून, रात्री आंघोळ करणे चांगले आहे पण तेवढी काळजी देखील घेतली घेतली पाहिजे. जेणेकरून त्रास होणार नाही.

Follow Us
पवनराजे निंबाळकर हत्येच्या केसच्या सुनावणीत असं काय घडलं? ओमराजे...
पवनराजे निंबाळकर हत्येच्या केसच्या सुनावणीत असं काय घडलं? ओमराजे निंबाळकर स्पष्टच बोलले...
शरद पवारांना मोठा धक्का? राष्ट्रवादीचे 6 नगरसेवक नॉट रिचेबल
Nagpur | शरद पवारांना मोठा धक्का? राष्ट्रवादीचे 6 नगरसेवक नॉट रिचेबल; भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा!
अशा लोकांमुळे पंढरपूर अशुद्ध झाले... रोहित पवारांच्या आंदोलनानंतर भाजप
अशा लोकांमुळे पंढरपूर अशुद्ध झाले... रोहित पवारांच्या आंदोलनानंतर भाजप नेत्याची जोरदार टीका
रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडलं; सक्षणा सलगर आक्रमक
Sakshana Salgar | रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडलं; सक्षणा सलगर आक्रमक, पंढरपुरात पेटला नवा राजकीय वाद!
मोठी बातमी! राष्ट्रवादीतील रिक्त पदांवर नवीन नियुकत्या; चाकणकरांच्या
मोठी बातमी! राष्ट्रवादीतील रिक्त पदांवर नवीन नियुकत्या; रुपाली चाकणकरांच्या जागी या नावाची चर्चा, राजकारणात मोठं घडणार?
राऊतांचा मोठा दावा; शिवसेनेचे सर्व 9 खासदार ठाकरेंसोबतच!
Sanjay Raut UNCUT | ऑपरेशन टायगरच्या चर्चांदरम्यान राऊतांचा मोठा दावा; शिवसेनेचे सर्व 9 खासदार ठाकरेंसोबतच!
ठाकरेंच्या कार्यक्रमाकडे नजर, शिंदेंची तयारी जोरात; 19 जूनला नेमकं काय
Uddhav Thackeray | Eknath Shinde | ठाकरेंच्या कार्यक्रमाकडे नजर, शिंदेंची तयारी जोरात; 19 जूनला नेमकं काय घडणार?
तर मी पंतप्रधानांना भेटेन, राष्ट्रहितासाठी... संजय राऊतांचं हे विधान
Sanjay Raut | 'तर मी पंतप्रधानांना भेटेन, राष्ट्रहितासाठी... संजय राऊतांचं हे विधान इतकं चर्चात का? राजकारणात मोठी खळबळ
मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! तलावात फक्त 10% पाणी शिल्लक?
Mumbai Water Shortage | मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! तलावात फक्त 10% पाणी शिल्लक पुढच्या आठवड्यापासून मोठी पाणीकपात?
7 खासदार फुटणार? चर्चांना उधाण; ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, ते खासदार..
मोठी बातमी! 7 खासदार फुटणार? चर्चांना उधाण; उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, ते खासदार....