AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ 4 कारणांमुळे झोपण्याआधी अंघोळ नक्की करावी; जाणून आश्चर्य वाटेल

रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ करणे गरजेचे असते. त्यामागे नेमकी काय कारणे आहेत? चला जाणून घेऊया...

'या' 4 कारणांमुळे झोपण्याआधी अंघोळ नक्की करावी; जाणून आश्चर्य वाटेल
Shower at nightImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 20, 2025 | 3:33 PM
Share

निरोगी राहण्यासाठी दररोज आंघोळ करणे आवश्यक आहे. सकाळी उठून आंघोळ केल्याने ताजेतवाने वाटते. मन प्रसन्न होते. आंघोळीमुळे आपल्या संपूर्ण शरीराची स्वच्छता होते. यामुळे शरीरावर साचलेले जंतू नष्ट होतात. थकवा दूर होतोच, शिवाय तुम्ही ताजेतवाने आणि उत्साही वाटता. तुम्ही तुमच्या घरातील वृद्धांना पाहिले असेल, ते दररोज सकाळी आंघोळ करूनच कोणतेही काम करतात.

मात्र, आजच्या पिढीचा आंघोळीचा वेळ निश्चित नसतो. ते सकाळी, दुपारी, संध्याकाळी कधीही आंघोळ करतात. काही लोकांना रात्री आंघोळ न केल्यास झोपच लागत नाही. पण आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, आंघोळीचाही एक योग्य वेळ असतो. सकाळी आणि रात्री आंघोळ केल्याने आपल्याला अनेक फायदे मिळतात. आम्ही तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ करण्याच्या फायद्यांबद्दल सांगणार आहोत. चला, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया-

वाचा: कोलेस्ट्रॉलची ‘ही’ लक्षणे जाणवतायेत? गोळ्या न घेता घरच्या घरी करा रामबाण उपाय

त्वचेसाठी फायदेशीर

धूळ आणि प्रदूषणामुळे आपल्या त्वचेवर घाण साचते. यामुळे मुरुम, डाग आणि चट्टे यांसारख्या समस्या उद्भवतात. यामुळे ऍलर्जीचा धोकाही कमी होतो. तुम्ही अनेकांना पाहिले असेल की, ते झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करतात. अशा वेळी जर तुम्ही रात्री आंघोळ केली तर चेहऱ्यासह संपूर्ण शरीराची स्वच्छता होते.

चांगली झोप लागते

जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी शॉवर घेतला तर तुमचा थकवा दूर होतो. यामुळे तुम्हाला चांगली झोप लागते. आपण सर्वजण दिवसभराच्या धावपळीनंतर घरी परतलो की खूप थकल्यासारखे वाटते. खरं तर, दिवसभराच्या धावपळीनंतर रात्री घरी परतलो की आपले शरीर पूर्णपणे थकते. यामुळे काहींना रात्री झोप न येण्याची समस्या उद्भवते. अशा वेळी रात्री आंघोळ केल्याने थकवा दूर होतो आणि तुम्ही ताजेतवाने वाटता.

तणाव कमी होतो

दिवसभर काम केल्यानंतर लोकांना तणाव येतो. यामुळे चिडचिडेपणाची समस्याही उद्भवू शकते. जर तुम्ही रात्री शॉवर घेतला तर तुमचा मूड चांगला होईल आणि तुम्ही ताजेतवाने वाटाल.

स्नायू दुखण्यापासून आराम

रात्री आंघोळ केल्याने थकवा दूर होतो. यामुळे डोकेदुखी, स्नायू आणि सांधेदुखी यांपासूनही आराम मिळतो. तुम्ही दररोज रात्री झोपण्यापूर्वी नक्की आंघोळ करा. मात्र, तुम्हाला काही त्रास जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सकाळी आंघोळ करू नये का?

जर तुम्ही रात्री शॉवर घेत असाल तर तुम्ही सकाळी उठूनही आंघोळ करू शकता. यामुळे तुम्ही दिवसभर ताजेतवाने राहाल. तुमची ऊर्जा कायम राहील.

मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: सीलबंद लिफाफा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: सीलबंद लिफाफा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे.
मुंबईकरांची कोंडी! पारा घसरला तरी खराब हवेची चिंता कायम
मुंबईकरांची कोंडी! पारा घसरला तरी खराब हवेची चिंता कायम.
किशोरी पेडणेकरांवर संतोष धुरींची टीका; अशा बांगेला विचारतंय कोण?
किशोरी पेडणेकरांवर संतोष धुरींची टीका; अशा बांगेला विचारतंय कोण?.
आजोबा मोठे, काका मोठे अन् मी..; ट्रोलर्सना रोहित पवारांचं सडेतोड उत्तर
आजोबा मोठे, काका मोठे अन् मी..; ट्रोलर्सना रोहित पवारांचं सडेतोड उत्तर.
सत्ता आणि ताकदीचा वापर करून तपास करा, रोहित पवारांची मागणी
सत्ता आणि ताकदीचा वापर करून तपास करा, रोहित पवारांची मागणी.
एजन्सीचं ते स्टेटमेंट हास्यास्पद! रोहित पवारांची टीका
एजन्सीचं ते स्टेटमेंट हास्यास्पद! रोहित पवारांची टीका.
रोहित पवार यांचे डीजीसीएच्या विमान अपघात चौकशीवर प्रश्नचिन्ह
रोहित पवार यांचे डीजीसीएच्या विमान अपघात चौकशीवर प्रश्नचिन्ह.
विमान मुद्दाम आदळण्यात आलं? रोहित पवारांकडून खळबळजनक आरोप
विमान मुद्दाम आदळण्यात आलं? रोहित पवारांकडून खळबळजनक आरोप.
25 फेब्रुवारीला स्वीकृत नगरसेवकांची घोषणा होणार
25 फेब्रुवारीला स्वीकृत नगरसेवकांची घोषणा होणार.
हे चोरालाच पोलिसाचे काम दिल्यासारखे! रोहित पवारांची खोचक टीका
हे चोरालाच पोलिसाचे काम दिल्यासारखे! रोहित पवारांची खोचक टीका.