AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मधुमेहाच्या रूग्णांसाठी संजीवनी ठरते ‘हे’ कच्च फळ, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे….

Raw Papaya Benefits for Diebeties: कच्चा पपई मधुमेह, पचन, वजन कमी करणे, त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे. त्यात पपेन, फायबर, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे तुमच्या त्वचेला योग्य पोषण मिळण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया कच्च्या पपईचे फायदे.

मधुमेहाच्या रूग्णांसाठी संजीवनी ठरते 'हे' कच्च फळ, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे....
DibeticImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Edited By: | Updated on: Mar 15, 2025 | 4:05 PM
Share

निरोगी आरोग्यासाठी तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. तुमच्या आहारामध्ये योग्य प्रमाणात पोषक घटकांचा समावेश केल्यामुळे तुमचं शरीर निरोगी राहाते. बदलत्या ऋतूमध्ये तुमच्या आरोग्याची काळजी घेणे कठीण होते. वातावरणातील बदलामुळे तुम्हाला संसर्गाचे आजार होऊ शकतात. त्यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढणे गरजेचे असते. तुमच्या आहारामध्ये विविध प्रकारच्या फळांचा आणि भाज्यांचा समावेश केल्यास तुमच्या शरीराला फायदे होतात. फळांमध्ये आणि भाज्यांमध्ये नैसर्गिकरित्या पोषण असते ज्यामुळे तुम्ही तंदुरूस्त राहाता. फळांपैकी एक म्हणजे कच्ची पपई. कच्ची पपई खाल्ल्यामुळे तुमच्या आरोग्याला आनेक फायदे होतात.

कच्च्या पपईचा तुमच्या आहारात नियमित सेवन केल्यामुळे तुमच्या आरोग्याला फायदा होता. तज्ञांच्या मते तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे परंतु, कच्ची पपई खाल्ल्यामुळे तुमच्या आरोग्याला नेमकं काय फायदे होतात हे अजही अनेकांना माहिती नाही. आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि चुकिच्या खाण्या पिण्याच्या सवयींमुळे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. परंतु तुम्ही नियमित कच्ची पपई खाल्ल्यामुळे मधुमेहाच्या रूग्णांसाठीही फायदेशीर ठरेल.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर: कच्चा पपई मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. त्यात पपेन नावाचे एंजाइम असते, जे शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. मधुमेहाच्या रुग्णांनी नियमितपणे कच्च्या पपईचे सेवन केल्यास त्यांना साखर नियंत्रित करण्यास खूप मदत होऊ शकते.

पचनसंस्था मजबूत करते: कच्ची पपई खाल्ल्याने पचनसंस्था मजबूत होते. त्यामध्ये फायबर आणि पपेन असते, ज्यामुळे तुमचं पचन सुधारते आणि बद्धकोष्ठता, गॅस आणि इतर पचन समस्यांपासून आराम देते.

वजन कमी करण्यास उपयुक्त: जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर कच्च्या पपईचे सेवन करा. वजन कमी करण्यासाठी हे खूप उपयुक्त आहे. कच्च्या पपईमध्ये फायबर आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे पोट भरलेले राहते आणि भूक कमी होते.

त्वचा निरोगी ठेवते : कच्ची पपई तुमची त्वचा देखील सुधारते. त्यात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचा निरोगी आणि चमकदार बनवतात. तुम्ही कच्च्या पपईची पेस्ट बनवू शकता आणि त्यात दूध आणि हळद घालून चेहऱ्यावर लावू शकता. यामुळे चेहऱ्यावर चमक येते.

केस निरोगी बनवते : कच्ची पपई केस निरोगी बनवण्यास मदत करते. तुम्ही कच्च्या पपईची पेस्ट बनवून केसांना लावू शकता. नंतर काही वेळाने ही पेस्ट थंड पाण्याने धुवा. यामुळे तुमचे केस निरोगी आणि मऊ होतील. तसेच कोंडा कमी करण्यास मदत होते.

डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.