कोरोना काळात दररोज प्या टोमॅटो आणि पालक रस, होतील अनेक फायदे ! 

कोरोना काळात घरात सुरक्षित राहून आपल्या आरोग्याची काळजी प्रत्येकालाच घ्यावी लागणार आहे.

कोरोना काळात दररोज प्या टोमॅटो आणि पालक रस, होतील अनेक फायदे ! 
पालक आणि टोमॅटोचा रस
Follow us
| Updated on: Jun 06, 2021 | 9:43 AM

मुंबई : कोरोना काळात घरात सुरक्षित राहून आपल्या आरोग्याची काळजी प्रत्येकालाच घ्यावी लागणार आहे. कोरोनापासून दूर राहण्यासाठी सर्वात महत्वाचे झाले की, आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे. जर आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर आपल्याला कोरोनाची लागण देखील होणार नाही. मात्र, यादरम्यान आपल्या आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी टोमॅटो आणि पालक रस पिणे फायदेशीर आहे. (Drink tomato and spinach juice daily during the corona period)

टोमॅटो रस घरच्या घरी कसा तयार करायचा हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हा रस पिल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. यासाठी एक ग्लास पाणी, मीठ आणि दोन टोमॅटो लागणार आहेत. सर्वात अगोदर पाणी गरम करण्यासाठी गॅसवर ठेवा आणि त्यात मीठ मिसळा. त्यानंतर टोमॅटोची पेस्ट बारीक करून घ्या आणि या गरम पाण्यात मिसळा. हे मिश्रण साधारण वीस ते तीस मिनिटे मंद गॅसवर ठेवा आणि गरमा गरम प्या. हा टोमॅटोचा रस आपण दररोज आहारात घेतला तर आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास नक्की मदत होईल.

टोमॅटो खाण्याने आपल्या शरीरातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते. कारण टोमॅटोमध्ये जवळापास 94 टक्के पाणी असते. यामुळे विशेष: उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये टोमॅटो जास्तीत-जास्त खाल्ले पाहिजे. ज्यांना उष्णतेचा त्रास होतो. अशा व्यक्तींनी तर दररोज सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी एक टोमॅटो तरी खाल्ले पाहिजे. यामुळे त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते. टोमॅटोमधील लाल रंग हा त्यातील लाइकोपीनमुळे प्राप्त होतो, जे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. पालकचा रस घरी तयार करण्यासाठी पालकाची सात ते आठ पान घ्या. मिक्सरमध्ये पालकाची बारीक पेस्ट तयार करून घ्या. आणि त्यामध्ये मीठ मिक्स करा.

हा रस आपण दररोज सकाळी रिकाम्या पोटी पिऊ शकतो. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल. पालकामध्ये कॅलरी, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, रेशे असतात. पालकामध्ये खनिज लवण म्हणजे कॅल्शियम, फॉस्फरस, क्लोरिन, लोह आणि जीवनसत्त्व ए, बी, सी आणि इ भरपूर प्रमाणात असते. विशेष म्हणजे पालक खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. पालकाचं सेवन केल्यामुळे शरीरातील फ्री रेडिकल्सला बाहेर काढण्यास मदत होते. या फ्री रेडिकल्समुळे कॅन्सरसारखे रोग होतात. पालकमध्ये ‘क’ जीवनसत्वाचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे हाडं मजबूत होतात.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

(Drink tomato and spinach juice daily during the corona period)

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.