AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जर तुम्हीही सकाळी रिकाम्या पोटी पाणी पित असाल तर हे नक्कीच जाणून घ्या

सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. जसे की पचन सुधारणे, शरीर शुद्ध करणे आणि चयापचय वाढवणे. परंतु, एकाच वेळी जास्त पाणी पिणे हे नुकसानकारकही ठरू शकते. जसे सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे फायदे असतात तसेच तोटेही काय असतात ते जाणून घेऊयात.

जर तुम्हीही सकाळी रिकाम्या पोटी पाणी पित असाल तर हे नक्कीच जाणून घ्या
Drinking Water on Empty Stomach, Benefits, Risks & How To Do It RightImage Credit source: tv9 marathi
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Aug 29, 2025 | 8:28 PM
Share

आरोग्याबाबत जागरूक राहायला किंवा निरोगी राहायला सर्वानाच आवडतं.त्यासाठी प्रत्येकजण काहीना काही उपाय करत असतात. या सवयींपैकी एक म्हणजे सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी पाणी पिणे. शरीर स्वच्छ ठेवण्याचा आणि ऊर्जा वाढवण्याचा हा एक सोपा मार्ग लोक मानतात. काही लोकांनी तो दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवला आहे, परंतु खरोखर हे फायदेशीर आहे का? आपण सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे फायदे आहेत तसेच त्याचे काही नुकसानही आहेत का हे जाणून घेऊयात.

काळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे फायदे काय आहेत?

पचन सुधारते

सकाळी पाणी पिल्याने पोट सहज साफ होण्यास मदत होते. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि पचनसंस्था हलकी आणि सक्रिय राहते.

शरीर डिटॉक्स होते

रिकाम्या पोटी पाणी पिणे हा शरीरातील घाण आणि विषारी पदार्थ काढून टाकण्याचा एक सोपा मार्ग आहे. ज्यामुळे रक्त शुद्ध होते आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत राहते.

चयापचय जलद होते

रिकाम्या पोटी पाणी पिल्याने आपल्या शरीरातील चयापचय क्रिया सक्रिय होते. कॅलरीज जलद बर्न होतात आणि वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही सवय खूप उपयुक्त ठरते.

त्वचा उजळवते

पाणी शरीराला हायड्रेट ठेवते, जर सकाळपासून योग्य प्रमाणात पाणी प्यायले तर त्वचा चमकते आणि मुरुमांसारख्या समस्या कमी होतात.

मेंदूला ऊर्जा मिळते.

उठल्यानंतर पाणी पिल्याने मनाला लगेच ताजेतवाने वाटते. यामुळे मूड चांगला राहतो आणि कामात लक्ष केंद्रित करण्यास, कामे लक्षात ठेवण्यास मदत होते.

मूत्रपिंडाचे काम सोपे करते

पाण्यामुळे, मूत्रपिंड शरीरातील अतिरिक्त मीठ आणि कचरा सहजपणे काढून टाकतात, ज्यामुळे त्यांचा भार कमी होतो.

नुकसान काय असू शकते

एकाच वेळी खूप जास्त पाणी पिणे टाळा

एकाच वेळी जास्त पाणी प्यायल्याने पोटफुगी आणि मळमळ किंवा पोटात जडपणा जाणवू शकतो.

रक्तदाबावर परिणाम

कमी रक्तदाब असलेल्या लोकांना अचानक जास्त पाणी प्यायल्याने चक्कर येऊ शकते किंवा अशक्तपणा जाणवू शकतो.

मूत्रपिंडांवर दबाव

जर जास्त पाणी प्यायले तर मूत्रपिंडांवर अतिरिक्त दबाव येऊ शकतो आणि ते आवश्यकतेपेक्षा जास्त काम करू लागतात. त्यामुळे वारंवार लघवीला येणे, पोटात दुखणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात.

इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता

शरीरातून मीठ आणि खनिजांचे जास्त प्रमाणाबाहेर नुकसान झाल्यास अशक्तपणा, थकवा आणि स्नायूंवर ताण यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

Follow Us
पुजाऱ्याच्या वेशात पप्पू यादव, हातात दानपेटी! राममंदिर प्रकरणावरून...
Delhi | पुजाऱ्याच्या वेशात पप्पू यादव, हातात दानपेटी! राममंदिर दानपेटी प्रकरणावरून दिल्लीत राजकीय रणकंदन
खडकवासला फुल्ल! 11 दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Pune | खडकवासला फुल्ल! 11 दरवाजे उघडले; प्रशासनाचा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
FDA ला हायकोर्टाचा दणका! 98% स्वच्छतेचा दावा ठरला खोटा
FDA ला हायकोर्टाचा दणका! मंत्रालयाच्या कँटीनमध्ये माश्या, धूळ; 98% स्वच्छतेचा दावा ठरला खोटा
भिवंडीत भीषण दुर्घटना! 4 मजली इमारत कोसळली; 9 जणांचा मृत्यू, अनेकजण...
Bhiwandi Building collapsed | भिवंडीत भीषण दुर्घटना! 4 मजली इमारत कोसळली; 9 जणांचा मृत्यू, अनेकजण अजुनही ढिगाऱ्याखाली
लाज वाटत नाही का? ही कोणती संस्कृती?; ठोंबरेंचा भाजप नगरसेविकेला सवाल
Rupali Thombare Patil | लाज वाटत नाही का? ही कोणती संस्कृती?; चिमुकल्यांकडून पाय धुऊन घेतल्याप्रकरणी ठोंबरेंचा भाजप नगरसेविकेला सवाल
विद्यार्थ्यांनी नाही, भाजपच्या गुंडांनी केली दगडफेक! दीपकेंचा आरोप
Abhijeet Dipke | विद्यार्थ्यांनी नाही, भाजपच्या गुंडांनी केली दगडफेक! अभिजीत दीपकेंचा गंभीर आरोप
अभिजित दिपकेंच्या आई-वडिलांना उद्धव ठाकरेंचा फोन!
Uddhav Thackeray | अभिजित दिपकेंच्या आई-वडिलांना उद्धव ठाकरेंचा फोन! आंदोलनाच्या यशानंतर मोठी चर्चा
तुकाराम मुंढेंचा दणका थेट हायकोर्टापर्यंत; नो लायसन्स, नो बिझनेस
मोठी बातमी! तुकाराम मुंढेंचा दणका थेट हायकोर्टापर्यंत; नो लायसन्स, नो बिझनेस, कँटीन बंद करण्याचे आदेश
अमित शाह संसदेत का नाही?; प्रियांका गांधी, खर्गेंसह विरोधकांचा संसद...
Sansad Bhavan Park | अमित शाह संसदेत का नाही?; प्रियांका गांधी, खर्गेंसह विरोधकांचा संसद भवनाबाहेर आंदोलन
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकारचं मोठं पाऊल
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकारचं मोठं पाऊल; विखे पाटलांनी दिली मोठी अपडेट, म्हणाले...