AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जर तुम्हीही सकाळी रिकाम्या पोटी पाणी पित असाल तर हे नक्कीच जाणून घ्या

सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. जसे की पचन सुधारणे, शरीर शुद्ध करणे आणि चयापचय वाढवणे. परंतु, एकाच वेळी जास्त पाणी पिणे हे नुकसानकारकही ठरू शकते. जसे सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे फायदे असतात तसेच तोटेही काय असतात ते जाणून घेऊयात.

जर तुम्हीही सकाळी रिकाम्या पोटी पाणी पित असाल तर हे नक्कीच जाणून घ्या
Drinking Water on Empty Stomach, Benefits, Risks & How To Do It RightImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 29, 2025 | 8:28 PM
Share

आरोग्याबाबत जागरूक राहायला किंवा निरोगी राहायला सर्वानाच आवडतं.त्यासाठी प्रत्येकजण काहीना काही उपाय करत असतात. या सवयींपैकी एक म्हणजे सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी पाणी पिणे. शरीर स्वच्छ ठेवण्याचा आणि ऊर्जा वाढवण्याचा हा एक सोपा मार्ग लोक मानतात. काही लोकांनी तो दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवला आहे, परंतु खरोखर हे फायदेशीर आहे का? आपण सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे फायदे आहेत तसेच त्याचे काही नुकसानही आहेत का हे जाणून घेऊयात.

काळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे फायदे काय आहेत?

पचन सुधारते

सकाळी पाणी पिल्याने पोट सहज साफ होण्यास मदत होते. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि पचनसंस्था हलकी आणि सक्रिय राहते.

शरीर डिटॉक्स होते

रिकाम्या पोटी पाणी पिणे हा शरीरातील घाण आणि विषारी पदार्थ काढून टाकण्याचा एक सोपा मार्ग आहे. ज्यामुळे रक्त शुद्ध होते आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत राहते.

चयापचय जलद होते

रिकाम्या पोटी पाणी पिल्याने आपल्या शरीरातील चयापचय क्रिया सक्रिय होते. कॅलरीज जलद बर्न होतात आणि वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही सवय खूप उपयुक्त ठरते.

त्वचा उजळवते

पाणी शरीराला हायड्रेट ठेवते, जर सकाळपासून योग्य प्रमाणात पाणी प्यायले तर त्वचा चमकते आणि मुरुमांसारख्या समस्या कमी होतात.

मेंदूला ऊर्जा मिळते.

उठल्यानंतर पाणी पिल्याने मनाला लगेच ताजेतवाने वाटते. यामुळे मूड चांगला राहतो आणि कामात लक्ष केंद्रित करण्यास, कामे लक्षात ठेवण्यास मदत होते.

मूत्रपिंडाचे काम सोपे करते

पाण्यामुळे, मूत्रपिंड शरीरातील अतिरिक्त मीठ आणि कचरा सहजपणे काढून टाकतात, ज्यामुळे त्यांचा भार कमी होतो.

नुकसान काय असू शकते

एकाच वेळी खूप जास्त पाणी पिणे टाळा

एकाच वेळी जास्त पाणी प्यायल्याने पोटफुगी आणि मळमळ किंवा पोटात जडपणा जाणवू शकतो.

रक्तदाबावर परिणाम

कमी रक्तदाब असलेल्या लोकांना अचानक जास्त पाणी प्यायल्याने चक्कर येऊ शकते किंवा अशक्तपणा जाणवू शकतो.

मूत्रपिंडांवर दबाव

जर जास्त पाणी प्यायले तर मूत्रपिंडांवर अतिरिक्त दबाव येऊ शकतो आणि ते आवश्यकतेपेक्षा जास्त काम करू लागतात. त्यामुळे वारंवार लघवीला येणे, पोटात दुखणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात.

इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता

शरीरातून मीठ आणि खनिजांचे जास्त प्रमाणाबाहेर नुकसान झाल्यास अशक्तपणा, थकवा आणि स्नायूंवर ताण यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.