AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जर तुम्हीही सकाळी रिकाम्या पोटी पाणी पित असाल तर हे नक्कीच जाणून घ्या

सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. जसे की पचन सुधारणे, शरीर शुद्ध करणे आणि चयापचय वाढवणे. परंतु, एकाच वेळी जास्त पाणी पिणे हे नुकसानकारकही ठरू शकते. जसे सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे फायदे असतात तसेच तोटेही काय असतात ते जाणून घेऊयात.

जर तुम्हीही सकाळी रिकाम्या पोटी पाणी पित असाल तर हे नक्कीच जाणून घ्या
Drinking Water on Empty Stomach, Benefits, Risks & How To Do It RightImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 29, 2025 | 8:28 PM
Share

आरोग्याबाबत जागरूक राहायला किंवा निरोगी राहायला सर्वानाच आवडतं.त्यासाठी प्रत्येकजण काहीना काही उपाय करत असतात. या सवयींपैकी एक म्हणजे सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी पाणी पिणे. शरीर स्वच्छ ठेवण्याचा आणि ऊर्जा वाढवण्याचा हा एक सोपा मार्ग लोक मानतात. काही लोकांनी तो दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवला आहे, परंतु खरोखर हे फायदेशीर आहे का? आपण सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे फायदे आहेत तसेच त्याचे काही नुकसानही आहेत का हे जाणून घेऊयात.

काळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे फायदे काय आहेत?

पचन सुधारते

सकाळी पाणी पिल्याने पोट सहज साफ होण्यास मदत होते. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि पचनसंस्था हलकी आणि सक्रिय राहते.

शरीर डिटॉक्स होते

रिकाम्या पोटी पाणी पिणे हा शरीरातील घाण आणि विषारी पदार्थ काढून टाकण्याचा एक सोपा मार्ग आहे. ज्यामुळे रक्त शुद्ध होते आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत राहते.

चयापचय जलद होते

रिकाम्या पोटी पाणी पिल्याने आपल्या शरीरातील चयापचय क्रिया सक्रिय होते. कॅलरीज जलद बर्न होतात आणि वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही सवय खूप उपयुक्त ठरते.

त्वचा उजळवते

पाणी शरीराला हायड्रेट ठेवते, जर सकाळपासून योग्य प्रमाणात पाणी प्यायले तर त्वचा चमकते आणि मुरुमांसारख्या समस्या कमी होतात.

मेंदूला ऊर्जा मिळते.

उठल्यानंतर पाणी पिल्याने मनाला लगेच ताजेतवाने वाटते. यामुळे मूड चांगला राहतो आणि कामात लक्ष केंद्रित करण्यास, कामे लक्षात ठेवण्यास मदत होते.

मूत्रपिंडाचे काम सोपे करते

पाण्यामुळे, मूत्रपिंड शरीरातील अतिरिक्त मीठ आणि कचरा सहजपणे काढून टाकतात, ज्यामुळे त्यांचा भार कमी होतो.

नुकसान काय असू शकते

एकाच वेळी खूप जास्त पाणी पिणे टाळा

एकाच वेळी जास्त पाणी प्यायल्याने पोटफुगी आणि मळमळ किंवा पोटात जडपणा जाणवू शकतो.

रक्तदाबावर परिणाम

कमी रक्तदाब असलेल्या लोकांना अचानक जास्त पाणी प्यायल्याने चक्कर येऊ शकते किंवा अशक्तपणा जाणवू शकतो.

मूत्रपिंडांवर दबाव

जर जास्त पाणी प्यायले तर मूत्रपिंडांवर अतिरिक्त दबाव येऊ शकतो आणि ते आवश्यकतेपेक्षा जास्त काम करू लागतात. त्यामुळे वारंवार लघवीला येणे, पोटात दुखणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात.

इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता

शरीरातून मीठ आणि खनिजांचे जास्त प्रमाणाबाहेर नुकसान झाल्यास अशक्तपणा, थकवा आणि स्नायूंवर ताण यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट.
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले.
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना...
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना....
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.
दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची भावनिक पोस्ट
दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची भावनिक पोस्ट.
अजित पवारांच्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीवरून वाद
अजित पवारांच्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीवरून वाद.
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ.
मोठी अपडेट! छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
मोठी अपडेट! छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष.