AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दररोज सकाळी चालण्याचे आहेत फायदेच फायदे, जाणून घ्या

दररोज सकाळी रिकाम्या पोटी चालणे ही एक चांगली सवय आहे, याचे अनेक फायदे तुमच्या शरीराला होतात, त्याबद्दल जाणून घेऊयात.

दररोज सकाळी चालण्याचे आहेत फायदेच फायदे, जाणून घ्या
| Edited By: | Updated on: Jun 22, 2025 | 2:06 AM
Share

आजच्या धावपळीच्या जीवनात निरोगी राहणे हे आपल्या सर्वांसाठी एका आव्हानापेक्षा कमी नाही. अस्वस्थ जीवनशैली, चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि ताणतणाव यांचा आपल्या शरीरावर आणि मनावर थेट परिणाम होतो. तर या समस्या कमी होण्यासाठी दररोज सकाळी रिकाम्या पोटी चालणे आरोग्यासाठी वरदान ठरू शकते. हे केवळ शरीराला ऊर्जावान आणि सक्रिय ठेवत नाही तर अनेक गंभीर आजारांना प्रतिबंधित करण्यास देखील मदत करते. ताज्या हवेत खोल श्वास घेणे, सकाळच्या कोवळ्या उन्हात जाणे आणि निसर्गाच्या जवळ राहणे हे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊया दररोज सकाळी रिकाम्या पोटी चालण्याचे आरोग्याला कोणते जबरदस्त फायदे होतात.

वजन कमी करण्यास उपयुक्त

सकाळी रिकाम्या पोटी चालल्याने शरीरातील फॅट जलद बर्न होते. हे एक नैसर्गिक फॅट बर्न होण्याची प्रक्रिया सक्रिय करते, ज्यामुळे वजन कमी करणे सोपे होते.

चयापचय वाढवते

दररोज सकाळी चालल्याने आपल्या शरीरातील चयापचय वाढते, ज्यामुळे शरीर उर्जेचा वापर चांगल्या प्रकारे करते. यामुळे अन्न लवकर पचण्यास मदत होते आणि शरीर तंदुरुस्त राहते.

रक्तातील साखर नियंत्रित करते

मधुमेहाच्या रुग्णांसाठी सकाळी चालणे खूप फायदेशीर आहे . तुम्ही जर रोज नियमित चालायला गेलात तर तुमच्या शरीरातील इन्सुलिन संवेदनशीलता वाढवून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत होते.

हृदय मजबूत करते

नियमित चालण्याने हृदय निरोगी राहते, रक्ताभिसरण सुधारते आणि कोलेस्टेरॉलची पातळी संतुलित होते. यामुळे तुम्हाला हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक सारख्या आजार होत नाही.

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते

रोज सकाळी रिकाम्या पोटी चालण्यामुळे शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि शरीराला संसर्गांशी लढण्यास सक्षम करते.

मानसिक ताण आणि नैराश्य कमी करते

सकाळी लवकर उठून निसर्गाच्या सानिध्यात चालल्याने शरीरात एंडोर्फिन बाहेर पडतात, ज्यामुळे मूड सुधारतो. यामुळे ताण, चिंता आणि नैराश्य कमी होण्यास मदत होते.

पचन सुधारते

रोज सकाळी रिकाम्या पोटी चालल्याने आतड्यांची कार्यक्षमता वाढते, ज्यामुळे अन्नाचे पचन चांगले होते आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्या दूर होतात.

हाडे आणि सांधे मजबूत करते

सकाळी चालण्यामुळे हाडांमध्ये कॅल्शियमचे शोषण सुधारते, ज्यामुळे हाडे मजबूत राहतात आणि संधिवात होण्याचा धोका टाळता येतो.

फुफ्फुसांचे कार्य सुधारते

दीर्घ श्वासोच्छवासासह चालण्याने फुफ्फुसांची क्षमता वाढते आणि शरीराला अधिक ऑक्सिजन मिळतो, ज्यामुळे श्वसनाच्या समस्यांमध्ये आराम मिळतो.

त्वचा उजळवते

सकाळची ताजी हवा आणि घाम शरीराला डिटॉक्स करतात, ज्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार बनते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

'सामना'तून नितेश राणेंवर जोरदार टीका; सरकारी निधी वाटपावर गंभीर आरोप
'सामना'तून नितेश राणेंवर जोरदार टीका; सरकारी निधी वाटपावर गंभीर आरोप.
निकालात भाजप पहिल्या, तर शिंदे सेना दुसऱ्या स्थानी; उदय सामंतांचा दावा
निकालात भाजप पहिल्या, तर शिंदे सेना दुसऱ्या स्थानी; उदय सामंतांचा दावा.
सिंधुदुर्गात 8 जिल्हा परिषद गट, 17 पंचायत समिती गण बिनविरोध
सिंधुदुर्गात 8 जिल्हा परिषद गट, 17 पंचायत समिती गण बिनविरोध.
12 जिल्हा परिषद, 125 पंचायत समितींचा निकाल पाहा टीव्ही9 मराठीवर लाईव्ह
12 जिल्हा परिषद, 125 पंचायत समितींचा निकाल पाहा टीव्ही9 मराठीवर लाईव्ह.
छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती निकालाचा आज फैसला
छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती निकालाचा आज फैसला.
जिल्हा परिषद, पंचायत समितीचा निकाल थोड्याच वेळात; कोण जिंकणार?
जिल्हा परिषद, पंचायत समितीचा निकाल थोड्याच वेळात; कोण जिंकणार?.
बारामती जिल्हा परिषदेच्या मतमोजणीला थोड्या वेळात सुरूवात
बारामती जिल्हा परिषदेच्या मतमोजणीला थोड्या वेळात सुरूवात.
राष्ट्रवादी एकत्र येण्याचं बोलणं आमच्यासमोर! सयाजी शिंदेंचं मोठं विधान
राष्ट्रवादी एकत्र येण्याचं बोलणं आमच्यासमोर! सयाजी शिंदेंचं मोठं विधान.
इथून पुढे महाराष्ट्रात काँग्रेस स्वबळावर लढणार? नेमकं कारण काय?
इथून पुढे महाराष्ट्रात काँग्रेस स्वबळावर लढणार? नेमकं कारण काय?.
संघामुळे भाजपला 'अच्छे दिन', मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?
संघामुळे भाजपला 'अच्छे दिन', मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?.