AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आचार्य चाणक्य नितीतील ‘या’ टिप्स लक्षात ठेवल्याने आयुष्यात महत्वाचे निर्णय घेण्यात होते मदत

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिमध्ये जीवनाच्या अनेक पैलूंवर मार्गदर्शन केलेलं आहे. चाणक्य नीतितील या टिप्स लक्षात ठेवल्याने तुम्हाला जीवनात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यास मदत होऊ शकते. चला याबद्दल अधिक जाणून घेऊयात.

आचार्य चाणक्य नितीतील 'या' टिप्स लक्षात ठेवल्याने आयुष्यात महत्वाचे निर्णय घेण्यात होते मदत
Acharya Chanakya
| Updated on: Dec 05, 2025 | 9:00 AM
Share

आचार्य चाणक्य यांच्या मतांनुसार आजच्या काळातही लोकांना त्यांचे जीवन जगण्यासाठी योग्य दिशा दाखवतात. जीवनात यशस्वी होण्यासाठी फक्त ज्ञान आणि संधी पुरेशी नसते तर सर्वात महत्वाचे असतात ते म्हणजे निर्णय घेण्याचे धाडस. अनेकदा आपण महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी खोलवर विचार करतो, एखादा निर्णय सांगण्यास भितीही जाणवते. कारण आपल्यापैकी अनेकजण असे आहेत जे निर्णय चुकीचा ठरला तर लोकं काय बोलतील तसेच कोणाचे नुकसान झाले तर? पण तुम्ही जर योग्य वेळी निर्णय घेऊ शकत नसाल तर आयुष्यातील अनेक संधी अशाच तुमच्या हातातून निसटू शकतात.

कारण तुम्ही जेव्हा एखादा मार्ग निवडलात तर तेव्हाच तुमची पावले पुढे जातात. तर अशा वेळी आचार्य चाणक्य यांचे हे शब्द लक्षात ठेवल्याने तुम्हाला निर्णय घेणे सोपे होऊ शकते. चला अशा काही आचार्य नीति टिप्स आहेत त्याबद्दल जाणून घेऊयात, ज्यामुळे तुमच्या अनेक अडचणी कमी होऊ शकतात.

यासाठी निर्णय घेणे महत्वाचे आहे

जेव्हा आपण महत्त्वाचे निर्णय घेतो किंवा भविष्याशी संबंधित निर्णय घेतो तेव्हा आपल्याला अनेकदा परिणामांची भीती वाटते. यामुळे आपण योग्य निर्णय सांगण्यास व घेण्यास घाबरतो. तथापि चाणक्य नीती म्हणते की आपण परिणामांवर आधारित निर्णय घेण्यास घाबरू नये, कारण यामध्येच व्यक्तीचा आत्म-विकास दडलेला आहे.

असा निर्णय घ्या

निर्णय घेण्यापूर्वी एखादी व्यक्ती अनेकदा विचार करते की त्याचा निर्णय चुकीचा ठरेल का. आचार्य चाणक्य म्हणतात की अपयशाची भीती सोडून दिल्यावरच माणूस खऱ्या अर्थाने बरोबर आणि चूक यात फरक करू शकतो. जर तुमचा निर्णय चुकीचा ठरला तर निराश होण्याची गरज नाही, कारण आचार्य चाणक्य मानतात की चुका पराभव नसून धडा असतात जे आपल्याला काही ना काही शिकवतात.

या चुका करू नका

भविष्याबद्दल किंवा जीवनात महत्त्वाचे निर्णय घेताना घाई टाळण्याचा सल्ला चाणक्य नीती देते, कारण घाईमुळे अनेकदा चुकीचे निर्णय घेतले जातात, ज्याचा आपल्याला नंतर पश्चात्ताप होतो. म्हणून, नेहमी संयमाने निर्णय घ्या. शिवाय कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी अनुभवांमधून शिकण्याचा आणि तुमचा आतला आवाज ऐकण्याचा सल्ला चाणक्य नीती देते, कारण यामुळे तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत होऊ शकते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.