AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बूट आणि चप्पल घालून जेवणे योग्य आहे का? जाणून घ्या

हिंदू धर्मात अन्नाला पवित्र मानले जाते. बूट-चप्पल घालून जेवणे किंवा काही खाणे योग्य आहे का? हा प्रश्न अनेकांना पडतो. याची वैज्ञानिक आणि धार्मिक कारणे काय आहेत हे जाणून घेऊयात.

बूट आणि चप्पल घालून जेवणे योग्य आहे का? जाणून घ्या
Is it appropriate to eat while wearing shoes and slippers both scientific and religious reasons for thisImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 27, 2025 | 8:11 PM
Share

हिंदू धर्मात अन्नाला देवाचे रूप मानले जाते. ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ म्हटलं जातं. त्याला पाय लागला किंवा एखादा भाताचा कण देखीला पायाखाली आला तरी आपण त्याच्या पाया पडतो. आपण अन्नाला पुजतो. म्हणूनच अन्नाला सूर्यदेवासारखे पवित्र मानले जाते. अन्न हे आपल्या शरीराला ऊर्जा प्रदान करते, शक्ती देते त्यामुळे त्याला शक्तीचे रुपही मानले जातात. त्यामुळे ताटात घेतलेले अन्नही आपण वाया जाऊ नये यासाठी प्रयत्न करतो. ताटात उष्ट राहू नये असेही म्हटले जाते.

अनेकांच्या घरी अजूनही जेवायला बसल्यानंतर हात जोडून आधी प्रार्थना केली जाते. मग जेवायला सुरुवात केली जाते. पण अनेकांच्या घरी घरात चप्पल वापरतात, आणि जेवायलाही तसेच बसतात. तसेच अनेकदा बाहेर असल्यावर, किंवा रेस्टारंटमध्ये गेल्यावर आपल्याला पायात चप्पल किंवा बूट घालूनच जेवावे लागते मग बूट आणि चप्पल घालून जेवणे योग्य आहे का? याची वैज्ञानिक आणि धार्मिक दोन्ही कारणे जाणून घेऊयात.

वैज्ञानिक कारणे

शूज आणि चप्पल बहुतेकदा विविध प्रकारच्या घाण, चिखलाने, धुळीने माखलेले असतात. जर तुम्ही तसेच जेवायला बसले तर यामुळे तुमच्या अन्नात बॅक्टेरिया येऊ शकतात, ज्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता. म्हणून, शूज आणि चप्पल घालून खाणे ही चांगली कल्पना नाही, आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही ते अजिबात चांगले मानले जात नाही.

धार्मिक कारणे

हिंदू धर्मात, अन्न आणि अग्नि दोन्ही अत्यंत पवित्र मानले जातात आणि म्हणूनच, ते स्वयंपाकघरात एकमेकांशी संबंधित असतात. कारण दोन्ही मानवी भूक भागवतात. अशाप्रकारे, हिंदू संस्कृतीत स्वयंपाकघर हे एक पवित्र स्थान आहे. म्हणूनच, बूट किंवा चप्पल घालून जेवण करणे पाप मानले जाते आणि देवी अन्नपूर्णेचा अपमान मानला जातो. त्यामुळे स्वयंपाकघरातही बूट किंवा चप्पल घालून जाऊ नये.

कसे जेवावे?

जेवण्यापूर्वी तुम्ही हातपाय स्वच्छ धुवावेत आणि बसून जेवावे. कधीही अंथरुणावर बसून जेवू नये. यामुळे देवी अन्नपूर्णा आणि धनाची देवीचा, खाणाऱ्या अन्नाचा तो अपमान मानला जातो. ज्यामुळे जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. म्हणून, जेवण्यापूर्वी दररोज तुमचे बूट आणि चप्पल लांब किंवा घराबाहेर काढून ठेवणे चांगले. हे तुम्हाला आजारांपासून देखील वाचवेल.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान.
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!.
दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप
दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप.
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?.
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या....
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या.....
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?.
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू.
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग.
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू.
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण.