AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Food : उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी काकडीच्या सूपचा आहारात समावेश करा, जाणून घ्या रेसिपी!

कडक उन्हाळ्याला (Summer) आता सुरूवात झाली आहे. या हंगामामध्ये आपल्याला आरोग्याची विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे. उन्हाळ्यामध्ये स्वत: ला हायड्रेटेड (Hydrated) ठेवणे महत्वाचे आहे. हायड्रेटेड राहण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये पाण्याबरोबर कलिंगडचा रस, काकडीचा रस वगैरे घेऊ शकता. याचे सेवन केल्याने आपल्याला ऊर्जा मिळते.

Food : उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी काकडीच्या सूपचा आहारात समावेश करा, जाणून घ्या रेसिपी!
काकडीचा सूप आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 11, 2022 | 1:22 PM
Share

मुंबई : कडक उन्हाळ्याला (Summer) आता सुरूवात झाली आहे. या हंगामामध्ये आपल्याला आरोग्याची विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे. उन्हाळ्यामध्ये स्वत: ला हायड्रेटेड (Hydrated) ठेवणे महत्वाचे आहे. हायड्रेटेड राहण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये पाण्याबरोबर कलिंगडचा रस, काकडीचा रस वगैरे घेऊ शकता. याचे सेवन केल्याने आपल्याला ऊर्जा मिळते. ते आपली प्रतिकारशक्ती (Immunity) वाढवण्यास मदत करतात. ते थकवा दूर करण्याचे काम करतात. विशेष म्हणजे उन्हाळ्याच्या हंगामात आपण काकडीच्या सूपचे सेवन करू शकतो, काकडीचा सूप खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ते कसे बनवायचे ते जाणून घेऊयात.

काकडीच्या सूपसाठी साहित्य

काकडी 1, लसूण 2 पाकळ्या, 1 कप पुदिन्याची पाने, एर कप दही, एक हिरवी मिरची, 2 चमचे ऑलिव्ह तेल, चवीनुसार मीठ, काळी मिरी, दूध हे सर्व साहित्य आपल्याला काकडीचा सूप तयार करण्यासाठी लागेल.

काकडीचा सूप कसा बनवायचा जाणून घ्या

सूप बनवण्यासाठी सर्वात अगोदर काकडीचे तुकडे करा. यानंतर ब्लेंडरमध्ये लसूण, पुदिना, हिरवी मिरची, दही आणि 1/2 कप दूध घाला. यानंतर 2 चमचे ऑलिव्ह तेल आणि चवीनुसार मीठ आणि मिरपूड घाला. आता मिश्रण मिळेपर्यंत सर्व साहित्य एकत्र करा. त्यानंतर वीस मिनिटे हे सर्व मंद गॅसवर गरम करून घ्या. त्यानंतर आता एका काचेच्या बाऊलमध्ये हे काढा आणि वरती एक काकडीचा तुकडा ठेवा. गरमा गरमा हे आता सर्व्ह करा.

वाचा काकडीमधील घटक

काकडीत व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम, झिंक फ्लेव्होनॉइड्स, अँटीऑक्सिडंट्स आणि फॉस्फरस यांसारखे अनेक पोषक घटक असतात. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे ते आपली पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. हे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम देते, त्यात खूप कमी कॅलरीज असतात, ज्यामुळे ज्यांना आपले वाढलेले वजन कमी करायचे आहे. त्यांनी आपल्या दररोजच्या आहारामध्ये काकडीच्या सूपचा समावेश करावा. तसेच हा सूप उन्हाळ्यामध्ये देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

संंबंधित बातम्या :

Health : आयुष्यातून या 3 गोष्टी कायमच्या आऊट करा आणि जीवन बघा कसे सुंदर होते!

Health Care Tips : उन्हाळ्यात हे ड्रायफ्रूट्स भिजवलेले खा आणि निरोगी राहा! 

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली