AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health : आयुष्यातून या 3 गोष्टी कायमच्या आऊट करा आणि जीवन बघा कसे सुंदर होते!

जवळपास सर्वांनाच काहीना काही आरोग्य समस्या आहेत. फास्टफूड (Fast food)  जास्त प्रमाणात खाणे, कोणताही व्यायाम न करणे, दिवसभर बसून काम करणे या सर्व गोष्टी गोष्टींचे आपल्या आरोग्यावर चुकीचे परिणाम होत आहेत. मधुमेह (Diabetes), कोलेस्टेरॉल या समस्या (Problem) तर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत.

Health : आयुष्यातून या 3 गोष्टी कायमच्या आऊट करा आणि जीवन बघा कसे सुंदर होते!
हे फाॅलो करा आणि निरोगी राहाImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 11, 2022 | 12:27 PM
Share

मुंबई : जवळपास सर्वांनाच काहीना काही आरोग्य समस्या आहेत. फास्टफूड (Fast food)  जास्त प्रमाणात खाणे, कोणताही व्यायाम न करणे, दिवसभर बसून काम करणे या सर्व गोष्टी गोष्टींचे आपल्या आरोग्यावर चुकीचे परिणाम होत आहेत. मधुमेह (Diabetes), कोलेस्टेरॉल या समस्या (Problem) तर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. शारीरिक समस्यांबरोबरच मानसिक समस्याही वाढल्या आहेत. जर तुम्ही या तीन गोष्टींना आपल्या आयुष्यामधून कायमचे आऊट केले तर तुम्हाला कोणत्याही आरोग्य समस्यांना सामोरे जाण्याची वेळ अजिबात येणार नाही. या आरोग्य समस्या नेमक्या कोणत्या आहेत, याबद्दल आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात.

फास्ट फूड टाळा

फास्ट फूड कोणाला खायला आवडत नाहीत? पण निरोगी राहण्यासाठी रोजच्या आहारातून फास्ट फूड वगळले पाहिजे. पिझ्झा, बर्गर, रोल्स, चिप्स, तळलेले चिकन हे सर्व शरीरासाठी घातक आहेत. म्हणून आजपासून हे सर्व पदार्थ आहारातून काढून टाका. या पदार्थांमुळे कॅलरीज वाढतात. यामुळे कोलेस्ट्रॉलची समस्या निर्माण होते. अतिरिक्त वजन वाढणे जे कमी करणे अत्यंत कठिण काम आहे. त्यामुळे हृदयविकारासारख्या समस्याही निर्माण होतात.

नैराश्य दूर करा

नैराश्यामुळे आपल्या शरीराचे खूप जास्त नुकसान होते. बरेच लोक वजन कमी करण्यासाठी डाएटिंग करतात. मात्र तरीही त्यांचे वजन कमी होत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे नैराश्य आहे. कारण तुम्हाला नैराश्य असेल तर त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो आणि तुम्ही कितीही डाएटिंग केली तरीही तुमचे वजन कमी होते नाही. म्हणून आधी मनातून सर्व नकारात्मकता काढून टाका. सर्व काही नवीन सुरू करा. फक्त तुम्ही करू शकता यावर विश्वास ठेवा. वेळेवर खा आणि प्या. तुमची सर्व कामे करा. स्वतःला सदैव आनंदी ठेवा.

मोबाईल कमी वापरा

मोबाईल फोन वापरणे आपल्या शरीरासाठी अजिबात चांगले नाही. परंतु आपण फोनशिवाय जीवनाचा विचार करू शकता नाहीत. सध्या प्रत्येकजण गरजेपेक्षाही जास्त मोबाईलवर वेळ घातवत असतो. दिवसभर कामानिमित्त मोबाईल आपल्या जवळ असतोच शिवाय रात्रीही झोपण्याच्या अगोदर आपण दोन ते तीन तास मोबाईल सतत वापरतो. यामुळे याचा गंभीर परिणाम आपल्या आरोग्यावर होतो आहे.

संबंधित बातम्या : 

Health Care Tips : उन्हाळ्यात हे ड्रायफ्रूट्स भिजवलेले खा आणि निरोगी राहा! 

Health : आयुष्यभर निरोगी राहण्यासाठी फक्त या 4 टिप्स फाॅलो करा आणि रोगांना दूर ठेवा!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.