AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Relationship Tips | तुमच्या जोडीदारामध्ये ‘या’ सवयी आहेत? मग, लग्नाचा निर्णय घेण्याआधी एकदा विचार कराच!

आपण बर्‍याचदा ऐकतो की प्रेम विवाह, संबंध फार काळ टिकत नाही. आकडेवारीनुसार, 40 टक्के पेक्षा जास्त प्रकरणांमध्ये हे गोष्ट सत्य ठरली आहे. अमेरिकेत केलेल्या सर्वेक्षणानुसार 80 टक्के प्रेम विवाह असलेल्या जोडप्यांचे असे मत आहे की, लग्नानंतर प्रियकर किंवा मैत्रिणीचे वर्तन बदलते.

Relationship Tips | तुमच्या जोडीदारामध्ये ‘या’ सवयी आहेत? मग, लग्नाचा निर्णय घेण्याआधी एकदा विचार कराच!
Relationship tips
| Edited By: | Updated on: Jun 25, 2021 | 2:09 PM
Share

मुंबई : आपण बर्‍याचदा ऐकतो की प्रेम विवाह, संबंध फार काळ टिकत नाही. आकडेवारीनुसार, 40 टक्के पेक्षा जास्त प्रकरणांमध्ये हे गोष्ट सत्य ठरली आहे. अमेरिकेत केलेल्या सर्वेक्षणानुसार 80 टक्के प्रेम विवाह असलेल्या जोडप्यांचे असे मत आहे की, लग्नानंतर प्रियकर किंवा मैत्रिणीचे वर्तन बदलते. लग्नानंतर तुमचा जोडीदार तुमच्याशी कसा वागेल आणि तुमचा विवाह यशस्वी होईल की नाही, याबद्दलही तुम्हाला संभ्रम असेल, तर आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगत आहोत. जर आपल्या जोडीदाराला या 5 सवयी असतील तर आपले विवाह कदाचित यशस्वी होणार नाही, म्हणून आयुष्यभरासाठी एकमेकांना निवडण्यापूर्वी एकदा विचार कराच (Relationship Tips Does your Partner have these habits Then think twice before getting married).

लग्नाबद्दल संभ्रमित

जर आपला जोडीदार लग्नाची गोष्ट काढताच दुर्लक्ष करत असेल किंवा प्रतिक्रिया व्यक्त करत नसेल, तर ते लग्नासाठी तयार नसण्याची किंवा पुढे काही समस्या उद्भवण्याची पहिली चिन्हे आहेत. अशा परिस्थितीत, जर आपल्या जोडीदाराची समस्या कुटुंब आणि नातेवाईक असेल, तर दोघे मिळून या प्रकरणाचा तोडगा काढण्याचा विचार केला जाईल. पण प्रेमसंबंधात, जर तुमचा जोडीदार प्रत्येक वेळी केवळ कामापुरता आपला विचार करत असेल, आणि नंतर लग्नाच्या बाबतीत राग दर्शवत असेल, तर तो आपले भविष्य असू शकत नाही. जर एखाद्याने आपल्यावर खरे प्रेम केले असेल, तर तो / ती नेहमीच आपल्याबरोबर राहणे पसंत करतील.

वारंवार व्यत्यय आणणे आणि सतत देखरेख करणे

कधीकधी आपल्या जोडीदाराला मुठीत ठेवणे ही चांगली गोष्ट असते. पण, जर त्याला आपल्या जीवनशैलीबद्दल ईर्ष्या वाटू लागली, तर ते आपल्या आयुष्यातील सुखी जीवनप्रवासाचे स्वप्न देखील उधळून लावू शकते. आपण काय करत आहात, आपण कोणासह आहात इत्यादीसाठी आपल्या जोडीदारास प्रत्येक क्षणी कॉल करावा लागत असेल, तर लग्नानंतर त्यांचा संशय आणखी वाढू शकतो. प्रेम दर्शवण्याचा आणि व्यक्त करण्याचा हा एक मार्ग असू शकतो, परंतु त्याच वेळी तो नाते संबंधात आपल्याबद्दल असुरक्षित वाटण्याचीही चिन्हे आहे. एकंदरीत, जर हे लक्षण दिसत असेल, तर लग्नापूर्वी नक्कीच एकदा विचार करा.

दोघांचे भिन्न विचार

बरेचदा लोक आपल्यासारखाच जोडीदार निवडतात. कधीकधी दोघांचा व्यवसाय वेगळा असू शकतो, भाषा आणि रूढी भिन्न असू शकतात, परंतु त्यांच्या विचारसरणीत आणि निवडीत नक्कीच काही समानता असतात. जर आपल्या जोडीदाराने आपल्यास आपल्या मेकअपबद्दल, कपड्यांबद्दल, मित्र इत्यादीबद्दल वारंवार विचारले, तर हे आपल्या दोघांचे विचार खूप भिन्न असल्याचे लक्षण आहे. जर त्यांना तुमचा व्यवसाय आवडत नसेल किंवा तुमचे बोलणे समजत नसेल, तर लग्नानंतर अशा नात्यात अडचणी वाढू शकतात (Relationship Tips Does your Partner have these habits Then think twice before getting married).

मित्र आणि नातेवाईकांचा त्रास

आपण मित्र निवडतो, पण आपण नातेवाईक निवडू शकत नाही. सामान्यत: ज्या मित्रांसह राहणे आपल्याला खूप आवडते आणि काही नातेवाईक अगदी आपली जवळ असतात, अशा लोकांपासून जर आपल्या जोडीदारास काई समस्या असेल, तर लग्नानंतर ही समस्या अधिक वाढू शकते. जोडीदाराच्या मित्र आणि नातेवाईकांशी काही मतभेद असणे ठीक आहे किंवा त्यांना स्वतःला अंतर देण्याचा सल्ला देणे ठीक आहे. परंतु, यासाठी वारंवार दबाव टाकणे चांगले नाही, विशेषतः जेव्हा ते चुकीचे नसतात तेव्हा…

टोमणे मारणे किंवा रागावणे

जर आपल्या जोडीदाराने सतत आपल्या स्वरुपावर, आपल्या वागण्यावर आणि आपल्या व्यक्तिरेखेमध्ये त्रुटी / वैशिष्ट्ये, यावर आपली चेष्टा केली तर, अशी शक्यता आहे की ती लग्नानंतरही त्यांची ही सवय मोडणार नाही. या व्यतिरिक्त, काही जोडीदार आपल्याशी बोलताना चिडतात आणि बरेच दिवस बोलणे बंद करतात. एक चांगला जोडीदार आपल्याला आपल्याइतकाच आवडतो. जर त्याच्या काही सवयी ज्या वाईट नाहीत, मात्र त्याच्या बदलण्याने तुम्हाला त्रास होत असेल, तर तुम्ही तुमच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची गरज आहे. लग्नानंतर अशा प्रकारच्या समस्या वाढताना दिसतात.

(Relationship Tips Does your Partner have these habits Then think twice before getting married)

हेही वाचा :

Skin care : दही आणि हळदीचा फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि चेहऱ्याच्या सर्व समस्या दूर करा!

Belly fat : ‘हे’ योगासन करा आणि पोटावरची चरबी झटपट कमी करा!

Follow Us
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....