AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही देखील उरलेलं अन्न फ्रीजमध्ये ठेवताय? जाणून घ्या दुष्परिणाम

उन्हाळा आला की बाहेर ठेवलेलं जेवण लगेच खराब होतं, म्हणून आपण पटकन उरलेलं अन्न उचलतो आणि थेट फ्रिजमध्ये ठेवतो .पण तुमची ही सवय, विशेषतः गरमीच्या दिवसांत, तुमच्या आरोग्यासाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते.

तुम्ही देखील उरलेलं अन्न फ्रीजमध्ये ठेवताय? जाणून घ्या दुष्परिणाम
साक्षी कणसे
साक्षी कणसे | Edited By: | Updated on: Apr 23, 2025 | 11:18 PM
Share

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अन्न लगेच खराब होत म्हणून ते फ्रीजमध्ये ठेवण्याची सवय अनेकांना असते. पण खरंच असं करणे आपल्यासाठी सुरक्षित आहे का? विशेषतः गरम आणि दमट वातावरणात, जेव्हा तापमान जास्त असतं, तेव्हा शिल्लक अन्न फ्रिजमध्ये ठेवताना काही गोष्टींच्या बाबतीत दुर्लक्ष केल्यास ते आपल्या आरोग्यावर मोठा परिनाम करु शकतं.

गर्मीमुळे धोका का वाढतो

उन्हाळ्यात वातावरण उष्ण आणि दमट असते. या परिस्थितीत, बॅक्टेरिया आणि इतर सूक्ष्मजंतूंची वाढ फार झपाट्याने होऊ लागते. जरी अन्न थोड्या वेळासाठी बाहेर राहिलं, तरी त्यात बॅक्टेरिया वाढू लागतात. शिजवलेलं गरम अन्न थेट फ्रिजमध्ये ठेवणे म्हणजे मोठा धोका. गरम अन्न फ्रिजमध्ये ठेवल्याने, फ्रिजमधल्या थंड तापमानात बदल होतो आणि ओलसरपणा वाढतो. या ओलसर वातावरणात बॅक्टेरिया वाढतो, ज्यामुळे अन्न खराब होण्याचा वेग वाढतो आणि ते खाल्ल्यामुळे पोट बिघडण्याचा धोका वाढतो.

अन्न फ्रिजमध्ये ठेवण्यापूर्वी करा “या” गोष्टी

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, शिजवलेलं अन्न फ्रिजमध्ये ठेवण्यापूर्वी त्याला खोलीच्या सामान्य तापमानात पूर्णपणे थंड होऊ द्यावं. गरम किंवा कोमट अन्न थेट फ्रिजमध्ये ठेवणं टाळा. अन्न थंड झाल्यावरच, त्याला स्वच्छ आणि हवाबंद डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवा. यामुळे फ्रिजमधील वातावरण आणि अन्नाची गुणवत्ता दोन्ही सुरक्षित राहतात.

उन्हाळ्यात फ्रिज वापरण्याच्या काही महत्त्वाच्या टिप्स

तुमच्या फ्रिजचं तापमान नेहमी ४°C किंवा त्यापेक्षा कमी ठेवा. यामुळे बॅक्टेरियाची वाढ मंदावते.

डाळ, आमटी, रस्सा भाजी यांसारखे पाणी किंवा तेल जास्त असलेले पदार्थ फ्रिजमध्ये जास्त दिवस ठेवू नका. शक्यतो दुसऱ्या दिवशी ते संपवून टाका.

शिजवलेलं अन्न दोन तासांपेक्षा जास्त वेळ खोलीच्या तापमानात राहिलं असेल, तर ते फ्रिजमध्ये ठेवू नका आणि थेट फेकून द्या.

अन्नाचा वास किंवा चव बदलली असेल, त्याला आंबट वास येत असेल, किंवा त्यावर बुरशी दिसत असेल, तर ते अन्न खाणं टाळा.

Follow Us
सावधान! दूधात तब्बल 997 किलो तेल, धाड टाकताच भेसळयुक्त दूध जप्त
सावधान! दूधात तब्बल 997 किलो तेल, धाड टाकताच भेसळयुक्त दूध जप्त.
नीट प्रकरणी 19 व्या दिवशीही CBI चा मुक्काम लातूरमध्येच, चौथ्या...
नीट प्रकरणी 19 व्या दिवशीही CBI चा मुक्काम लातूरमध्येच, चौथ्या....
संघ कार्यालय जाळपोळ प्रकरणात कोर्टाचा मोठा निकाल, 16 वर्षांनी...
संघ कार्यालय जाळपोळ प्रकरणात कोर्टाचा मोठा निकाल, 16 वर्षांनी....
केंद्रात मंत्रिपद देतो, 20 कोटी द्या, भाजपाच्या नेत्यावरच टाकलं जाळं;
केंद्रात मंत्रिपद देतो, 20 कोटी द्या, भाजपाच्या नेत्यावरच टाकलं जाळं;.
एकच खळबळ! 700 कर्मचारी असलेल्या पुण्यातील IT कंपनीला रातोरात टाळे
एकच खळबळ! 700 कर्मचारी असलेल्या पुण्यातील IT कंपनीला रातोरात टाळे.
लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनीच केली मोठी घोषणा, थेट म्ह
लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनीच केली मोठी घोषणा, थेट म्ह.
मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत...
मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत....
मुंबईत खळबळ, वर्दळीच्या ठिकाणी आढळली बेवारस बॅग
मुंबईत खळबळ, वर्दळीच्या ठिकाणी आढळली बेवारस बॅग.
बीड पुन्हा हादरलं! सासरच्यांनी आधी तिला उपाशी ठेवलं नंतर...पाच जणांवर
बीड पुन्हा हादरलं! सासरच्यांनी आधी तिला उपाशी ठेवलं नंतर...पाच जणांवर.
ज्याची भीती तेच घडलं! या करणामुळे पुन्हा 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र,
ज्याची भीती तेच घडलं! या करणामुळे पुन्हा 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र,.