AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही देखील उरलेलं अन्न फ्रीजमध्ये ठेवताय? जाणून घ्या दुष्परिणाम

उन्हाळा आला की बाहेर ठेवलेलं जेवण लगेच खराब होतं, म्हणून आपण पटकन उरलेलं अन्न उचलतो आणि थेट फ्रिजमध्ये ठेवतो .पण तुमची ही सवय, विशेषतः गरमीच्या दिवसांत, तुमच्या आरोग्यासाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते.

तुम्ही देखील उरलेलं अन्न फ्रीजमध्ये ठेवताय? जाणून घ्या दुष्परिणाम
| Edited By: | Updated on: Apr 23, 2025 | 11:18 PM
Share

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अन्न लगेच खराब होत म्हणून ते फ्रीजमध्ये ठेवण्याची सवय अनेकांना असते. पण खरंच असं करणे आपल्यासाठी सुरक्षित आहे का? विशेषतः गरम आणि दमट वातावरणात, जेव्हा तापमान जास्त असतं, तेव्हा शिल्लक अन्न फ्रिजमध्ये ठेवताना काही गोष्टींच्या बाबतीत दुर्लक्ष केल्यास ते आपल्या आरोग्यावर मोठा परिनाम करु शकतं.

गर्मीमुळे धोका का वाढतो

उन्हाळ्यात वातावरण उष्ण आणि दमट असते. या परिस्थितीत, बॅक्टेरिया आणि इतर सूक्ष्मजंतूंची वाढ फार झपाट्याने होऊ लागते. जरी अन्न थोड्या वेळासाठी बाहेर राहिलं, तरी त्यात बॅक्टेरिया वाढू लागतात. शिजवलेलं गरम अन्न थेट फ्रिजमध्ये ठेवणे म्हणजे मोठा धोका. गरम अन्न फ्रिजमध्ये ठेवल्याने, फ्रिजमधल्या थंड तापमानात बदल होतो आणि ओलसरपणा वाढतो. या ओलसर वातावरणात बॅक्टेरिया वाढतो, ज्यामुळे अन्न खराब होण्याचा वेग वाढतो आणि ते खाल्ल्यामुळे पोट बिघडण्याचा धोका वाढतो.

अन्न फ्रिजमध्ये ठेवण्यापूर्वी करा “या” गोष्टी

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, शिजवलेलं अन्न फ्रिजमध्ये ठेवण्यापूर्वी त्याला खोलीच्या सामान्य तापमानात पूर्णपणे थंड होऊ द्यावं. गरम किंवा कोमट अन्न थेट फ्रिजमध्ये ठेवणं टाळा. अन्न थंड झाल्यावरच, त्याला स्वच्छ आणि हवाबंद डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवा. यामुळे फ्रिजमधील वातावरण आणि अन्नाची गुणवत्ता दोन्ही सुरक्षित राहतात.

उन्हाळ्यात फ्रिज वापरण्याच्या काही महत्त्वाच्या टिप्स

तुमच्या फ्रिजचं तापमान नेहमी ४°C किंवा त्यापेक्षा कमी ठेवा. यामुळे बॅक्टेरियाची वाढ मंदावते.

डाळ, आमटी, रस्सा भाजी यांसारखे पाणी किंवा तेल जास्त असलेले पदार्थ फ्रिजमध्ये जास्त दिवस ठेवू नका. शक्यतो दुसऱ्या दिवशी ते संपवून टाका.

शिजवलेलं अन्न दोन तासांपेक्षा जास्त वेळ खोलीच्या तापमानात राहिलं असेल, तर ते फ्रिजमध्ये ठेवू नका आणि थेट फेकून द्या.

अन्नाचा वास किंवा चव बदलली असेल, त्याला आंबट वास येत असेल, किंवा त्यावर बुरशी दिसत असेल, तर ते अन्न खाणं टाळा.

देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....