ज्याची भीती तेच घडलं! या करणामुळे पुन्हा 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र, तुमचंही नाव त्या यादीत नाही ना?
लाडक्या बहिणींसाठी अत्यंत वाईट बातमी आहे. ज्या ज्या महिलांनी सरकारने ठरवून दिलेल्या वेळेत ई केवायसी केली नाही. त्या सर्व महिलांना महिन्याचे 1500 रुपये मिळणार नाही. या महिलांना या योजनेचा कोणताही लाभ मिळणार नाहीये. सरकारने तसा मोठा निर्णय घेतला आहे.
लाडक्या बहिणींसाठी अत्यंत वाईट बातमी आहे. ज्या ज्या महिलांनी सरकारने ठरवून दिलेल्या वेळेत ई केवायसी केली नाही. त्या सर्व महिलांना महिन्याचे 1500 रुपये मिळणार नाही. या महिलांना या योजनेचा कोणताही लाभ मिळणार नाहीये. सरकारने तसा मोठा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील 80 लाख लाडक्या बहिणींना मोठा फटका बसणार आहे. या महिला अपात्र ठरल्याने त्यांना लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे.
त्यानंतर सरकारने योजनेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आणि गरजू महिलांना मदत मिळण्यासाठी योजनेतील महिला ई केवायसी करण्याच्या सूचना केल्या होत्या. या ई केवायसीसाठी महिलांना वेळोवेळी मुदतवाढही दिली होती. आता सरकारने 31 मार्चपर्यंतची शेवटची मुदत दिली होती. पण तरीही महिलांनी ईकेवायसी केली नाही. तसेच सरकारनेही मुदतवाढ देण्यास नकार दिला. त्यामुळे लाडकी बहीण योजनेतून 80 लाख महिलांना वगळण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी 80 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आलं असून त्यांना योजनेचा 1500 रुपयांचा आर्थिक लाभ मिळणार नाही.
लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीला महिला लाभार्थ्यांची संख्या 2.46 कोटी इतकी होती. आता छाननी केल्यानंतर महिला लाभार्थ्यांची संख्या 1.66 कोटी इतकी झाली आहे. यातून केवायसी न केलेल्या महिला, सधन महिला, नोकरदार महिला आणि महिलांच्या नावाने लाभ घेणाऱ्या पुरुषांना वगळण्यात आलं आहे.
ज्याची भीती तेच घडलं! या करणामुळे पुन्हा 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र,
मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, मग आता... त्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचं
परळीवाल्याला तर आता... मनोज जरांगेंनी काढला त्या घातपाताचा विषय अन्
सरकारने आश्वासन पाळलं नाही तर... मनोज जरांगे पाटलांचे हॉस्पिटलमधून

