AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात मुलांना आजारापासून वाचवण्यासाठी ‘या’ टिप्स ठरतील पॉवरफुल!

उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलं खेळण्यात दंग असली तरी त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. पालक म्हणून आपण थोडं जागरूक राहिलो, तर या उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांचा आनंद द्विगुणित करू शकतो...

उन्हाळ्यात मुलांना आजारापासून वाचवण्यासाठी 'या' टिप्स ठरतील पॉवरफुल!
| Edited By: | Updated on: Apr 25, 2025 | 5:06 PM
Share

उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या की घरात मुलांचा गोंगाट आणि धमाल वाढलेली असते. बागेत खेळणं, सायकलवर फिरणं, मित्रांसोबत मजा करणे — या दिवसांची मजा वेगळीच असते. पण उन्हाळ्यासोबतच मुलांच्या आरोग्यावर धोका निर्माण करणारे काही आजारही येतात, ज्याकडे पालकांनी वेळीच लक्ष दिलं पाहिजे.

उन्हाळ्यात बदललेलं हवामान, अस्वच्छ खाणं-पिणं आणि सततच्या उष्णतेचा त्रास यामुळे लहान मुलं सहज आजारी पडतात. पण थोडीशी काळजी घेतली तर ही समस्या टाळणं शक्य आहे.

चला, पाहूया उन्हाळ्यात मुलांना त्रास देणारे ३ मोठे आजार आणि त्यावर सोप्पे उपाय:

1. उष्माघात (Heat Stroke) : उन्हाळ्यात उन्हात खेळताना मुलांचं शरीर जास्त तापतं आणि तेवढ्या प्रमाणात पाणी न घेतल्यास उष्माघाताचा धोका वाढतो. यामुळे थकवा, डोकेदुखी, चक्कर येणे अशी लक्षणं दिसतात.

काय कराल?

1. दुपारी १२ ते ४ या वेळेत मुलांना बाहेर जाऊ देऊ नका.

2. मुलांना बाहेर जाताना टोपी घालून आणि सनस्क्रीन लावून जायला सांगा.

3. कोल्ड्रिंक्स ऐवजी पाणी, ताक, लिंबूपाणी यासारखे नैसर्गीक थंड पेय पुरेसे प्यायला द्या.

2. जुलाब आणि इन्फेक्शन : उन्हाळ्यात बाहेर मिळणारे फास्ट फूड, सरबतं, बर्फाचे गोळे यामुळे पोटाचे आजार होण्याचा धोका वाढतो. दूषित पाण्यामुळे जुलाब, उलट्या आणि पोटदुखी सुरू होऊ शकते.

काय कराल?

1. मुलांना घरचं ताजं आणि स्वच्छ अन्न द्या.

2. उकळून थंड केलेलं किंवा फिल्टर केलेलं पाणी प्यायला द्या.

3. जेवणापूर्वी आणि नंतर हात धुण्याची सवय लावा.

3. टायफॉइड : टायफॉइड हा उन्हाळ्यात पाण्याद्वारे पसरणारा गंभीर आजार आहे. दूषित अन्न आणि पाण्यामुळे याचा संसर्ग होतो.

काय कराल?

1. थंड पाण्या ऐवजी मुलांना फक्त स्वच्छ आणि उकळलेलं पाणीच प्यायला द्या.

2. बाहेरचं junk food टाळा.

3. ताप तीन दिवसांपेक्षा जास्त टिकल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

पालकांनी स्वच्छतेच्या सवयी, शिस्तबद्ध खाण्यापिण्याची काळजी आणि भरपूर पाणी पिण्याची आठवण मुलांना सतत करून दिल्यास या आजारांपासून सहज बचाव करता येतो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती आणि उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.