AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वजन कमी करायचे आहे ? तर दुपारच्या जेवणात करा या पदार्थांचा समावेश

वजन कमी करण्याच्या प्रयत्नात लोक अनेकदा स्वतःच्या शरीराला इजा करतात. आहार तज्ञ म्हणतात की वजन कमी करणे म्हणजे जास्त वेळ उपाशी राहणे असा होत नाही. आपल्या जेवणात जीवनसत्वे आणि प्रथिने असलेल्या पदार्थांचा समावेश करणे वजन कमी करण्यासाठी महत्त्वाचे आहे.

वजन कमी करायचे आहे ? तर दुपारच्या जेवणात करा या पदार्थांचा समावेश
| Edited By: | Updated on: Jan 13, 2025 | 9:00 AM
Share

लठ्ठपणामुळे अनेक आजार होऊ शकतात. निरोगी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी वजनाचे योग्य व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. मात्र लठ्ठपणाची समस्या सहजासहजी कमी करता येत नाही यासाठी आहारासोबतच व्यायामाचे काटेकोर नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे. वजन कमी करणे म्हणजे कॅलरीजची संख्या कमी करणे. आहार तज्ञ मोहिनी डोंगरे सांगतात की तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयींची जास्तीत जास्त काळजी घेतली पाहिजे. विशेषतः तुम्ही दुपारच्या जेवणात भरपूर जीवनसत्वे, प्रथिने आणि फायबर असलेल्या गोष्टींचा समावेश करणे आवश्यक आहे. लठ्ठपणा कमी करायचा असेल तर दुपारच्या जेवणात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा हे तज्ञांनी सांगितले आहे. जाणून घेऊया कोणते आहे ते पदार्थ.

धान्य

तुम्ही तुमच्या दुपारच्या जेवणात ब्राऊन राईस, क्विनोआ, ओट्स आणि दलिया यांचा समावेश करू शकता जे जास्त काळ पोट भरलेले ठेवण्यास मदत करतात. ब्राऊन राईस मध्ये भाज्या मिसळून तुम्ही पुलाव तयार करून खाऊ शकता.

प्रथिनेयुक्त पदार्थ

प्रथिने युक्त पदार्थ स्नायू मजबूत करण्यास मदत करतात. हे खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि पोटही बऱ्याच वेळ भरलेले राहते. दुपारच्या जेवणात तुम्ही मुगडाळ, टोफू, हरभरा, राजमा, मसूर, चिकन आणि अंडी खाऊ शकता.

हिरव्या पालेभाज्या आणि फळे

हिरव्या पालेभाज्या आणि फळे हे आरोग्यदायी पदार्थांमध्ये गणले जातात. यामध्ये खूप कमी कॅलरीज आहेत जे लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करणाऱ्या लोकांसाठी एक योग्य पर्याय आहे. याच्या सेवनाने तुम्हाला आवश्यक जीवनसत्वे, खनिज आणि फायबर मिळतात. जे पचन संस्था निरोगी ठेवतात. काकडी, गाजर, टोमॅटो आणि सिमला मिरचीचा आहारात समावेश केला जावू शकतो.

स्वतःला हायड्रेट ठेवा

वजन कमी करण्याच्या प्रवासात तुम्ही योग्य प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे असे तज्ञांचे मत आहे. तुम्ही स्वतःला जेवढे हायड्रेट ठेवाल तेवढे जास्त फायदेशीर ठरेल. चयापचय वाढवण्यासोबतच शरीरातील विषारी पदार्थ ही बाहेर काढले जातात. वजन कमी करण्यासाठी हे उपयुक्त आहे.

Follow Us
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैन स्नॅचिंग, पोलिसांनी सापळा...
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैन स्नॅचिंग, पोलिसांनी सापळा....
अचानक बदललं हवामान! डोंबिवलीत वाऱ्याचा तडाखा; शहरभर धुळीचे ढग पसरले...
अचानक बदललं हवामान! डोंबिवलीत वाऱ्याचा तडाखा; शहरभर धुळीचे ढग पसरले....
एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, 25 मिनिटे हवेतच...
एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, 25 मिनिटे हवेतच....
रितू तावडे मुख्यमंत्री होऊ पाहतायत? सुषमा अंधारेंची बोचरी टीका
रितू तावडे मुख्यमंत्री होऊ पाहतायत? सुषमा अंधारेंची बोचरी टीका.
थरकाप उवणारी घटना, तब्बल 22 तास मृत बाळ गर्भात ठेवलं नंतर...
थरकाप उवणारी घटना, तब्बल 22 तास मृत बाळ गर्भात ठेवलं नंतर....
आदिती तटकरे राजीनामा द्या, पुणे अत्याचार प्रकरणानंतर अंधारेंची मागणी
आदिती तटकरे राजीनामा द्या, पुणे अत्याचार प्रकरणानंतर अंधारेंची मागणी.
विजय थलपती यांच्यासाठी मुख्यमंत्रिपद अजूनही दूरच? राज्यापलांनी...
विजय थलपती यांच्यासाठी मुख्यमंत्रिपद अजूनही दूरच? राज्यापलांनी....
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज ठाकरेंच्या भेटीचं गूढ उकललं, स्वतःच
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज ठाकरेंच्या भेटीचं गूढ उकललं, स्वतःच.
सामनातील वृत्तावरून राजकारण तापलं; रितू तावडेंचा जोरदार पलटवार.....
सामनातील वृत्तावरून राजकारण तापलं; रितू तावडेंचा जोरदार पलटवार......
मोठी बातमी! नसरापूरमधील अत्याचार प्रकरणावर सुनावणी पूर्ण, कोर्टात...
मोठी बातमी! नसरापूरमधील अत्याचार प्रकरणावर सुनावणी पूर्ण, कोर्टात....