AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वजन कमी करायचे आहे ? तर दुपारच्या जेवणात करा या पदार्थांचा समावेश

वजन कमी करण्याच्या प्रयत्नात लोक अनेकदा स्वतःच्या शरीराला इजा करतात. आहार तज्ञ म्हणतात की वजन कमी करणे म्हणजे जास्त वेळ उपाशी राहणे असा होत नाही. आपल्या जेवणात जीवनसत्वे आणि प्रथिने असलेल्या पदार्थांचा समावेश करणे वजन कमी करण्यासाठी महत्त्वाचे आहे.

वजन कमी करायचे आहे ? तर दुपारच्या जेवणात करा या पदार्थांचा समावेश
| Edited By: | Updated on: Jan 13, 2025 | 9:00 AM
Share

लठ्ठपणामुळे अनेक आजार होऊ शकतात. निरोगी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी वजनाचे योग्य व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. मात्र लठ्ठपणाची समस्या सहजासहजी कमी करता येत नाही यासाठी आहारासोबतच व्यायामाचे काटेकोर नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे. वजन कमी करणे म्हणजे कॅलरीजची संख्या कमी करणे. आहार तज्ञ मोहिनी डोंगरे सांगतात की तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयींची जास्तीत जास्त काळजी घेतली पाहिजे. विशेषतः तुम्ही दुपारच्या जेवणात भरपूर जीवनसत्वे, प्रथिने आणि फायबर असलेल्या गोष्टींचा समावेश करणे आवश्यक आहे. लठ्ठपणा कमी करायचा असेल तर दुपारच्या जेवणात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा हे तज्ञांनी सांगितले आहे. जाणून घेऊया कोणते आहे ते पदार्थ.

धान्य

तुम्ही तुमच्या दुपारच्या जेवणात ब्राऊन राईस, क्विनोआ, ओट्स आणि दलिया यांचा समावेश करू शकता जे जास्त काळ पोट भरलेले ठेवण्यास मदत करतात. ब्राऊन राईस मध्ये भाज्या मिसळून तुम्ही पुलाव तयार करून खाऊ शकता.

प्रथिनेयुक्त पदार्थ

प्रथिने युक्त पदार्थ स्नायू मजबूत करण्यास मदत करतात. हे खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि पोटही बऱ्याच वेळ भरलेले राहते. दुपारच्या जेवणात तुम्ही मुगडाळ, टोफू, हरभरा, राजमा, मसूर, चिकन आणि अंडी खाऊ शकता.

हिरव्या पालेभाज्या आणि फळे

हिरव्या पालेभाज्या आणि फळे हे आरोग्यदायी पदार्थांमध्ये गणले जातात. यामध्ये खूप कमी कॅलरीज आहेत जे लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करणाऱ्या लोकांसाठी एक योग्य पर्याय आहे. याच्या सेवनाने तुम्हाला आवश्यक जीवनसत्वे, खनिज आणि फायबर मिळतात. जे पचन संस्था निरोगी ठेवतात. काकडी, गाजर, टोमॅटो आणि सिमला मिरचीचा आहारात समावेश केला जावू शकतो.

स्वतःला हायड्रेट ठेवा

वजन कमी करण्याच्या प्रवासात तुम्ही योग्य प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे असे तज्ञांचे मत आहे. तुम्ही स्वतःला जेवढे हायड्रेट ठेवाल तेवढे जास्त फायदेशीर ठरेल. चयापचय वाढवण्यासोबतच शरीरातील विषारी पदार्थ ही बाहेर काढले जातात. वजन कमी करण्यासाठी हे उपयुक्त आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.