AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केस मुळापासून होतील मजबूत, फक्त ‘हा’ आयुर्वेदिक हेअरपॅक आठवड्यातून दोनदा लावा

आजकाल केस गळणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. केस निरोगी ठेवण्यासाठी नैसर्गिक घटक खूप फायदेशीर ठरतात. या लेखात आपण एका आयुर्वेदिक हेअर पॅकबद्दल जाणून घेणार आहोत. जो तुमचे केस मुळापासून मजबूत करून केस गळणे कमी करण्यास मदत करेल.

केस मुळापासून होतील मजबूत, फक्त 'हा' आयुर्वेदिक हेअरपॅक आठवड्यातून दोनदा लावा
hairImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Edited By: | Updated on: Apr 08, 2026 | 11:35 PM
Share

केस प्रमाणापेक्षा जास्त गळू लागल्यावर ही कोणासाठीही चिंतेची बाब ठरते. कारण केस हे आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक अविभाज्य भाग आहे. प्रदूषण, अनहेल्दी आहार, केसांसाठी केमिकल प्रोडक्टचा अती वापर या सर्वांमुळे केसांच्या समस्यांमध्ये वाढ होत असते. यामुळेच आता बाजारात विविध प्रकारचे महागडे सीरम, तेल आणि कॉस्मेटिक उपचार उपलब्ध आहेत. मात्र बाजारातील केमिकलयुक्त प्रोडक्ट वापरण्याऐवजी आपण आपल्या आरोग्यासाठी, केसांसाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर असलेल्या नैसर्गिक घटकांना अधिकाधिक करावा. कारण यामुळे कोणतेच साईड इफेक्ट केसांना होत नाही.

कारण नैसर्गिक घटकांमध्ये अनेक पॉवरफुल अँटिऑक्सिडंट्स असतात, जे तुमचे केस निरोगी ठेवण्यासाठी खूप प्रभावी मानले जातात. चला तर मग आयुर्वेदिक नैसर्गिक हेअर पॅकबद्दल जाणून घेऊयात. जो तुमच्या केसांना मुळापासून मजबूत करेल.या पॅकचे इतरही अनेक फायदे आहेत तेही जाणून घेऊयात.

आयुर्वेदिक हेअरपॅक बनवण्यासाठी लागणारे साहित्य

1 मोठा चमचा आवळा पावडर, 1 मोठा चमचा मेथीच्या दाण्यांची पावडर, 1 मोठा चमचा जास्वंदीच्या पानांची पेस्ट (ताजी वाटलेली), 1-2 मोठे चमचे दही , 1 छोटा चमचा खोबरेल तेल, 1 छोटा चमचा कोरफडी जेल लागेल.

हेअरपॅक कसा तयार करावा?

एका मोठ्या भांड्यात आवळा पावडर, मेथीच्या दाण्यांची पावडर आणि इतर सर्व साहित्य एकत्र करून त्याची गुळगुळीत पेस्ट बनवा. पेस्टचा घट्टपणा एकसारखा असावा, पेस्ट खूप पातळ किंवा खूप कोरडी नसावी. पेस्टचा पोत असा असावा की ती टाळूपासून केसांच्या टोकांपर्यंत समान रीतीने पसरेल.

हेअरपॅक केसांना लावण्याची पद्धत

या पेस्टचा थोडासा भाग हातावर घ्या आणि तो टाळू, केसांच्या मुळांना आणि संपूर्ण केसांना समान रीतीने लावा. सुरुवातीला केसांचे लहान लहान भाग करा आणि पेस्ट व्यवस्थित लावा. ही पेस्ट 20 ते 30 मिनिटे तशीच राहू द्या. त्यानंतर सौम्य शाम्पूने केस धुवा.

या पॅकचे अनेक फायदे आहेत.

तुम्ही हा पॅक आठवड्यातून 1-2 वेळा तुमच्या केसांना लावू शकता. जेव्हाही हा पॅक तुम्हाला लावायचा असेल तेव्हाच तो तयार करा, जेणेकरून तुमच्या केसांना त्याचे पूर्ण फायदे मिळू शकतील. आवळ्याच्या वापरामुळे हा पॅक तुमच्या केसांची मुळे मजबूत करतो आणि कोंडा कमी करतो. तसेच खोबरेल तेल आणि कोरफड जेलच्या वापरामुळे केस गळणे कमी होते, केस मऊ होतात. तसेच केसांचा कोरडेपणा कमी होतो.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
नारी शक्ती विधेयकावर लोकसभेत घमासान; अरविंद सावंतांचा सरकारला सवाल
नारी शक्ती विधेयकावर लोकसभेत घमासान; अरविंद सावंतांचा सरकारला सवाल.
महिला आरक्षणावरून कोल्हेंचा हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला
महिला आरक्षणावरून कोल्हेंचा हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला.
विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक... मोदी असं का म्हणाले?
विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक... मोदी असं का म्हणाले?.
महिलांच्या अधिकारांना विरोध करणाऱ्यांना महिलांनीच उत्तर दिलं – मोदी
महिलांच्या अधिकारांना विरोध करणाऱ्यांना महिलांनीच उत्तर दिलं – मोदी.
पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट; सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये?
पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट; सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये?.
विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान
विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान.
आयटी कंपनीतील धर्मांतराचा उद्रेक... सकल हिंदू समाजाचा महाएल्गार
आयटी कंपनीतील धर्मांतराचा उद्रेक... सकल हिंदू समाजाचा महाएल्गार.
नारी शक्ती की भाजपा शक्ती?; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
नारी शक्ती की भाजपा शक्ती?; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल.
काहीच आठवेना... माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती चिं
काहीच आठवेना... माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती चिं.
महापालिकेत आत्म्यांचा वावर?, मंत्र्यांचं धक्कादायक विधान
महापालिकेत आत्म्यांचा वावर?, मंत्र्यांचं धक्कादायक विधान.