AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

4‍5 डिग्री तापमानात, आरोग्याची आणि त्वचेची कशी काळजी घ्यावी ? काय खावे आणि परिधान करावे जाणून घ्या

25 मे पासून महाराष्ट्राच्या काही ठिकाणी त्याव्यतिरकक्त काही राज्यांमध्ये उष्णतेचा तापमान खूप वाढणार आहे. या काळात खाण्यापिण्यापासून ते कपड्यांपर्यंत प्रत्येक गोष्टीची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या दिवसांमध्ये स्वतःची काळजी कशी घ्यावी हे आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.

4‍5 डिग्री  तापमानात, आरोग्याची आणि त्वचेची कशी काळजी घ्यावी ?  काय खावे आणि परिधान करावे जाणून घ्या
health care in summer
| Edited By: | Updated on: May 24, 2026 | 11:20 PM
Share

महाराष्ट्रातील काही भागांमध्ये तसेच काही राज्यांमध्ये उष्णतेची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. 45 डिग्रीच्या वर उष्णतेचा पारा जात आहे. या दिवसांत घराबाहेर पडणेही कठीण होणार आहे. तथापि कामामुळे अनेक लोकांना आपली घरे सोडावी लागतात. तज्ञांचा सल्ला आहे की, जर तुम्ही या कडक उन्हात बाहेर जात असाल, तर तुम्हाला स्वतःची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या भीषण उन्हाळ्यात तुम्ही काय खाता-पिता यापासून ते कोणत्या प्रकारचे कपडे परिधान करता यापर्यंत प्रत्येक गोष्टीबाबत तुम्हाला योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे.

कारण थोड्याशा निष्काळजीपणामुळे डिहायड्रेशन, उष्माघात, उष्णतेमुळे येणारे पुरळ आणि त्वचा काळवंडणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. उष्णतेचा प्रभाव कमी करण्यासाठी शरीर आतून थंड आणि आर्द्र ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हलके आणि आरामदायक कपडे परिधान करणे आणि त्वचेची योग्य काळजी घेणे त्वचेला कोरडेपणा आणि उन्हामुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवू शकते. चला या वाढत्या उष्णतेच्या तापमानात आपण काय खावे, कोणते कपडे परिधान करावे आणि काय टाळावे हे जाणून घेऊयात.

रखरखत्या उन्हात आरोग्य चांगले राहण्यासाठी या गोष्टींचे सेवन करा

कडक ऊन, उष्ण वारे आणि प्रचंड उष्णता ही दिवसेंदिवस वाढतच चालेली आहे.त्यामुळे या दिवसांत शरीर थंड ठेवणे आवश्यक आहे. आयुर्वेद तज्ञ सांगतात की या भीषण उन्हाळ्यात थंडावा देणारे आणि पोषक तत्वांनी समृद्ध असलेले पदार्थ खावेत. जसे की आपल्या आहारात कच्ची काकडी, खरबूज, कलिंगड, कांदा, हिरवी मिरची आणि टोमॅटो यांचा समावेश करा. हे पदार्थ तुम्हाला उष्माघातापासून वाचवण्यास मदत करतील. याव्यतिरिक्त आपल्या आहारात मोसमी फळे आणि भाज्यांचा समावेश करा. कलिंगड, खरबूज, दोडका, दुधी, कारले, पुदिना आणि कोथिंबीर हे चांगले पर्याय आहेत.

याव्यतिरिक्त शरीरातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी, केवळ पाणीच नव्हे तर नारळाचे पाणी, ताक, बडीशेपचे सरबत, बेलफळाचे सरबत आणि आंब्याच पन्हं यांसारखी घरी बनवलेली पौष्टिक पेये देखील प्या.

या गोष्टी टाळा

उष्णतेत डिहायड्रेशनचा धोका अधिक असतो. त्यामुळे, चहा आणि कॉफी माफक प्रमाणात पिण्याचा प्रयत्न करा. तसेच, थंड पेये टाळा. यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते. याशिवाय, गरमीच्या या दिवसांत तेलकट, मसालेदार आणि बाहेरचे खाणे टाळा. यामुळे पचनक्रियेत अडथळा येऊ शकतो.

योग्य कपडे निवडा

उन्हाचा तडाखा खूप तीव्र होत चालेला आहे. त्यामुळे शरीराला अधिक आरामाची गरज असते. हलके, सुती किंवा लिननचे कपडे परिधा करण्याचा प्रयत्न करा. हे कपडे घाम शोषून घेतात आणि आराम देतात. घट्ट किंवा जाड कपडे घालणे टाळा. बाहेर जाताना डोके आणि चेहरा झाकण्याचे लक्षात ठेवा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल