AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय म्हणतात, आता गाढवांनाही महत्व आले, चोरट्यांनी चोरली १२ गाढवे

सोने-चांदी दगिने व रुपये यांची चोरी नेहमीच होत असते. भुरटे चोर मग शेतकऱ्यांच्या शेतातील पाईप, वायरी चोरुन नेतात. काही वेळा गायी, म्हैशींची चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

काय म्हणतात, आता गाढवांनाही महत्व आले, चोरट्यांनी चोरली १२ गाढवे
गाढवांची चोरीImage Credit source: social media
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Feb 09, 2023 | 3:26 PM
Share

कोपरगाव, नगर : चोरीच्या वेगवेगळ्या घटना आपण पहिल्या असतील, वाचल्या असतील. सोने-चांदी दगिने व रुपये यांची चोरी नेहमीच होत असते. भुरटे चोर मग शेतकऱ्यांच्या शेतातील पाईप, वायरी चोरुन नेतात. काही वेळा गायी, म्हैशींची चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु तुम्हाला जर सांगितले की गाढवांची चोरी झाली आहे तर…तुमचा विश्वास बसणार नाही. होय चक्क एक-दोन नव्हे बारा गाढवांची चोरी झाली आहे. मग या गाढवांच्या चोरीचा (Stealing Donkey ) गुन्हा पोलिसांत (police) दाखल झाला आहे. आता पोलिसांना आपल्या इतर कामांबरोबर गाढवांचा चोर शोधावा लागणार आहे.

नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात चोरीची एक अजब घटना घडली आहे. कोपरगाव तालुक्यातील धारणगाव येथे अजब गजब चोरीची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी राहत्या घराच्या समोरील पटांगनातून चक्क १२ गाढवांची चोरी केली आहे. लक्ष्मण किसन कापसे यांच्या मालकीची ही गाढवे होती.

पोलिसांत गुन्हा दाखल

धारणगाव येथील रहिवाशी असलेले लक्ष्मण किसन कापसे यांचा पारंपरिक माती व्यवसाय आहे. ते माती वाहण्यासाठी गाढवांचा वापर करतात. ३ फेब्रुवारी रोजी रात्री त्यांनी आपले १४ लहान मोठे गाढव घरासमोर बांधून ठेवले होते. ३ ते ४ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी त्यांची १२ गाढव लंपास केली.

या गाढवांची किमत सुमारे ८५ हजार आहे. मग लक्ष्मण कापसे यांनी परिसरात गाढवांचा शोध घेतला. परंतु गाढवे मिळाली नाही. यामुळे अखेरी त्यांनी तालुका पोलिसांत गाढव चोराविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरिक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अशोक आंधळे करीत आहे.

माती वाहण्यासाठी उपयोगी

गाढवाचा उपयोग माती वाहण्यासाठी केला जातो. यामुळे कुंभारांकडे गाढव असते. आता उन्हाळा येणार आहे. यामुळे कामाचा हंगाम सुरू होणार आहे. या परिस्थितीत दिमतीला असणारी गाढवं चोरीली गेली तर गरीब कुटुंब हवालदिल होतात. आधीच हातावर पोट असलेली ही माणसं आता कर्जाच्या नव्या ओझ्यामुळे पुरती वाकली जातायत.

Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....