AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आहे कुणाचं योगदान, लाल दिव्याच्या गाडीला, आजही आहे चर्चेत, नेमकं कारण काय ?

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर लिहिण्यात आलेल्या 'आहे कुणाचे योगदान, लाल दिव्याच्या गाडीला' या गाण्याने एकच धूम उडवून दिली. अवघी तरुणाई या गाण्यावर आज थिरकत असून सोशल माध्यमावर त्याचे निरनिराळे क्लिप्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

आहे कुणाचं योगदान, लाल दिव्याच्या गाडीला, आजही आहे चर्चेत, नेमकं कारण काय ?
DR. BABASAHEB AMBEDKAR Image Credit source: TV9 NETWORK
Mahesh Pawar
Mahesh Pawar | Updated on: Apr 14, 2023 | 4:00 PM
Share

मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती देशभरात मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे. दादर येथील चैत्यभूमीवर आंबडेकरी अनुयायांच्या गर्दीचा भीमसागर जमा झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांची शिकवण दिली. त्याची आठवण अजूनही अनुयायांना होत आहेच. पण, आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर लिहिण्यात आलेल्या ‘आहे कुणाचे योगदान, लाल दिव्याच्या गाडीला’ या गाण्याने एकच धूम उडवून दिली. अवघी तरुणाई या गाण्यावर आज थिरकत असून सोशल माध्यमावर त्याचे निरनिराळे क्लिप्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

१९४५ मध्ये ब्रिटनच्या सरकारने संविधान निर्माण समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. ब्रिटीश पंतप्रधान अॅटली यांनी भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न सोडवण्यासाठी लॉरेन्स, क्रिप्स, अलेक्झांडर या तीन कॅबिनेट मंत्र्यांना भारतात पाठवले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. त्यांनंतर ही संविधान सभा पूर्णपणे सार्वभौम झाली.

संविधान सभेचे सदस्य भारतातील राज्यांच्या विधानसभांच्या निवडून आलेल्या सदस्यांनी निवडले होते. यात डॉ. राजेंद्र प्रसाद, डॉ. भीमराव आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, श्यामा प्रसाद मुखर्जी, जवाहरलाल नेहरू, मौलाना अबुल कलाम आझाद यांचा समावेश होता. तर, अनुसूचित जातीतील 30 हून अधिक सदस्यांचा या सभेत सहभाग होता.

संविधान लागू झाले

सच्चिदानंद सिन्हा हे या बैठकीचे पहिले अध्यक्ष होते. त्यानंतर डॉ.राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्षपदी निवड झाली. डॉ. भीमराव आंबेडकर यांची संविधान समितीच्या सभापतीपदी निवड करण्यात आली. 2 वर्षे, 11 महिने, 18 दिवसात भारताचे संविधान तयार झाले. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना संविधान सभेने स्वीकारली आणि 26 जानेवारी 1950 रोजी भारतात संविधान लागू झाले.

संविधानाने भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक देश म्हणून घोषित करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या संविधानामुळेच भारतीय नागरिकांना न्याय, समानता, स्वातंत्र्य याची हमी मिळावी. बंधुत्वाची प्रेरणा मिळाली. संविधानाने दिलेल्या अधिकारामुळेच देशाच्या राष्ट्रपती या सर्वोच्च पदासह आज अनेक महत्वाच्या पदांवर अनुसूचित जाती जमाती, दलित यासारख्या समाजाने दूर लोटलेल्या समाजाला आधार मिळाला, अधिकार मिळाला.

लाल दिव्याची गाडी वापरण्याचे अधिकार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिताना देशातील नऊ व्यक्तींना महत्वाचे स्थान दिले. फक्त या व्यक्तींनाच लाल दिव्याची गाडी वापरण्याचे अधिकार दिले. यात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, सभापती आणि सरन्यायाधीश या केंद्रातील घटनात्मकपदाचा समावेश होता. त्याचसोबत सर्व राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, विधीमंडळाचे सभापती, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांचाही यामध्ये समावेश करण्यात आला होता.

गाण्याची आठवण

लाल दिव्याची गाडी मिळणे हे त्याकाळी प्रतिष्ठेचे लक्षण मानले जायचे. बाबासाहेब यांच्यामुळेच मागास समाजातील काहींना हा मान, पद, प्रतिष्ठा मिळाली. त्यामुळे आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी तरुणाईला ‘आहे कुणाचं योगदान, लाल दिव्याच्या गाडीला’ या गाण्याची आठवण होत होती.

बाबासाहेब यांच्या त्या साऱ्या साऱ्या आठवणीने तरुणाईचे मन भरून येत होते. आज या महामानवाने पुन्हा या देशात अवतार घ्यावा. देशात पुन्हा एकदा एक नवी क्रांती ज्योत चेतवावी अशीच भावना या तरुणाईची होती. सोशल माध्यमावर या तरुणाईने अनेक क्लिप तयार करून या महामानवाला वंदन केले.

Follow Us
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?
खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी
खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी घेण्याचे आवाहन!
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर; औरंगाबादमध्ये नवं समीकरण
एकच खळबळ! माणूस मॅनहोलमध्ये कसा काय पडला? CCTV तून धक्कादायक माहिती
एकच खळबळ! माणूस मॅनहोलमध्ये कसा काय पडला? CCTV तून धक्कादायक माहिती समोर
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट खोल मॅनहोलमध्ये...
आता ऑपरेशन तुतारी! कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट
Sanjay Shirsat On Amol Kolhe | ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी! अमोल कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट, म्हणाले...