AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समनापूर, कोल्हापूरनंतर आता इचलकरंजीत तणाव, कोल्हापूर प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई, इंटरनेट बंदच

Hindutva organizations in Kolhapur : राज्यात गेल्या तीन दिवसांपासून तणावाचे वातावरण आहे. आधी अहमदनगर जिल्ह्यात निर्माण झालेल्या तणावानंतर कोल्हापूर जिल्ह्यात तणाव निर्माण झाला आहे. दोन दिवसांपासून कोल्हापुरात तणाव आहे.

समनापूर, कोल्हापूरनंतर आता इचलकरंजीत तणाव, कोल्हापूर प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई, इंटरनेट बंदच
Kolhapur police
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jun 08, 2023 | 11:49 AM
Share

भूषण पाटील, कोल्हापूर : अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील समनापूर गावात मंगळवारी दोन गटात वाद झाला. संगमनेरमध्ये मंगळवारी सकाळी मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्च्यानंतर घरी परतत असताना संगमनेर तालुक्यापासून 5 ते 6 किमी अंतरावर असलेल्या समनापूर गावात दोन गटात वाद झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर बुधवारी कोल्हापूर शहरातील सात तरुणांच्या मोबाईलमध्ये औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचा स्टेटस ठेवल्याचा प्रकार समोर आला. यामुळे बुधवारी कोल्हापुरात तणाव होता. आता गुरुवारी कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीत तणाव निर्माण झाला आहे.

कशामुळे इचलकरंजीत तणाव, दोन जण ताब्यात

इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या खोतवाडी गावातील मतदार गल्लीमध्ये दोन अल्पवयीन मुलांनी आपल्या मोबाईलवर औरंगजेब अन् टिपू सुलतानचे आक्षेपार्य स्टेटस ठेवले होते. ही माहिती हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना मिळतात त्या मुलांच्या घरी जाऊन त्यांना चांगला चोप दिला. दरम्यान, शहापूर पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गावमध्ये सध्या पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच कोणता अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आले आहे. तसेच खोतवाडी गावामध्ये चौका चौकामध्ये पोलीस तैनात आहे.

इचलकरंजी येथील कबनूर गावातील हनुमान मंदिराशेजारी अज्ञात व्यक्तीने मजकूर लिहिल्याने तणाव निर्माण जाला आहे. तर कोल्हापूरच्या खोतवाडी गावातही स्टेट्सवरून तणाव निर्माण झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दोन्ही गावात धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

कोल्हापुरात 36 जणांना अटक

कोल्हापूर शहरातील तणावासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. त्यांनी सांगितले की, 3 वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये 300-400 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यात बेकायदेशीर जमाव जमावणे, धार्मिक तेढ निर्माण करणे, दगडफेक करुन नुकसान करणे, पोलिसांच्या आदेशाचं पालन न करणं या आरोपांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी 36 जणांना अटक केली आहे तसेच 3 अल्पवयीन मुलांना बालसुधार गृहात पाठवलं आहे. स्टेटस ठेवल्याप्रकरणी 5 अल्पवयीन मुलांना बाल सुधार गृहात पाठवलं असल्याचे पंडीत यांनी सांगितले.

इंटरनेट सेवा रात्री 12 पर्यंत बंद राहणार

कोल्हापुरातील इंटरनेट सेवा रात्री 12 पर्यंत बंद राहणार आहे. शहरात 4 SRPF, 300 पोलीस, 60 अधिकारी बंदोबस्तासाठी नियुक्त केले आहेत. सध्या जिल्ह्यात शांतता आहे. गरज पडली तर आणखी फोर्स मागवणार असल्याचे पोलीस अधीक्षक पंडीत यांनी सांगितले. सीसीटीव्ही तपासून पुढील कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पाडळी गावात तणाव

कोल्हापूर वरणगे पाडळी (ता. करवीर) येथील एका तरुणाने औरंगजेबाच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर स्टेटस ठेवल्याचा प्रकार बुधवारीसमोर आल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला. वरणगे पाडळीतील एका 20 वर्षीय तरुणाने आपल्या मोबाईलवर औरंगजेबाचा स्टेटस ठेवल्याचे हिंदुत्ववादी संघटनांच्या निदर्शनास आहे. सुमारे 700 ते 800 च्या जमावाने संबंधित तरुणाच्या घरावर चाल करून जाब विचारण्याचा प्रयत्न केला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलिसांचे पथक रात्री उशिरा गावात दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.