AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक, अहमदनगरमध्ये एकाच कुटुंबातील 10 जणांना कोरोना, परिरसरात खळबळ

अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील उंदिरागावमधील एकाच कुटुंबातील 10 जणांना कोरोना झाल्यानं खळबळ माजली आहे. (Ahmednagar Shrirampur Undirgaon Corona)

धक्कादायक, अहमदनगरमध्ये एकाच कुटुंबातील 10 जणांना कोरोना, परिरसरात खळबळ
कोरोना संसर्ग वाढतोय
| Updated on: Feb 17, 2021 | 3:29 PM
Share

अहमदनगर : राज्यात आठ दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. राज्य सरकार आणि प्रशासन त्यामुळं सतर्क झालं आहे. अमरावती, अकोला जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. तर, वर्धा जिल्ह्यातील एका शाळेतील 100 पेक्षा जास्त जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. आता, अहमदनगर जिल्ह्यातील एका कुटुंबातील 10 जणांना कोरोना झाल्याचं समोर आलं आहे.(Ahmednagar ten persons corona infected in one family of Shrirampur Taluka)

एकाच घरातील 10 जणांना कोरोना झाल्यानं खळबळ

एकाच घरातल्या दहा जणांना कोरोना झाल्याच समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील उंदिरगाव येथील दहा जणांना कोरोनाची लागण झालीय. कुटूंबातील एक तरुण पुणे येथे काही दिवस गेला. पुण्याहून घरी आल्यावर त्यास ताप आल्यानंतर तपासणी केली असता ‌कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले. त्यानंतर कुटूंबातील इतरांची तपासणी केल्यानंतर तरुणासह एकुण 10 जणांनाही लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

जिल्हा रुग्णालयात उपचार

उंदिरगावमधील एका कुटुंबातील 10 जणांना कोरोना झाल्याचं समोर आल्यानंतर शासकीय रुग्णवाहिकेतून त्यांना जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे‌. कोरोनाचा विळखा पुन्हा एकदा वाढत चालला असल्याच दिसूय‌ येत आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यानी कोरोना नियंत्रणासाठी जारी केलेल्या नियमावलीची‌ कठोर अंमलबजावणी करणार असल्याचं जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी म्हटलं आहे.

अहमदनगर जिल्हा कोरोनाबाधित आकडेवारी

एकूण रूग्णसंख्या: 73 हजार 765 मृत्यू:1116 सध्या उपचार सुरू: 855 बरे झालेल्या रूग्णांची संख्या : 71 हजार 794 बरे होण्याचे प्रमाण :97.33% मृत्यू दर:1.5%

दरम्यान, कारण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांपाठोपाठ आता मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी देखील तसा इशारा दिला आहे. कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढल्यास पुन्हा एकदा लॉकडाऊनचा विचार करावा लागेल, असा इशारा आता मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला. ते चंद्रपुरात बोलत होते. यावेळी वडेट्टीवारांनी अमरावती-नागपुरातील वाढत्या रुग्णसंख्येवरुनही चिंता व्यक्त केली.

संबंधित बातम्या: मोठी बातमी! महाराष्ट्रातील ‘हा’ तालुका झाला कोरोनामुक्त; 14 दिवसात एकही रुग्ण आढळला नाही

‘या’ राज्यांंमध्ये कोरोनाची लस मोफत! महाराष्ट्रात काय स्थिती? जाणून घ्या एका क्लिकवर

(Ahmednagar ten persons corona infected in one family of Shrirampur Taluka)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.