AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अयोध्येत श्रीराम, तर बिहारमध्ये…; नीतीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर संजय राऊतांची कोपरखळी

Sanjay Raut on Nitish Kumar Resignation : नीतीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया... म्हणाले त्यांनी राजीनामा दिला, तो... बिहारच्या राजकारणात प्रचंड वेगवान घडामोडी घडत असताना महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाततून यावर प्रतिक्रिया आली आहे. संजय राऊतांनी यावर भाष्य केलं आहे.

अयोध्येत श्रीराम, तर बिहारमध्ये...; नीतीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर संजय राऊतांची कोपरखळी
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Jan 28, 2024 | 1:10 PM
Share

कुणाल जायकर, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, अहमदनगर | 28 जानेवारी 2024 : बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ होत आहे. इंडिया आघाडीशी काडीमोड करत जेडीयूचे नेते नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा एनडीएची वाट धरली आहे. नीतीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. थोड्याच वेळात ते पुन्हा एकदा एनडीएचे नेते म्हणून बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. या सगळ्यावर इंडिया आघाडीतून काही प्रतिक्रिया समोर येत आहेत. ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी या सगळ्या घटनाक्रमावर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. ते अहमदनगरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

राऊत काय म्हणाले?

महाविकास आघाडीची, इंडिया आघाडीची परिस्थिती उत्तम आहे. नितीश कुमार यांचे मानसिक स्वास्थ्य ठीक नाही. नितीश कुमार आमच्यापासून दूर गेले तर आम्हाला काहीही फरक पडणार नाही. नितीश कुमार यांनी राजीनामा दिला, तो त्यांचा छंद आहे. अयोध्येत राम आहेत तर बिहारमध्ये पलटूराम आहेत. सगळ्यात मोठे पलटूराम भाजप आहे, असं संजय राऊत म्हणालेत. छगन भुजबळ यांनी राजीनामा द्यावा, ते सरकारमध्ये अस्वस्थ असतील तर त्यांनी बाहेर पडावं, असा सल्लाही राऊतांनी दिला आहे.

राऊतांचा सरकारवर निशाणा

राहुल गांधींची यात्रा का रोखता? जर तुमचा 400 पारचा नारा असेल तर घाबरता? राज्यात गुंडगिरीवर सुरू आहे. नवीन सरकार आल्यापासून अहमदनगरच्या आमदारांची गुंडगिरी वाढली आहे. अहमदनगरमध्ये गुंडांच राज्य सुरू झालं आहे. हे गुंड आता सरकारमध्ये सहभागी झालेत, असं म्हणत संजय राऊत यांनी संग्राम जगताप यांच्यावर टीका केली आहे.

राऊतांचा निशाणा आणि इशारा

अहमदनगरमध्ये देवस्थानच्या जागा लुटल्या गेल्या आहेत. शैक्षणिक संकुलाच्या जागा इकडेच आमदार लुटत आहेत. त्यांनी निदान देवस्थानच्या जागा तरी सोडायला हव्या होत्या, असं म्हणत संजय राऊत संग्राम जगताप यांच्यावर जोरावर शाब्दिक हल्ला चढवला. या ताबा मारीवर आता छापामारी कशी करायची हे शिवसेनेला माहिती आहे. सरकारने ताबेमारी थांबवली नाही तर अहमदनगरच्या रस्त्यावर तमाशा होईल, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.

Follow Us
‘स्कूल ठीक करो’ मोहिमे अंतर्गत CJP पदाधिकारी आणि दादा भुसे यांची भेट
मंत्री दादा भुसे आणि कॉकरोच जनता पार्टीची भेट
OBC आश्रमशाळांना इशारा; मूलभूत सुविधा न दिल्यास मान्यता रद्द
राज्यातील जिल्हा परिषद शाळा आणि आश्रमशाळांच्या दयनीय स्थितीवर मंत्र्यांची कठोर भूमिका
आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट