
अजित पवार यांचे 28 जानेवारीला विमान अपघातात निधन झाले. बारामती विमानतळावर उरतण्याच्या काही मिनिटे आधी अजित दादांचे विमान कोसळून मोठा स्पोट झाला. या अपघातात विमानातील 5 जणांचा मृत्यू झाला. मात्र अनेकांनी या अपघातावर शंका उपस्थित केली आहे. अनेकांनी या विमानात 6 जण प्रवास करत होते, मग 5 लोकांचेच मृतदेह का सापडले असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच काही नेत्यांनी हा अपघात नसून घातापात आहे असा आरोप करत या विमान अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. अशातच आता या विमानात नेमके किती लोक होती याची माहिती समोर आली आहे. या प्रश्नावर एका प्रत्यक्षदर्शीने विमानात नेमके किती लोक होते याची माहिती दिली आहे.
अजित पवार यांचा अपघात झाल्यापासून या विमानात किती लोक होते याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, या विमानात 5 लोकं होते. यात दोन पायलट, अजित पवार, एक एअर होस्टेस आणि अजित पवार यांचे अंरक्षक होते अशी माहिती विमान कंपनीने दिली आहे. मात्र काही नेत्यांनी या विमानात 6 लोक असल्याचा दावा केला जात आहे. आता प्रत्यक्षदर्शी आणि गोजुबावी गावचे सरपंच कल्याण आटोळे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
कल्याण आटोळे म्हणाले की, विमान 8.35 ते 8.40 च्या आसपास गावाच्या बाजूने घिरट्या घालून आलं आणि त्याने उतरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ते एका बाजूला झुकले आणि धावपट्टीजवळ कोसळले. विमान पडल्यानंतर मी तिथे पोहोचलो. त्यावेळी एक निळी पॅन्ट असलेला माणूस विमानातून उतरायचा प्रयत्न करत होता, म्हणजे त्याचा पाय बाहेर होता आणि दरवाजा थोडा उघडलेला होता असं मला जाणवलं. त्याचवेळी गावातील एकाने मला सांगितलं की सरपंच पुढे येऊ नका स्फोट होऊ शकतो, त्यामुळे मी मागे सरलो आणि विमानाचा मोठा स्फोट झाला.
पुढे बोलताना कल्याण आटोळे म्हणाले की, ‘विमानाच्या स्पोटानंतर मी डावीकडे गेलो, तिथे एक बॉडी पडली होती. त्यावेळी किरण गुजर आले आणि त्यांनी सांगितलं की हे अजित दादांचे विमान आहे आणि हे दादा आहेत. मात्र आमचा त्यावर विश्वास बसला नाही. उजव्या बाजूला दादांचे अंगरक्षक पडलेले होते. आतमध्ये 3 लोक होते. आम्ही ट्रॅक्टरने विमान तोडून आतील लोक बाहेर काढले. म्हणजे आतमध्ये पाचच लोक होते. दादा, त्यांचे अंगरक्षक आणि आतील 3 लोक असे पाच लोक होते.’