AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदेंनी केलेली ‘ती’ चूक अजित पवार करणार नाहीत? 40 आमदारांचा गट कसा बाहेर पडणार? ऑपरेशन लोटस म्हणजे नेमकं काय?

Ajit Pawar News | अजित पवार यांच्या बंडाची बातमी खरी असेल तर महाराष्ट्रात ऑपरेशन लोटसची जास्त शक्यता आहे, असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय.

एकनाथ शिंदेंनी केलेली 'ती' चूक अजित पवार करणार नाहीत? 40 आमदारांचा गट कसा बाहेर पडणार? ऑपरेशन लोटस म्हणजे नेमकं काय?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 18, 2023 | 1:19 PM
Share

नागपूर : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) पुन्हा एकदा सत्तांतराच्या चर्चा सुरु आहेत. या बदलात जे सहभागी आहेत, त्यांनी आतापर्यंत स्पष्ट वक्तव्य केलेलं नसलं तरीही राज्यभरात स्थानिक पातळीपासून मुंबईपर्यंत प्रचंड घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणेच अजित पवार (Ajit Pawar) पक्षातून बाहेर पडणार असल्याचे संकेत आहेत. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांचा गट घेऊन ज्या पद्धतीने बंडखोरी केली, ती चूक आता अजित पवार करणार नाहीत, अशी चर्चा आहे. त्यांनी ती चूक टाळली तरच पुन्हा सत्तापेच उद्भवणार नाही, असं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय. एकनाथ शिंदे यांचा गट भाजपात विलीन झाला नाही ना त्यांनी शिवसेना सोडली.. आता अजित पवार नेमकं काय करू शकतात, यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं भाष्य केलंय.

एकनाथ शिंदेंनी काय चूक केली?

एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांचा गट घेऊन शिवसेना सोडली नाही. तर पक्षनेतृत्व मान्य नसल्याचं पत्र राज्यपालांना दिलं होतं. एवढ्या मोठ्या संख्येने आमदार बाहेर पडत असतील तर त्यांनी दुसऱ्या पक्षात विलीन होणं आवश्यक असतं. अन्यथा पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन होतं. सुप्रीम कोर्टात एकनाथ शिंदे यांच्याविरोधात याच मुद्द्यावरून खटला सुरु आहे. कोर्टाचा निकाल कोणत्याही क्षणी लागू शकतो, यात शिदेंसह १६ आमदार अपात्र ठरण्याची शक्यता आहे.

अजित पवार चूक कशी टाळणार?

आता अजित पवार एकनाथ शिंदे यांच्यासारखी चूक करणार नाहीत, म्हणजे नेमकं काय करणार? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ते एवढ्या सहजा सहजी सोडतील, असं वाटत नाही. तर भाजपात विलीन होण्यासारखी नामुष्कीदेखील ओढवून घेऊ शकत नाहीत. त्यामुळे तिसरा मार्ग काढला जाऊ शकतो. याला ऑपरेशन लोटस असे म्हणता येईल. पृथ्वीराज चव्हाण यांनी याबद्दल सविस्तर सांगितलं.

ऑपरेशन लोटस काय आहे?

अजित पवार हे लवकरच बंडखोरी करणार, अशी बातमी पाहिली. ही बातमी गृहित धरली तर काय घडू शकतं, यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केलंय. ते म्हणाले, ‘ ही मंडळी भाजपमध्ये जायला तयार आहेत का ते पहावं लागेल. ते भाजपमध्ये मर्ज होणार का आणखी काही मार्ग काढणार आहेत हेही महत्त्वाचं आहे. जोपर्यंत दुसऱ्या पक्षात फुटीर गट विलीन होत नाही, तोपर्यंत पक्षांतर्गत बंदी कायदा लागू होतो. त्यामुळे इथे ऑपरेशन लोटसची शक्यता आहे. म्हणजे काही आमदारांनी राजीनामा द्यायचा. याचं कुणाला बंधन नसतं. असं झाल्यास सभागृहाची संख्या 288 वरून कमी होते. परिणामी मध्यबिंदू अर्थात मॅजिक फिगर खाली जातो. राजकीय समीकरणं बदलू शकतात. जे राजीनामा देऊन बाहेर पडतील. सामान्य नागरिक होतात. त्यांना मंत्री होता येतं. असे प्रयोग कर्नाटकात वगैरे झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस घडू शकतं, अशी शक्यता पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.