बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर आज मातोश्रीवर महत्वाची बैठक, उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय..

ठाकरे गटातून मोठी बंडखोरी झाली. तब्बल 6 खासदार आणि एका विधान परिषदेच्या आमदाराने पक्षातून बंड केली. आता नाशिक महापालिकेत मोठा दणका ठाकरे गटाला बसण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठाकरे गट अलर्ट मोडवर आहे.

बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर आज मातोश्रीवर महत्वाची बैठक, उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय..
Uddhav Thackeray
| Updated on: Jul 15, 2026 | 9:40 AM

राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आपल्या कॅबिनेट मंत्र्यांची बैठक बोलावली. केंद्रात मंत्रिमंडळ विस्तार येत्या दोन ते दिवसात होणार आहे. ठाकरे गटातून बंडखोरी करून शिवसेना शिंदे गटात दाखल झालेल्या खासदारांपैकी कोणाची वर्णी लागणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे. यादरम्यानच काल रात्री उशिरा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जयंत पाटील, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल अचानक वर्षा बंगल्यावर पोहोचले. यादरम्यान त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यामुळे विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. त्यामध्येच ठाकरे गटात मोठी बंडखोरी होताना दिसली. उद्धव ठाकरे स्वत: बंडखोरी रोखण्यासाठी मैदानात उतरले आहेत.

नाशिक महापालिकेतील काही नगरसेवक बंडखोरीच्या तयारीत असल्याचे सांगितले जातंय. हे नगरसेवक शिवसेना शिंदे गटात प्रवेश प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. नगरसेवक फुटीच्या चर्चेनंतर नाशिकमधील नगरसेवक आज ठाकरेंच्या भेटीला जाणार आहेत. त्यांची बैठक मातोश्रीवर आहे. सर्व नगरसेवक बैठकीला हजर राहणार असल्याची माहिती मिळतंय.

नाशिकमधील नगरसेवकांना मुंबईत बोलावून पक्षशिस्तीचा आढावा घेत एकनिष्ठतेची खात्री केली जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये या नगरसेवकांची बंडखोरी होऊ नये, याकरिता ठाकरे गट अलर्ट मोडवर आहे. दहा ते बारा नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा ही रंगताना दिसली.

नाशिकमधील ठाकरे यांच्या शिवसेनेचे नगरसेवक गटनेते केशव पोरजे यांच्या नेतृत्वात मुंबईकडे नगरसेवक रवाना झाले आहेत. स्वत: उद्धव ठाकरे यांच्याकडून नगरसेवकांची बैठक घेतली जाईल. राज्यातील काही वरिष्ठ नेतेही या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळतंय. शिवसेना ठाकरे गटाला एका मागून एक मोठे धक्के बसताना दिसत आहेत. त्यामध्येच आता बंडखोरी टाळण्यासाठी प्रयत्न केला जात आहेत. तब्बल 6 खासदारांनी ठाकरे गटातून मोठी बंडखोरी केली. त्यानंतर सचिन आहिर यांनीही पक्षाला रामराम केला.

Follow Us