अमरावती हिंसाचार प्रकरण; दोषींवर कडक कारवाईचे गृहमंत्र्यांकडून आश्वासन

अमरावतीमधील परिस्थिती नियंत्रणात आली असून, आज शहरात शांतता आहे. हिंसाचार प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

अमरावती हिंसाचार प्रकरण; दोषींवर कडक कारवाईचे गृहमंत्र्यांकडून आश्वासन
दिलीप वळसे-पाटील, गृहमंत्री
Follow us
| Updated on: Nov 14, 2021 | 12:39 PM

मुंबई – त्रिपुरामध्ये मशिदीवर हल्ला झाल्याचे कथीत व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्रिपुरासह महाराष्ट्रात देखील यांचे पडसाद  उमटल्याचे पहायला मिळाले. अमरावतीमध्ये दंगल उसळली होती.  जमावाकडून दगडफेक करण्यात आली. या घटनेत काही पोलीस देखील जखमी झाले. दोन दिवस शहरात तणावपूर्ण वातावरण होते. मात्र आज परिस्थिती नियंत्रणात आली असून, शहरात शांतता असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. या प्रकरणाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाईची दिशा ठरवू, जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे देखील त्यांनी म्हटले आहे. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

दंगलीमधील नुकसानाचा आढावा 

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, सध्या शहरातील परिस्थिती नियंत्रणात आहे. गेले दोन दिवस त्रिपुरा घटनेच्या पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये तणावरपूर्ण वातावर होते. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने, जिल्हा प्रशासनाकडून पुढील तीन दिवस संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाईची दिशा ठरवू, या प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही  गृहमंत्र्यांनी म्हटले आहे. तसेच या दंगलीमध्ये ज्याही व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्या नुकसानाचाही आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

अमरावतीमध्ये तीन दिवसांसाठी संचारबंदी 

अमरावतीमध्ये गेले दोन दिवस तणावपूर्ण वातावरण होते. आज परिस्थिती निवळली आहे. मात्र तरी देखील पुढील तीन दिवस अमरावतीमध्ये संचारबंदी कायम ठेवण्याचा निर्णय  प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. संचारबंदीमध्ये पाचपेक्षा अधिक नागरिकांना एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच काही अत्यावश्यक काम असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या 

खरंच ‘हिंदू खतरे में है’ तर मोहन भागवतांनी दिल्लीत मोर्चा काढावा, मोदी-शहांना जाब विचारावा; संजय राऊत यांचं आव्हान

राजकारण पेटलेः 93 च्या दंगलीत बाळासाहेबांचा पुढाकार नसता तर मुंबईत हिंदू जिवंत नसता, आता हिंदुहृदयसम्राटांचे वारसदार बोलणार नाहीत का, चंद्रकांत पाटलांचा सवाल

Non Stop LIVE Update
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.