AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमरावती हिंसाचार प्रकरण; दोषींवर कडक कारवाईचे गृहमंत्र्यांकडून आश्वासन

अमरावतीमधील परिस्थिती नियंत्रणात आली असून, आज शहरात शांतता आहे. हिंसाचार प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

अमरावती हिंसाचार प्रकरण; दोषींवर कडक कारवाईचे गृहमंत्र्यांकडून आश्वासन
दिलीप वळसे-पाटील, गृहमंत्री
| Edited By: | Updated on: Nov 14, 2021 | 12:39 PM
Share

मुंबई – त्रिपुरामध्ये मशिदीवर हल्ला झाल्याचे कथीत व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्रिपुरासह महाराष्ट्रात देखील यांचे पडसाद  उमटल्याचे पहायला मिळाले. अमरावतीमध्ये दंगल उसळली होती.  जमावाकडून दगडफेक करण्यात आली. या घटनेत काही पोलीस देखील जखमी झाले. दोन दिवस शहरात तणावपूर्ण वातावरण होते. मात्र आज परिस्थिती नियंत्रणात आली असून, शहरात शांतता असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. या प्रकरणाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाईची दिशा ठरवू, जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे देखील त्यांनी म्हटले आहे. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

दंगलीमधील नुकसानाचा आढावा 

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, सध्या शहरातील परिस्थिती नियंत्रणात आहे. गेले दोन दिवस त्रिपुरा घटनेच्या पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये तणावरपूर्ण वातावर होते. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने, जिल्हा प्रशासनाकडून पुढील तीन दिवस संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाईची दिशा ठरवू, या प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही  गृहमंत्र्यांनी म्हटले आहे. तसेच या दंगलीमध्ये ज्याही व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्या नुकसानाचाही आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

अमरावतीमध्ये तीन दिवसांसाठी संचारबंदी 

अमरावतीमध्ये गेले दोन दिवस तणावपूर्ण वातावरण होते. आज परिस्थिती निवळली आहे. मात्र तरी देखील पुढील तीन दिवस अमरावतीमध्ये संचारबंदी कायम ठेवण्याचा निर्णय  प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. संचारबंदीमध्ये पाचपेक्षा अधिक नागरिकांना एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच काही अत्यावश्यक काम असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या 

खरंच ‘हिंदू खतरे में है’ तर मोहन भागवतांनी दिल्लीत मोर्चा काढावा, मोदी-शहांना जाब विचारावा; संजय राऊत यांचं आव्हान

राजकारण पेटलेः 93 च्या दंगलीत बाळासाहेबांचा पुढाकार नसता तर मुंबईत हिंदू जिवंत नसता, आता हिंदुहृदयसम्राटांचे वारसदार बोलणार नाहीत का, चंद्रकांत पाटलांचा सवाल

राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.