Amravati-Nagpur Highwayवर अपघात; दोन जण ठार, दोन दिवसांपूर्वी लग्न झालेले नवदाम्पत्य जखमी

| Updated on: Mar 26, 2022 | 2:05 PM

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील पिंपळखुटा येथे हे लग्न झाले. मुलाच्या सासरी सत्यनारायणाची पूजा आटोपून ते परत येताना अपघात झाला. पिंपळखुटा येथील वैभव सुरेश गायक यांचे बाभूळगाव येथील तेजस्विनी रमेश बाभळे हिच्यासोबत 23 मार्च रोजी लग्न झाले.

Amravati-Nagpur Highwayवर अपघात; दोन जण ठार, दोन दिवसांपूर्वी लग्न झालेले नवदाम्पत्य जखमी
अमरावती-नागपूर हायवेवर अपघात झाला. यात दोन जण ठार झाले.
Image Credit source: tv 9
Follow us on

स्वप्निल उमप 

अमरावती : अवघ्या दोन दिवसांपूर्वी एका दाम्पत्याचं लग्न झालं. ते सत्यनारायणाची कथा संपवून परत येत होते. दरम्यान, पिकअपनं धडक दिली. यात दोन जण ठार झाले. ही घटना अमरावती-नागपूर एक्प्रेस हायवेवर (Amravati-Nagpur Highway) बोरवघल नजीक घडली. यात गाडीतील पन्नाव वर्षीय महिला व चालक जागीच ठार झाले. तीन जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात दोन दिवसांपूर्वी लग्न झालेल्या वर-वधूचा समावेश आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव (Dhamangaon) रेल्वे तालुक्यातील पिंपळखुटा (Pipalkhuta) येथे हे लग्न झाले. मुलाच्या सासरी सत्यनारायणाची पूजा आटोपून ते परत येताना अपघात झाला. पिंपळखुटा येथील वैभव सुरेश गायक यांचे बाभूळगाव येथील तेजस्विनी रमेश बाभळे हिच्यासोबत 23 मार्च रोजी लग्न झाले.

जखमींना सेवाग्राम रुग्णालयात हलविले

घरफाळ येथील सत्यनारायण कथा आटोपली. त्यानंतर परत येताना बोरवघळजवळ समोरून येणाऱ्या पिकअपला समोरासमोर धडक झाली. या अपघातात मीराबाई भीमराव बेदुरकर (वय 50) रा. पिंपळखुटा व गाडीचालक गौरव लक्ष्मण ठवकर (वय 23) रा. पथ्रोट यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. वैभव सुरेश गायके (वय 25) वर, तेजस्विनी रमेश बाभळे वधू व नेहा दादाराव बेदूरकर हे जखमी झाले आहेत. त्यांना सेवाग्राम येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.

Nagpur | 15 महिन्यांच्या विहानला दुर्मिळ आजार, उपचारासाठी हवंय 16 कोटींचं इंजेक्शन, Crowdfundingसाठी पालकांचे प्रयत्न

Video | लक्षवेधी लागत नसल्याने Vikas Thakre संतप्त, आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात पत्रकार परिषद घ्यायची काय?

Nagpur | कोरोनात 100 पेक्षा जास्त बालविवाह झाल्याची शक्यता! 17 बालविवाह बालकल्याण विभागाने रोखले