सरकारकडून Bharat Taxi App लाँच, चालक आणि प्रवासी दोघांना परवडेल, टॅक्सीचे फायदे काय?
महाराष्ट्र शासन आणि सहकार मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने 'भारत टॅक्सी' सेवेचा भव्य शुभारंभ व लोकार्पण सोहळा नवी मुंबई विमानतळ येथे आयोजित करण्यात आला आहे. याचे फायदे काय आहेत ते पाहा...

महाराष्ट्र शासन आणि सहकार मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारत टॅक्सी’ सेवेचा भव्य शुभारंभ व लोकार्पण सोहळा नवी मुंबई विमानतळ येथे आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भारत टॅक्सी’ चा शुभारंभ केला जाणार आहे. एकाच मोबाईल अॅपवरून कार, ऑटो-रिक्षा आणि बाईक टॅक्सी बुकिंगची सुविधा. प्रवासी आणि चालक यांना थेट जोडणारी व्यवस्था. मध्यस्थ कमी होऊन सेवा अधिक पारदर्शक व सुलभ होणार. परवडणारी आणि आधुनिक टॅक्सी सेवा देण्याचा सरकारचा दावा.
कोण राबवणार योजना?
केंद्रीय सहकार मंत्रालयाची महत्त्वाकांक्षी योजना. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (NCDC) आणि 7 प्रमुख राष्ट्रीय सहकारी संस्थांच्या सहकार्याने अंमलबजावणी. पहिल्या 1.5 किलोमीटरसाठी 31 रुपये. त्यानंतर प्रति किलोमीटर 21 रुपये. काळी-पिवळी टॅक्सीच्या धर्तीवर भाडे निश्चित. पहिल्या टप्प्यात मुंबई आणि पुण्यात सेवा सुरू होणार. यासाठी संबंधित सहकारी संस्थांची निवड करण्यात आली आहे. राज्याचे एग्रीगेटर धोरण अंतिम करण्यात आले. नागरिकांच्या सूचना समाविष्ट करून नियम निश्चित. अॅप-आधारित कॅब सेवांसाठी कायदेशीर चौकट तयार. कार्यक्रमाचे नियंत्रण अधिकारी म्हणून पुण्याचे सहकार आयुक्त व निबंधक नियुक्त. सर्व आर्थिक व्यवहारांवर त्यांचे नियंत्रण राहणार. शासन निर्णय वित्त विभागाच्या अधिकारांतर्गत डिजिटल स्वाक्षरीसह प्रसिद्ध. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अॅपचे फायदे सांगितले आहे.
* भारत टॅक्सी शुभारंभ- सहकार क्षेत्रात नवीन क्रांती होते. * मोदी आणि शहा यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशात हा उपक्रम सुरू झाला * दिल्ली गुजरात आणि महाराष्ट्र अशा ठिकाणी सुरू झालाय * गावातल्या सोसायटी पासून नवीन मॉडल तयार करायचे * भारत टॅक्सी हा सहकाराच्या क्षेत्रात महत्वाचा भाग आहे * ओला उबर एग्रीगेटरने एक प्रकारे सामान्य माणसाला सोप्या पद्धतीने प्रवास करता यावा यासाठी अतिशय चांगले काम केले * लोक देखील पाहिजे त्या वेळेत पोहचतात * अनेकवेळा परिवहन करणारे वेगवेगळे घटक होते अनेक velaa भाडणे व्ह्यायची मात्र आता नवीन पद्धतीने वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध झालाय * मात्र अनेकदा पाऊस आला सणवार आला तर भाडे वाढवले जायचे * या सगळ्या प्रकारातून चांगले फायदे झाले * एप वर राहण्यासाठी पैसे द्यावे लागतात * मात्र ह्या सर्व गोष्ठी लक्षात घेऊन भारत एप हे असे मॉडल तयार करण्यात आले आणि सर्व सेवा दिली जाते * सर्वसामान्य नागरिकांना ही शुविधा सुरक्षित सुखद व्यवस्था आहे * टॅक्सी असतात म्हणून भारत टॅक्सी सुविधा सुरू * करार वेगवेगळे केले त्यातला स्व दी बा पाटील संदर्भातला लक्षणीय वाटतो * ह्या भागात राहण्याऱ्या भूमिपुत्रना रोजगार मिळेल * सुरक्षित वाहतूक व्यवस्था द्यायची आहे * पुढच्या काळात अधिक सुरक्षित प्रवास द्यायचा आहे आणि तो होईल * मुंबईमध्ये आलेली माणसाला भारत टॅक्सीचा प्रवास उत्तम सुरक्षित वाटेल * देशात सर्वात मोठे नवी मुंबई विमानतळ असले
