सणासुदीचे दिवस लक्षात घेऊन माझा भाऊ… अमृता फडणवीस यांचे जरागेंना उद्देशून मोठे विधान, थेट..
अमृता फडणवीस यांनी नुकताच मनोज जरांगे पाटील यांना उद्देशून मोठे विधान केले. मनोज जरांगे पाटील मुंबईला येण्यावर ठाम आहेत. त्यावरच बोलताना अमृता फडणवीस दिसल्या आहेत. भाऊ म्हणून त्यांनी जरांगेंचा उल्लेख केला.

मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी मोठे विधान केले. मनोज जरांगे पाटील जालन्याहून मुंबईत आंदोलनासाठी येणार असल्याचे सांगितले जातंय. जरांगे मुंबईत येण्यासाठी ठाम आहेत. मात्र, गणेशोत्सवाच्या काळात जरांगे मुंबईत आले तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मुंबईत उपोषण जरांगे करणार आहेत. त्याबाबत महत्वाची बैठक होईल. जरांगे यांच्या उपोषणाचा आज पंधरावा दिवस आहे. अमृता फडणवीस यांनी मनोज जरांगे हे माझे भाऊ आहेत, त्यांना मी माझ्या घरी जेवण्याचे निमंत्रण देते. असे अमृता फडणवीस यांनी म्हटले होते. त्यावर जरांगे यांनीही प्रतिक्रिया दिली. आता पुन्हा अमृता फडणवीस यांनी मनोज जरांगे यांच्याबद्दल मोठे विधान केले.
अमृता फडणवीस यांनी नुकताच बोलताना म्हटले की, सणासुदीचे दिवस लक्षात घेऊन माझा भाऊ जे करायचं ते शांतीपूर्वकच करतील. अमृता फडणवीस यांनी मनोज जरंगे पाटील यांना उद्देशून हे विधान केले. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला येणार असल्याचे स्पष्ट केले. अहिल्यानगर येथे समर्पण चतुर्मास कार्यक्रमात अमृता फडणवीस सहभागी झाल्या.
यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, मराठा आरक्षणाचा विषय हा संवेदनशील असून राज्य सरकार त्यावर मार्ग काढेल. यादरम्यानच मनोज जरांगे पाटील यांना उद्देशून बोलताना अमृता फडणवीस या दिसल्या. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर सरकार अलर्ट मोडवर आहे. सरकारकडून काही निर्णय देखील घेण्यात आलीत.
भावाचे नाते लावल्यानंतर आपण भाऊबीजेला जाऊ ना आपल्याला त्यात अडचण नाही. आज भाऊ इकडे संकटात आहे. कोणाच्या तरी गरीबाच्या लेकरासाठी लढत आहे. ताईकडे जातो ना… साडी-चोळी घेऊन जातो पण भाऊबीजेच्या वेळी, असा प्रतिसाद मनोज जरांगे पाटील यांनी अमृता फडणवीस यांच्या बोलण्याला दिला होता. अमृता फडणवीस गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल बोलताना दिसत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला येण्यावर भाष्य केले.