AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत येतो, हिंमत असेल तर… राज ठाकरेंना अन्नामलाईचं खुलं आव्हान; त्या टीकेनंतर वातावरण तापलं!

राज ठाकरे यांनी अन्नामलाई यांच्यावर केलेल्या टीकेनंतर आता अन्नामलाई यांनी थेट राज ठाकरे यांनी खुलं आव्हान दिलं आहे. नेमकं काय म्हणाले अन्नामलाई? जाणून घ्या सविस्तर

मुंबईत येतो, हिंमत असेल तर... राज ठाकरेंना अन्नामलाईचं खुलं आव्हान; त्या टीकेनंतर वातावरण तापलं!
Image Credit source: Social media
| Updated on: Jan 13, 2026 | 4:00 PM
Share

K. Annamalai On Raj Thackeray : सध्या राज्यात महापालिका निवडणुकांचे वारे वाहत आहे. फक्त काही तास महापालिका निवडणुकीसाठी उरले आहेत. यामध्ये अनेक नेत्यांनी जाहीर सभा देखील घेतल्या. यामधील सर्वात चर्चेत आलेली सभा म्हणजे राज ठाकरे यांची शिवाजी पार्क येथे झालेली सभा. या सभेमध्ये राज ठाकरे यांनी भाजपसह इतर काही नेत्यांवर देखील हल्लाबोल केला. यामधील सर्वात चर्चेत आला तो विषय म्हणजे राज ठाकरे यांनी अन्नामलाई यांच्यावर केलेली टीका. या टीकेनंतर चांगलच वातावरण तापलं आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी केलेल्या ‘रसमलाई’ या वादग्रस्त वक्तव्यावर अन्नामलाई यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘मी मुंबईला येईन, माझे पाय कापून दाखवा’ असे आव्हान अन्नामलाई यांनी राज ठाकरेंना दिले आहे.

अन्नामलाई यांनी राज ठाकरे यांचे वक्तव्य तमिळ लोकांचा अपमान करणारे असल्याचे सांगितले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत मुंबई ही खऱ्या अर्थाने एक आंतरराष्ट्रीय शहर असल्याचे स्पष्ट केले. तसेच आपल्या नाराज पक्षसहकाऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत त्यांनी, राज ठाकरे यांचे वक्तव्य फार गंभीरपणे घेऊ नका असे विधान केले.

मुंबईवरून राजकीय वाद

हा वाद तेव्हा सुरू झाला जेव्हा मुंबईतील आगामी महत्त्वाच्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अन्नामलाई यांनी वक्तव्य केले. त्यांनी म्हटले होते की, ‘मुंबई ही केवळ महाराष्ट्राची राजधानी नाही तर ती देशाची आर्थिक राजधानी आणि एक आंतरराष्ट्रीय शहर आहे. त्यामुळे हे शहर योग्य लोकांनी चालवले गेले पाहिजे.

मुंबईला ट्रिपल-इंजिन सरकारची गरज आहे. मुंबईत भाजपचा महापौर, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी असणे आवश्यक आहे. मुंबई हे जागतिक महानगर असून तिचा अर्थसंकल्प 40 हजार कोटी रुपयांहून अधिक आहे. बेंगळुरूचा अर्थसंकल्प सुमारे 19 हजार कोटी तर चेन्नईचा 8 हजार कोटी रुपयांचा आहे. इतक्या मोठ्या अर्थसंकल्पाचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रशासनात सक्षम आणि प्रामाणिक लोकांची गरज आहे असं अन्नामलाई यांनी म्हटले होते.

अन्नामलाईच्या वक्तव्यावर राज ठाकरे यांची टीका

अन्नामलाई यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यात राज ठाकरे यांचा देखील समावेश आहे. राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या जुन्या घोषणांची आठवण करून देत अन्नामलाई यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, ‘एक रसमलाई तमिळनाडूतून आली आहे… तुझा इथे काय संबंध? हटाओ लुंगी, बजाओ पुंगी’ अशी टीका राज ठाकरेंनी केली.

Follow Us
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा.

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा

बंदुका, ग्रेनेड्स की उघड युद्ध? मुलांविरोधात काय येणार? पवन खेडा यांचा सवाल; तर पोलिसांचा दावा काय?.

बंदुका, ग्रेनेड्स की उघड युद्ध? मुलांविरोधात काय येणार? पवन खेडा यांचा सवाल; तर पोलिसांचा दावा काय?

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !.

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट.

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट