AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत येतो, हिंमत असेल तर… राज ठाकरेंना अन्नामलाईचं खुलं आव्हान; त्या टीकेनंतर वातावरण तापलं!

राज ठाकरे यांनी अन्नामलाई यांच्यावर केलेल्या टीकेनंतर आता अन्नामलाई यांनी थेट राज ठाकरे यांनी खुलं आव्हान दिलं आहे. नेमकं काय म्हणाले अन्नामलाई? जाणून घ्या सविस्तर

मुंबईत येतो, हिंमत असेल तर... राज ठाकरेंना अन्नामलाईचं खुलं आव्हान; त्या टीकेनंतर वातावरण तापलं!
Image Credit source: Social media
| Updated on: Jan 13, 2026 | 4:00 PM
Share

K. Annamalai On Raj Thackeray : सध्या राज्यात महापालिका निवडणुकांचे वारे वाहत आहे. फक्त काही तास महापालिका निवडणुकीसाठी उरले आहेत. यामध्ये अनेक नेत्यांनी जाहीर सभा देखील घेतल्या. यामधील सर्वात चर्चेत आलेली सभा म्हणजे राज ठाकरे यांची शिवाजी पार्क येथे झालेली सभा. या सभेमध्ये राज ठाकरे यांनी भाजपसह इतर काही नेत्यांवर देखील हल्लाबोल केला. यामधील सर्वात चर्चेत आला तो विषय म्हणजे राज ठाकरे यांनी अन्नामलाई यांच्यावर केलेली टीका. या टीकेनंतर चांगलच वातावरण तापलं आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी केलेल्या ‘रसमलाई’ या वादग्रस्त वक्तव्यावर अन्नामलाई यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘मी मुंबईला येईन, माझे पाय कापून दाखवा’ असे आव्हान अन्नामलाई यांनी राज ठाकरेंना दिले आहे.

अन्नामलाई यांनी राज ठाकरे यांचे वक्तव्य तमिळ लोकांचा अपमान करणारे असल्याचे सांगितले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत मुंबई ही खऱ्या अर्थाने एक आंतरराष्ट्रीय शहर असल्याचे स्पष्ट केले. तसेच आपल्या नाराज पक्षसहकाऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत त्यांनी, राज ठाकरे यांचे वक्तव्य फार गंभीरपणे घेऊ नका असे विधान केले.

मुंबईवरून राजकीय वाद

हा वाद तेव्हा सुरू झाला जेव्हा मुंबईतील आगामी महत्त्वाच्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अन्नामलाई यांनी वक्तव्य केले. त्यांनी म्हटले होते की, ‘मुंबई ही केवळ महाराष्ट्राची राजधानी नाही तर ती देशाची आर्थिक राजधानी आणि एक आंतरराष्ट्रीय शहर आहे. त्यामुळे हे शहर योग्य लोकांनी चालवले गेले पाहिजे.

मुंबईला ट्रिपल-इंजिन सरकारची गरज आहे. मुंबईत भाजपचा महापौर, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी असणे आवश्यक आहे. मुंबई हे जागतिक महानगर असून तिचा अर्थसंकल्प 40 हजार कोटी रुपयांहून अधिक आहे. बेंगळुरूचा अर्थसंकल्प सुमारे 19 हजार कोटी तर चेन्नईचा 8 हजार कोटी रुपयांचा आहे. इतक्या मोठ्या अर्थसंकल्पाचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रशासनात सक्षम आणि प्रामाणिक लोकांची गरज आहे असं अन्नामलाई यांनी म्हटले होते.

अन्नामलाईच्या वक्तव्यावर राज ठाकरे यांची टीका

अन्नामलाई यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यात राज ठाकरे यांचा देखील समावेश आहे. राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या जुन्या घोषणांची आठवण करून देत अन्नामलाई यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, ‘एक रसमलाई तमिळनाडूतून आली आहे… तुझा इथे काय संबंध? हटाओ लुंगी, बजाओ पुंगी’ अशी टीका राज ठाकरेंनी केली.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...