AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे सरकारच्या अहंकारामुळे न्यायालयात विधिमंडळाचे दिवाळे निघाले, शेलार पुन्हा कडाडले

बारा आमदारांच्या निलंबन प्रकरणात ठाकरे सरकारने अहंकारी भूमिका घेतली त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात कधी नाही तेवढी महाराष्ट्र विधिमंडळाची नाचक्की झाली, दिवाळे निघाले, अशी टीका भाजपा आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत केली.

ठाकरे सरकारच्या अहंकारामुळे न्यायालयात विधिमंडळाचे दिवाळे निघाले, शेलार पुन्हा कडाडले
आशिष शेलार यांची महाविकास आघाडीवर टीकाImage Credit source: tv9
| Updated on: Mar 10, 2022 | 3:58 PM
Share

मुंबई : गेल्या काही दिवसात भाजपच्या 12 आमदरांचे निलंबन (Bjp Mla) चांगलेच गाजले आहे. विधानसभेत गदारोळ घातल्याप्रकरणी महाविकास आघाडीने आक्रमक (Mahavikas Aghadi) होत आमदारांचे निलंबन केले. त्यानंतर त्यांनी सुप्रिम कोर्टात धाव घेतली. सुप्रिम कोर्टाने ही निलंबन रद्द ठरवलं. आता पुन्हा भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी यावरूनच ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. बारा आमदारांच्या निलंबन प्रकरणात ठाकरे सरकारने अहंकारी भूमिका घेतली त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात कधी नाही तेवढी महाराष्ट्र विधिमंडळाची नाचक्की झाली, दिवाळे निघाले, अशी टीका भाजपा आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. भाजपाच्या 12 आमदार निलंबनाचा विषय आज विधानसभेत उपस्थित झाल्यानंतर या प्रकरणाचे याचिकाकर्ते आमदार अँड आशिष शेलार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यातील काही भाग वाचून त्यांनी बाजू मांडली.

सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं?

सर्वोच्च न्यायालयाने विधिमंडळाने आमदारांना निलंबित करण्याचा ठराव हा अवैध, असंविधानीक, अतार्किक असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे हा ठराव खारीज झाल्याने 12 आमदारांना सभागृहात येण्याचे मार्ग खुले झाले. विधिमंडळाचे अधिकार सर्वोतोपरी अबाधित रहावे अशीच भाजपाची भूमिका असून या ठरावावर निर्णय देताना ही न्यायालयाने सभागृहाच्या अधिकारावर गदा आणलेली नाही. निलंबनाचा अधिकार अबाधित ठेवला आहे. असेही ते म्हणाले. याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असताना न्यायालयाने विधिमंडळाचे अधिकार अबाधित रहावे म्हणून याबाबत बारा आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे याचिका करावी, विधानसभा अध्यक्षांनी सुनावणी करुन याबाबत निर्णय घ्यावा असेही अंतरिम आदेश दिले होते. त्यावेळी 12 आमदारांनी याचिका करुनही विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असताना सुनावणी केली नाही. असा आरोपही त्यांनी केला आहे.

सरकार चुकीची माहिती देत आहे

तसेच याबाबत सर्वोच्च न्यायालयात आपली बाजु मांडावी अशी नोटीस न्यायालयाने दिली होती त्यावेळी आम्ही सर्वोच्च न्यायालयासमोर येणार नाही अशी भूमिका घेण्यात आली. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायमुर्तीं च्या खंडपीठाने निवाडा दिल्यानंतर याबाबत अपिल दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे या संधी विधिमंडळाने गमावल्या आहेत. याबाबत आम्ही कोणत्याही प्रकारचे राजकीय भाष्य करणार नव्हतो पण सरकारकडून वारंवार विपर्यास करुन माहिती दिली जात आहे. हा ठराव अवैध, असंविधानीक, अतार्किक नाही असे सरकारकडून सांगितले जाते आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने मारलेल ताशेरे पुन्हा वाचून दाखवत आमदार अँड आशिष शेलार यांनी सर्वोच्च न्यायालयात ठाकरे सरकारच्या याच अहंकारामुळे महाराष्ट्राची नाचक्की झाली, अशी टीका त्यांनी केली.

Assembly Election Result 2022 : उत्तर प्रदेश, गोव्यात शिवसेना सपाटून पडली, संजय राऊत म्हणतात, अजून लढाई संपली नाही !

Goa Election | गोव्याचं मोठं यश कुणामुळे? फडणवीसांनी घेतली दोन नावं, गोव्यातल्या सरकारचा प्लॅनही सांगितला

Punjav Assembly Election Result LIVE 2022 : पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांचा दोन्ही जागांवर पराभव

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.