AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई मेट्रोचा खर्च का वाढला? मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी सांगीतले कारण

ज्यावेळी प्रोजेक्ट डीपिआर झाला तेव्हा याची किंमत 23 हजार कोटी होती. त्यानंतर आता पर्यंत काम पूर्ण झालेले नाही. दिल्लीच्या बेस वर हा प्रोजेक्ट करण्यात येत होता. त्यामुळे त्यानुसार या प्रकल्पाच्या खर्चाचे बजेट तयार करण्यात आले होते. दिल्ली आणि मुंबई मध्ये अनेक फरक दिसले. त्यामुळे वेगवेगळ्या कारणामुळे कामाची किंमत वाढली. आता पर्यंत 21 हजार 520 कोटी आता पर्यंत खर्च झाले असल्याचे आश्विनी भिडे यांनी सांगीतले.

मुंबई मेट्रोचा खर्च का वाढला? मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी सांगीतले कारण
| Updated on: Aug 11, 2022 | 4:25 PM
Share

मुंबई : राज्यात नवे शिंदे फडणवीस सरकार स्थापन होतात मेट्रोच्या कामाला गती आली आहे. कुलाबा- वांद्रे- सीप्झ(Colaba- Bandra- Seepz) या मुंबई मेट्रो मार्ग-3(Metro 3) प्रकल्पाचा खर्च 33 हजार कोटींवर गेला आहे. उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी बुधावरी झालेल्या मंत्री मंडळ बैठकीत या वाढीव खर्चाला मंजूरी दिली. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. मेट्रोचा खर्च नेमका कशामुळे वाढला याबद्दल मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे(Ashwini Bhide, Managing Director of Metro) यांनी माहिती दिली आहे.

काय म्हणाल्या अश्विनी भिडे

ज्यावेळी प्रोजेक्ट डीपिआर झाला तेव्हा याची किंमत 23 हजार कोटी होती. त्यानंतर आता पर्यंत काम पूर्ण झालेले नाही. दिल्लीच्या बेस वर हा प्रोजेक्ट करण्यात येत होता. त्यामुळे त्यानुसार या प्रकल्पाच्या खर्चाचे बजेट तयार करण्यात आले होते. दिल्ली आणि मुंबई मध्ये अनेक फरक दिसले. त्यामुळे वेगवेगळ्या कारणामुळे कामाची किंमत वाढली. आता पर्यंत 21 हजार 520 कोटी आता पर्यंत खर्च झाले असल्याचे आश्विनी भिडे यांनी सांगीतले. बुधवारी महाराष्ट्र सरकारने या वाडीव खर्चास मंजुरी दिली आता वाढीव खर्चाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाईल असे भिडे म्हणाल्या.

2015 साली मेट्रो 3 प्रकल्पाची किंमत होती 23 हजार कोटी

2015 साली मेट्रो 3 प्रकल्पाची किंमत होती 23 हजार कोटी होती. मात्र, कोरोना काळात मेट्रोच्या कामाला ब्रेक लागला. जवळपास अडीच वर्षे हे काम बंद असल्यासारखंच होतं. त्यामुळे या प्रोजेक्टचे काम लांबणीवर पडले आहे. या प्रकल्पाचा पहिला फेज 2021 साली पूर्ण होणे अपेक्षित होते. तर 2022 साली प्रकल्प पुर्ण करायचा होता. कारशेडवरच्या स्थगितीमुळे प्रकल्प आणखी लांबणीवर पडला. त्यातच मधल्या काळात कच्च्या मालाचा खर्च वाढल्याने 23 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आता ढोबळमानाने 33 हजार कोटी रुपयांचा झाला आहे.

मेट्रोच्या कामाची सध्याची स्थिती

मेट्रोचे स्थापत्य कामं 85 टक्के पूर्ण झाले आहे. इतर सगळी कामं मोठ्या प्रमाणात पूर्ण झाली आहेत. पण कारडेपोचं काम केवळ 29 टक्केच पूर्ण झालं आहे. त्यामुळे हे काम आता वेगानं करुन याचा पहिला फेज कुठल्याही परिस्थितीत 2023 साली सुरु झाला पाहिजे, अशाप्रकारचं नियोजन करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

वाढीव खर्चाच नियोजन कसं करणार?

मेट्रोच्या वाढीव खर्चाचे नियोजनाबाबत महाराष्ट्र सरकारवर इक्विटीच्या 50 टक्के खर्च देण्याची जबाबदारी आहे, 50 टक्के इक्विटीचे पैसे केंद्र सरकार देणार आहे आणि उरलेले पैसे जायका देणार आहे, वाढीव पैसे देण्यासही जायकाने तयारी दाखवलीय. त्यामुळे आता अतिशय वेगाने हा मेट्रो प्रकल्प पूर्ण करु, साधारणपणे हा ज्यावेळी सुरु होईल तेव्हा 13 लाख लोक प्रति दिन यातून प्रवास करतील. 6 लाख वाहनांच्या ट्रिप रस्त्यावरुन कमी होतील. 2031 पर्यंत 17 लाख लोक प्रति दिन यातून प्रवास करतील. त्यामुळे या प्रकल्पातून मुंबईसाठी मोठा दिलासा मिळणार आहे.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.