AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शपथविधीला ‘मविआ’च्या नेत्यांची दांडी, आठवलेंनी एका वाक्यात विषय संपवला, म्हणाले त्यांच्या मनात..

गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीला विरोधकांनी दांडी मारली, यावर प्रतिक्रिया देताना रामादास आठवले यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

शपथविधीला 'मविआ'च्या नेत्यांची दांडी, आठवलेंनी एका वाक्यात विषय संपवला, म्हणाले त्यांच्या मनात..
रामदास आठवलेImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 06, 2024 | 5:52 PM
Share

राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. तब्बल 231 जागा महायुतीने जिंकल्या. भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला. 132 विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार विजयी झाले. त्यानंतर गुरुवारी नव्या मंत्रिमंडाळाचा शपथविधी पार पडला. यावेळी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार देखील होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले आठवले? 

राज्यात महायुतीला मोठं यश मिळालं. संविधान बदलणार असा आरोप सातत्यानं विरोधकांकडून करण्यात येत होता. पण त्यांना त्यात यश आलं नाही. महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन झालं. आता विकास हाच आमचा ध्यास आहे. सर्व जाती- धर्माच्या लोकांना समान न्याय दिला जाईल असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान गुरुवारी झालेल्या शपथविधी सोहळ्याला विरोधी पक्षातील एकही नेता उपस्थित नव्हता. भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. शरद पवार यांना तर देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: फोन केला होता. मात्र तरी देखील महाविकास आघाडीतील नेते या कार्यक्रमासाठी उपस्थित नव्हते यावर देखील आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या मनात आमच्याविषयी राग  आहे. पण आम्हाला विकास करायचा आहे. आमचं विकासाचं ध्येय आहे. महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहायला पाहिजे होते, मात्र ते राहिले नाहीत. यातून हेच दिसून येत की त्यांचा संविधानाला विरोध आहे, असं आठवले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान त्यांनी यावेळी बोलताना राहुल गांधी यांच्या सोलापूर लाँग मार्चवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आंदोलन करण्याचा अधिकार त्यांना आहे. लोकशाहीनं तो अधिकार त्यांना दिला आहे. ईव्हीएम मशीन त्यांनीच आणलं. जेव्हा लोकसभेत त्यांना यश मिळालं तेव्हा ईव्हीएमविरोधात आंदोलन केलं नाही. असा टोला यावेळी आठवले यांनी राहुल गांधी यांना लगावला आहे.

Follow Us
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको.
पंतप्रधानांच्या नेदरलँड दौऱ्यात 17 करारांवर स्वाक्षऱ्या, सामान्यांना..
पंतप्रधानांच्या नेदरलँड दौऱ्यात 17 करारांवर स्वाक्षऱ्या, सामान्यांना...
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानला अ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानला अ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा.
मोदींना लिहिलेल्या पत्रावरून खोत- पडळकरांचा पवारांना खोचक टोला
मोदींना लिहिलेल्या पत्रावरून खोत- पडळकरांचा पवारांना खोचक टोला.
मोठी बातमी! डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक निच्चांकीवर, धक्कादायक आकडे
मोठी बातमी! डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक निच्चांकीवर, धक्कादायक आकडे.
पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड, नंतर 15...असह्य वेदनेने महिला ओरडत राहिली,
पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड, नंतर 15...असह्य वेदनेने महिला ओरडत राहिली,.
मोठी बातमी! दोन दिवस कसून चौकशी, रात्रभर प्रश्नांचा मारा...अखेर
मोठी बातमी! दोन दिवस कसून चौकशी, रात्रभर प्रश्नांचा मारा...अखेर.
मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्यावर संजय राऊतांचं हटके उत्तर चर्चेत...
मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्यावर संजय राऊतांचं हटके उत्तर चर्चेत....
पेपरफुटीपासून आत्महत्यांपर्यंत….भाजपच जबाबदार, राऊतांचे गंभीर आरोप
पेपरफुटीपासून आत्महत्यांपर्यंत….भाजपच जबाबदार, राऊतांचे गंभीर आरोप.
गटातटांनी राष्ट्रवादीला पोखरलं... थेट सुनेत्रा पवार मैदानात उतरणार...
गटातटांनी राष्ट्रवादीला पोखरलं... थेट सुनेत्रा पवार मैदानात उतरणार....