AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलिसांवर हात उचलणाऱ्यांचे हातच तोडा, अंबादास दानवे आक्रमक, संध्याकाळपर्यंत कारवाई करा, चंद्रकांत खैरेही भडकले

संभाजीनगरात रात्रभर घडलेल्या तणावानंतर आता यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत. शहरातील अशांतेसाठी भाजप आणि एमआयएमला जबाबदार धरण्यात आलंय.

पोलिसांवर हात उचलणाऱ्यांचे हातच तोडा, अंबादास दानवे आक्रमक, संध्याकाळपर्यंत कारवाई करा, चंद्रकांत खैरेही भडकले
Image Credit source: tv9 marathi
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Mar 30, 2023 | 12:26 PM
Share

दत्ता कनवटे, छत्रपती संभाजीनगर : रामनवमीच्या (Ramnavami) आदल्या दिवशी संभाजीनगर (Sambhajinagar) शहरातील किराडपुरा भागात (Kiradpura) उसळलेल्या दंगलसदृश्य स्थितीसाठी भाजप आणि एमआयएम जबाबदार आहे, असा थेट आरोप ठाकरे गटाच्या नेत्यांनी केला आहे. या घटनेदरम्यान दोन गटात प्रचंड वाद, हाणामारी, दगडफेक झाली. या वादावर नियंत्रण मिळवण्यासाठी आलेल्या पोलिस आधिकाऱ्यांवरही हल्ला झाला. पोलिसांची १० ते १२ वाहन जाळण्यात आली. पोलिस अधिकाऱ्यावर हात उचलण्याची यांची हिंमतच कशी होते, या लोकांचे हातच तोडून टाका, असा आक्रमक पवित्रा विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी घेतलाय. तर भाजप आणि एमआएयएमची ही मिलिभगत असल्याचा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केलाय.

त्यांचे हातच तोडून टाका- दानवे

संभाजीनगरात काल रात्री किराडपुऱ्यात झालेल्या राड्यानंतर आज सकाळपासून राजकीय नेत्यांनी पाहणी दौरे केले. शिवसेना नेते अंबादास दानवे यांनीही सकाळीच या ठिकाणाला भेट दिली. यावेळी प्रतिक्रिया देताना अंबादास दानवे म्ङणाले, ‘ मागील महिनाभरापासून आम्ही आवाहन करत आहोत. शहराचं वातावरण अशांत करून जनतेच्या मनात विष पेरण्याचा प्रयत्न चालू आहे.

याला जबाबदार कोण आहे… मुस्लिमांच्या बाजूने एमआयएमसारखी संघटना १०-१० दिवस आंदोलन करते. पोलिस अधिकाऱ्यांवर हात उचलण्याची हिंमत होते, हे हात तोडले पाहिजेत. जे संरक्षण करतात, ते हात तोडलेच पाहिजेत.या घटनेमागे एमआयएम आणि भाजप आहे. या लोकांना शहरात दंगल पाहिजे. त्यांचा जनाधार कमी होतोय. म्हणून मुस्लिम समाजाला उचकवणं, सुजाण जनता निमूटपणे बघतेय. मात्र या लोकांवर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली.

चंद्रकांत खैरे काय म्हणाले?

शहरातील वातावरण बिघडवणाऱ्यांवर आज संध्याकाळपर्यंत कठोर कारवाई झाली पाहिजे. ज्यांनी तोडफोड केली आहे, त्यांना उचलून आतमध्ये फेकून दिलं पाहिजे. हे बाहेर आले नाही पाहिजेत. एखाद्या पोलिसाला कुणी दम मारला तर त्यावर ३५३ दाखल करता, इथे पोलिसांच्या गाड्या जाळल्या तरी काहीच कारवाई नाही. हे सगळं भाजप-एमआयएम आणि मिंधे गटाच्या मिलिभगतचं काम आहे, असं वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केलंय.

‘आधी उचकवायचं, मग शांती रखो…’

जलील इथे निवडून आल्यापासून हा गोंधळ सुरु झाला आहे. त्याला फडणवीस आणि मिंधे गट मदत करता. एवढे दिवस तिथे उपोषण केलं. रात्रभर गोंधळ घालू लागले. बिर्याणी खाऊ लागले, हे पोलिसांना कळलं नाही का, तत्काळ त्यांना उचलून फेकून द्यायला पाहिजे होतं… याआधीही जलील यांनी असं नाटक केलं होतं. त्याच्याच मोबाइलने फोन केला, १० हजार लोक गोळा केले, परत म्हणतो शांती रखो… आधी उचकवायचं आणि शांती रखो म्हणतात, असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केलाय.

Follow Us
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
आदित्य ठाकरे यांच्याकडून त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... एकीकडे कोर्टात सुनावणी सुरू दुसरीकडे शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
विनोद तावडे: विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
कंगना राणावत यांची टीका: गृह मंत्रालयाबाबत दुहेरी भूमिका
राहुल गांधींच्या भूमिकेवर कंगना राणावत यांची टीका: गृह मंत्रालयाबाबत दुहेरी भूमिका
रायगडचा पालकमंत्री मीच, लवकरच निर्णय
भरत गोगावले यांची घोषणा: रायगडचा पालकमंत्री मीच, लवकरच निर्णय