AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘संभाजीनगरातला राडा भाजप आणि MIM ने घडवला, यांना शहरात दंगल पाहिजे’, अंबादास दानवे यांचा प्रहार

भाजप आणि एमआयएमचा जनाधार कमी होतोय, म्हणून शहरातील वातावरण बिघडवलं जातंय, असा आरोप ठाकरे गटाचे आमदार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केलाय.

'संभाजीनगरातला राडा भाजप आणि MIM ने घडवला, यांना शहरात दंगल पाहिजे', अंबादास दानवे यांचा प्रहार
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 30, 2023 | 10:08 AM
Share

दत्ता कनवटे, छत्रपती संभाजीनगर: शहरातील (Sambhaji Nagar) किराडपुरा (Kiradpura Dangal) परिसरात काल रात्री झालेला राडा कुणी घडवला, हे शोधून काढा. शहरातल्या लोकांच्या मनात विष पेरण्यासाठी भाजप आणि एमआयएम जबाबदार आहे. शहरात त्यांना दंगल पाहिजे, मतांसाठी हे राजकारण सुरु आहे, असा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय. ठाकरे गटाचे आमदार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी आज सकाळी शहरातील दंगलग्रस्त भागाची पाहणी केली. शहरात किराडपुरा राम मंदिर परिसरात काल मध्यरात्रीनंतर दोन गटात तुफान राडा झाला. शाब्दिक वाद, हाणामारी, दगडफेक झाली. पोलिसांच्या गाड्याही जाळण्यात आल्या. शहरातील या दंगलीनंतर आता राजकीय नेत्यांचे आरोप प्रत्यारोप सुरु झालेत.

यांना शहरात दंगल हवी आहे…

शहरात काल उसळलेल्या दंगलीनंतर आता राजकीय नेत्यांचे आरोप प्रत्यारोप सुरु झालेत. पालकमंत्री संदीपान भूमरे यांनी या भागाची पाहणी केली. तर विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनीही दौरा केला. त्यांच्यासोबत माजी महापौर नंदकुमार घोडेले, इतर शिवसेनेचे कार्यकर्ते होते. गेल्या महिनाभरापासून औरंगाबाद शहराचं छत्रपती संभाजीनगर नामांतरावरून सुरु असलेल्या आंदोलनामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप त्यांनी केला. माध्यमांशी बोलताना अंबादास दानवे म्हणाले, ‘ हे का घडलं, घडवणारे कोण यामागे जाण्याची आवश्यकता आहे. मागच्या महिनाभरापासून आम्ही आवाहन करत आहोत. शहराचं वातावरण अशांत करून जनतेच्या मनात विष पेरण्याचा प्रयत्न चालू आहे.

याला जबाबदार कोण आहे… मुस्लिमांच्या बाजूने एमआयएमसारखी संघटना १०-१० दिवस आंदोलन करते. पोलिस अधिकाऱ्यांवर हात उचलण्याची हिंमत होते, हे हात तोडले पाहिजेत. जे संरक्षण करतात, ते हात तोडलेच पाहिजेत.या घटनेमागे एमआयएम आणि भाजप आहे. त्यांना शहरात दंगल पाहिजे. त्यांचा जनाधार कमी होतोय. म्हणून मुस्लिम समाजाला उचकवणं, सुजाण जनता निमूटपणे बघतेय. मात्र या लोकांवर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली.

संदीपान भुमरे काय म्हणाले?

संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनीदेखील आज सकाळी घटनास्थळाची पाहणी केली. किराडपुऱ्यात दंगल घडवणाऱ्या समाजकंटकांना थारा मिळणार नाही. यातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. मात्र विरोधी पक्षाचे नेते विनाकारण यावरून राजकारण करत आहेत, असा आरोप भुमरे यांनी केलाय.

Follow Us
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.